शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

दोनऐवजी तीन, चार प्रवासी भरुनही रिक्षाभाडे २० रुपयेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: कोविड काळात कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी रिक्षाचे भाडे २० रुपये देऊन केवळ दोन प्रवासी घेण्याचे आवाहन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली: कोविड काळात कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी रिक्षाचे भाडे २० रुपये देऊन केवळ दोन प्रवासी घेण्याचे आवाहन आरटीओने केले होते. आता नियम काहीसे शिथिल होताच, दोनऐवजी तीन आणि प्रसंगी चार प्रवासी भरूनही भाडे मात्र प्रत्येकी २० रुपये आकारून प्रवाशांची लूट सुरू आहे. याला आरटीओ जबाबदार असून त्यांनी तत्काळ सुधारित शेअर रिक्षाभाड्याचे फलक जागोजागी लावावे असे रिक्षा युनियन पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्व्हेअभावी सुधारित भाडे फलक अद्याप लागले नसून, त्याचा भुर्दंड सामान्य प्रवाशांना रोजच सोसावा लागत आहे.

आरटीओ अधिकारी, रिक्षा युनियन, वाहतूक नियंत्रण पोलीस अधिकारी, महापालिकेचे अधिकारी या यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने एक समिती तयार करून पाहणी अहवाल तयार करण्यात यावा, असे मध्यंतरी ठरवण्यात आले होते. महापालिका आयुक्तांनी त्यासंदर्भात बैठक घेतल्याचे लाल बावटा रिक्षा चालक युनियनचे अध्यक्ष काळू कोमासकर यांनी सांगितले. त्यावेळी आरटीओ अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यावर महापालिका किंवा आरटीओ स्वतः ते भाडे जाहीर करेल असे ठरले होते. पण अद्याप या सर्व्हेचा पत्ताच नाही. आरटीओ इथे येतच नसल्याची नाराजी रिक्षा चालकांनी व्यक्त केली. त्यामुळे जोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचे फलक लागत नाही, तोपर्यंत २० रुपये शेअर भाडे आकारण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे मत काही रिक्षा चालकांनी व्यक्त केले.

---------

कोविड सुरू झाल्यापासून अपवाद वगळता दीड वर्षात आरटीओ अधिकारी डोंबिवलीत आलेले नाहीत. नवे आरटीओ तानाजी चव्हाण यांनीही इथला दौरा अद्याप केलेला नाही, असेही वाहनचालकांनी सांगितले. त्यामुळे सर्व्हे लांबणीवर पडला असून, सुधारित भाडे आकारणीचे फलक लागलेले नाहीत.

--------------

रिक्षा प्रवासाला अजूनही कोविड नियमावली लागूच आहे. अजूनही सुधारित नियम आलेले नाहीत. त्यामुळे रिक्षा चालक तीन, चार प्रवासी नेत असले तरी दोनऐवजी तीन प्रवासी न्यावेत असे शासनाने जाहीर केलेलं नाही. त्यामुळे यावर आरटीओ, वाहतूक पोलिसांनी अंकुश ठेवावा. तो नसल्याने बिनदिक्कतपणे कोविड नियमावली धाब्यावर बसवून अवैध वाहतूक सुरू असल्याचे वास्तव शहरात सर्वत्र दिसत आहे.

---------------

कोविड काळात पूर्ण क्षमतेने कर्मचारी नव्हते. शासन नियमानुसार कामकाज सुरू होते. त्यामुळे डोंबिवलीसह अन्यत्र सुधारित रिक्षा भाडे आकारणीसंदर्भात सर्व्हेचे काम प्रलंबित आहे. आता अधिकारी आले असून लवकरच ते काम करण्यात येणार आहे. मात्र अजूनही दोन प्रवासीच नेण्याचे मार्गदर्शक तत्त्व सांगते. त्यानुसार प्रवाशांनी व रिक्षा चालकाने नियमाचे पालन करावे.

तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण

---------------

आम्ही तीन प्रवासी घेत असलो तरी भाडे १० रुपये घेतोय. आरटीओने सर्व्हे करणे गरजेचे आहे. तो न केल्याने रिक्षा चालकांचे नुकसान होत आहे. त्यातही कोविड काळात रिक्षा चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. कुटुंबाची वाताहत सुरू असून आरटीओने लवकरात लवकर सर्व्हे करावा आणि भाडे आकारणीची समस्या सोडवावी.

दत्ता माळेकर, अध्यक्ष, भाजप, कल्याण जिल्हा वाहतूक सेल

----------------------