शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दोनऐवजी तीन, चार प्रवासी भरुनही रिक्षाभाडे २० रुपयेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: कोविड काळात कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी रिक्षाचे भाडे २० रुपये देऊन केवळ दोन प्रवासी घेण्याचे आवाहन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली: कोविड काळात कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी रिक्षाचे भाडे २० रुपये देऊन केवळ दोन प्रवासी घेण्याचे आवाहन आरटीओने केले होते. आता नियम काहीसे शिथिल होताच, दोनऐवजी तीन आणि प्रसंगी चार प्रवासी भरूनही भाडे मात्र प्रत्येकी २० रुपये आकारून प्रवाशांची लूट सुरू आहे. याला आरटीओ जबाबदार असून त्यांनी तत्काळ सुधारित शेअर रिक्षाभाड्याचे फलक जागोजागी लावावे असे रिक्षा युनियन पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्व्हेअभावी सुधारित भाडे फलक अद्याप लागले नसून, त्याचा भुर्दंड सामान्य प्रवाशांना रोजच सोसावा लागत आहे.

आरटीओ अधिकारी, रिक्षा युनियन, वाहतूक नियंत्रण पोलीस अधिकारी, महापालिकेचे अधिकारी या यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने एक समिती तयार करून पाहणी अहवाल तयार करण्यात यावा, असे मध्यंतरी ठरवण्यात आले होते. महापालिका आयुक्तांनी त्यासंदर्भात बैठक घेतल्याचे लाल बावटा रिक्षा चालक युनियनचे अध्यक्ष काळू कोमासकर यांनी सांगितले. त्यावेळी आरटीओ अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यावर महापालिका किंवा आरटीओ स्वतः ते भाडे जाहीर करेल असे ठरले होते. पण अद्याप या सर्व्हेचा पत्ताच नाही. आरटीओ इथे येतच नसल्याची नाराजी रिक्षा चालकांनी व्यक्त केली. त्यामुळे जोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचे फलक लागत नाही, तोपर्यंत २० रुपये शेअर भाडे आकारण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे मत काही रिक्षा चालकांनी व्यक्त केले.

---------

कोविड सुरू झाल्यापासून अपवाद वगळता दीड वर्षात आरटीओ अधिकारी डोंबिवलीत आलेले नाहीत. नवे आरटीओ तानाजी चव्हाण यांनीही इथला दौरा अद्याप केलेला नाही, असेही वाहनचालकांनी सांगितले. त्यामुळे सर्व्हे लांबणीवर पडला असून, सुधारित भाडे आकारणीचे फलक लागलेले नाहीत.

--------------

रिक्षा प्रवासाला अजूनही कोविड नियमावली लागूच आहे. अजूनही सुधारित नियम आलेले नाहीत. त्यामुळे रिक्षा चालक तीन, चार प्रवासी नेत असले तरी दोनऐवजी तीन प्रवासी न्यावेत असे शासनाने जाहीर केलेलं नाही. त्यामुळे यावर आरटीओ, वाहतूक पोलिसांनी अंकुश ठेवावा. तो नसल्याने बिनदिक्कतपणे कोविड नियमावली धाब्यावर बसवून अवैध वाहतूक सुरू असल्याचे वास्तव शहरात सर्वत्र दिसत आहे.

---------------

कोविड काळात पूर्ण क्षमतेने कर्मचारी नव्हते. शासन नियमानुसार कामकाज सुरू होते. त्यामुळे डोंबिवलीसह अन्यत्र सुधारित रिक्षा भाडे आकारणीसंदर्भात सर्व्हेचे काम प्रलंबित आहे. आता अधिकारी आले असून लवकरच ते काम करण्यात येणार आहे. मात्र अजूनही दोन प्रवासीच नेण्याचे मार्गदर्शक तत्त्व सांगते. त्यानुसार प्रवाशांनी व रिक्षा चालकाने नियमाचे पालन करावे.

तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण

---------------

आम्ही तीन प्रवासी घेत असलो तरी भाडे १० रुपये घेतोय. आरटीओने सर्व्हे करणे गरजेचे आहे. तो न केल्याने रिक्षा चालकांचे नुकसान होत आहे. त्यातही कोविड काळात रिक्षा चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. कुटुंबाची वाताहत सुरू असून आरटीओने लवकरात लवकर सर्व्हे करावा आणि भाडे आकारणीची समस्या सोडवावी.

दत्ता माळेकर, अध्यक्ष, भाजप, कल्याण जिल्हा वाहतूक सेल

----------------------