शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

रिक्षा भाडेवाढीने सर्वसामान्यांचे गणित आणखी कोलमडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : संपूर्ण ठाणे शहरात २५ हजार, तर जिल्हाभर सव्वालाखांच्या घरात अधिकृत रिक्षांची संख्या आहे. सध्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : संपूर्ण ठाणे शहरात २५ हजार, तर जिल्हाभर सव्वालाखांच्या घरात अधिकृत रिक्षांची संख्या आहे. सध्या १८ रुपये प्रती दीड किलोमीटर असलेल्या प्रवासी मीटर भाड्यात तीन रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे ते एकदम २१ रुपयांवर जाणार आहे. आधीच पेट्रोलसह इतर वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असतानाच, आता या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित आणखी कोलमडणार आहे. रिक्षा चालकांनी मात्र या भाडेवाढीचे समर्थन केले आहे.

कोरोनाच्या काळात रिक्षा चालकांनी नियमांचे पालन केले. मात्र, अनलॉकनंतर अनेक नियमांचे रिक्षा चालकांकडून सर्रास उल्लंघन होत आहे. दोनऐवजी चार ते पाच प्रवाशांची वाहतूक बेकायदेशीरपणे केली जाते. मास्क आणि सॅनिटायझरही अनेक रिक्षांमधून गायब झाले आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे रिक्षांनाही भाडेवाढ लागू केली आहे. खरे तर शहरी भागात सीएनजीवरील रिक्षांचे प्रमाण जास्त असताना, ही भाडेवाढ होणे योग्य नसल्याचे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले आहे. ही भाडेवाढ करण्याआधीच लोकमान्यनगर ते ठाणे रेल्वे स्थानक शेअररिंगच्या रिक्षामध्ये १८ रुपये भाडे लॉकडाऊनच्या आधी लागत होते. ते नंतर प्रति प्रवासी थेट ३० रुपये केले. ठाणे ते कळवादरम्यानचे भाडे १२ वरून १५ रुपये झाले. माजीवडा येथील प्रवासासाठीही २० वरून ३० रुपये केले आहेत. ठाणे स्थानक ते मानपाडा ३० वरून ४० रुपये केले आहेत. अशा अनेक ठिकाणी रिक्षा चालकांनी अघोषित भाडेवाढ प्रवाशांवर लादलेलीच होती, तशी ती सध्याही सुरू आहे. मीटरवरील काही रिक्षा चालकांनी प्रामाणिकपणे व्यवसाय केला. यात अनेकांवर कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली. अनेकांना बँकेचे हप्ते भरणेही मुश्कील झाले, परंतु काहींनी याही काळात ठाण्यातून घोडबंदर आणि मीरा रोड किंवा भिवंडीत जाण्यासाठी अव्वाच्या सव्वा भाडे घेतले. सध्याही ठाणे स्थानकातून मीरा रोड किंवा भिवंडीला जाण्यासाठी मीटरने ४०० ते ४५० रुपये होतात. त्याऐवजी ६०० ते ७०० रुपयांचे बोली भाडे सांगितले जाते. यात नवखा प्रवासी असेल, तर त्याच्याकडून याहीपेक्षा जास्त भाडे उकळले जाते. तीनहात नाका येथूनही घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात भाडे आकारले जाते. जांभळी नाका येथून रेल्वे स्थानक भागातून नौपाडा किंवा तीनहात नाका भागाकडे जाण्यासाठी भाडे नाकारले जाते. नौपाड्यातून ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठीही रिक्षा मिळत नाही. अनेकदा प्रवाशांसोबत अरेरावी केली जाते. भाडेवाढ करताना ती एकदम तीन रुपये नको, रिक्षा चालकांनीही सौजन्याने वागणूक दिली पाहिजे, अशा माफक अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.

.............

मुळात, २०१५ नंतर रिक्षाची भाडेवाढ झालेली नव्हती. भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी खटुआ यांच्या समितीने सुचविलेली भाडेवाढ शासनाने मान्य केली आहे. ती सुरुवातीच्या दीड किलोमीटरसाठी १८ वरून २१ रुपये होणार आहे.

जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

..........................

रिक्षा प्रवासाची भाडेवाढ ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही. जसे पेट्रोल, डिझेलचे दर वाढले, तसे खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणे अपेक्षित आहे. तसे झाले, तर रिक्षाप्रमाणे इतरही महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार नाही.

सरिता कांबळे, प्रवासी, ठाणे

..........................

सहा वर्षांपासून रिक्षाची भाडेवाढ नव्हती. सर्व स्पेअर पार्टच्या आणि सीएनजीच्या दरातही गेल्या सहा वर्षांत वाढ झाली. कोरोना काळातही रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यामुळे ही भाडेवाढ योग्यच आहे.

सुनिल वाघमारे, रिक्षा चालक, ठाणे

....................

शासनाने केलेली ही भाडेवाढ आहे. सर्वसामान्य रिक्षा चालकांना यातून दिलासा मिळेल.

बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

.................

भाडेवाढीचा निर्णय उत्तम. कोरोनाचे जे संकट आहे, त्यावर काही प्रमाणात तरी दिलासा मिळेल.

रवींद्र पाफाळे, रिक्षा चालक, मानपाडा, ठाणे

...........................

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे पगार निम्मे झालेत. त्यात रिक्षाची भाडेवाढ होणे, म्हणजे सामान्य प्रवाशांना मोठा भुर्दंड पडणार आहे. भाडेवाढ आणखी काही कालांतराने व्हायला अपेक्षित होती.

उत्तम लोखंडे, प्रवासी, ठाणे