शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांचे कधी राईट, तर कधी टाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात वाहतूक कोंडीची समस्या बिकट बनली असताना रिक्षांची वाढती संख्यादेखील वाहतुकीच्या मुळावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात वाहतूक कोंडीची समस्या बिकट बनली असताना रिक्षांची वाढती संख्यादेखील वाहतुकीच्या मुळावर आली आहे. यात रेल्वेस्थानक परिसर असो अथवा गल्लीबोळ याठिकाणी अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड सर्रासपणे उभे राहिले असून रिक्षाच रिक्षा चोहीकडे असे दृश्य शहरांमध्ये आहे. रिक्षांच्या वाढत्या संख्येचा व्यवसायावरदेखील परिणाम झाल्याने भाडे घेण्यासाठी रिक्षाचालकांची सुरू असलेली चढाओढ आणि मद्यपी चालकांचा अडेलतट्टूपणा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

कल्याण डोंबिवलीत रिक्षांचा आकडा सुमारे २० हजाराहून अधिक आहे. कल्याण रेल्वेस्थानक परिक्षेत्रात वाहतूककोंडी नागरिकांच्या पाचवीलाच पुजली गेली असताना वाहनांची वाढती संख्या याला प्रमुख कारणीभूत ठरत आहे. यात रिक्षांचा झालेला ओव्हरफ्लोदेखील तितकाच जबाबदार आहे. डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातील राममंदिर वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने तेथून हटविले. परंतु, ती जागा रिक्षा स्टॅण्डने बळकाविल्याने मंदिर हटवून आणि रस्ता रुंद करून केडीएमसीने काय साध्य केले? असा सवाल आहे. त्यातच सकाळ-दुपार-संध्याकाळी दोन्ही बाजूला रिक्षांचा पसारा पाहता महापालिकेच्या परिवहन बस उभ्या करण्यासाठीही जागा उरत नाही.

-----------------------------------------

इंदिरा गांधी चौक, डोंबिवली

या ठिकाणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहनचा थांबा आणि कार्यालय आहे. परंतु, या परिसराला रिक्षांचा विळखा पडल्याने परिवहनच्या बस प्रवासी घेण्यासाठी उभ्या करताना कोंडीचा फटका बसतो. या बसच्या मागे-पुढे रिक्षा उभ्या करून बसचे प्रवासीदेखील घेण्यासाठी रिक्षाचालकांकडून प्रयत्न केले जातात. खोणी, कल्याण-डोंबिवली, निवासी याठिकाणी जाणाऱ्या बसला परिणामी कमी प्रवासी उपलब्ध होतात.

-------------------------------

पनवेल बसथांबा, मानपाडा रोड डोंबिवली

इंदिरा चौकातील मानपाडा रोडवर पनवेल बसचा थांबा आहे. त्या ठिकाणीदेखील ज्यावेळेला बस येते अथवा तत्पूर्वी रिक्षाचालक आणि काळी-पिवळी जीप कारचा विळखा पडलेला दिसून येतो. याचा फटका तेथून मार्गस्थ होणाऱ्या वाहतुकीला बसून कोंडीची समस्या निर्माण होते.

--------------------------------

कल्याण बस आगार; रेल्वेस्थानक रोड

रेल्वेस्थानकाला लागूनच असलेल्या पश्चिमेकडील भागात राज्य परिवहनचे आगार आहे. त्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात बाहेरगांवाहून बस येतात. त्यांच्या मागेपुढे तसेच त्या मार्गावर येणाऱ्या केडीएमटी उपक्रमाच्या बसच्या आजूबाजूलादेखील रिक्षांचा विळखा पडलेला दिसून येतो. प्रवासी भाडे घेण्याच्या प्रयत्नात किरकोळ अपघात होऊन बसचालक आणि रिक्षाचालक यांच्यात वारंवार वाद उद्भवतात.

----------------------------------

मनमानी भाडे

रिक्षाचालकांना मीटर सक्ती असतानाही त्या नियमांचे पालन करण्याकडे संबंधितांचा कानाडोळा होत आहे. शेअर पद्धतीला विशेष प्राधान्य दिले जात असून कल्याणात एक स्टॅण्ड मीटरचा आहे. पण डोंबिवलीत याचा अभाव आहे. कोरोनाकाळात दोन प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा दिली आहे. परंतु, जादा प्रवासी घेऊन नियमांचे उल्लंघन होत असताना दोन प्रवासी नेताना तिसऱ्या प्रवाशाचे भाडे दोघा प्रवाशांकडून वसूल केले जात आहे.

------------------------------------

..त्यावेळी रिक्षा मिळत नाही

सकाळ, दुपार, संध्याकाळी रिक्षाचालकांकडून प्रवासी मिळण्यासाठी चढाओढ लागलेली दिसून येते. परंतुख रात्रीच्या वेळेस मात्र रिक्षा उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रवाशांची परवड होते. याचाही रिक्षा संघटनांनी विचार करणे गरजेचे आहे -

मानसी खोत प्रवाशी

----------------------

जादा भाडे आकारणे बंद करा

शेअर भाडे नेताना जादा प्रवासी भरले जातात. आधीच रस्ते खड्ड्यात गेले असता ओव्हरलोड होऊन रिक्षाला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर वाहतूक पोलीस आणि आरटीओचे नियंत्रण हवे, मनमानीपणे जादा भाडे आकारले जात आहे त्यावरही अंकुश हवा

- चैत्राली कदम, प्रवासी

--------------------------------------------------------------------------