शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

रिक्षाचालकांचे कधी राईट, तर कधी टाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात वाहतूक कोंडीची समस्या बिकट बनली असताना रिक्षांची वाढती संख्यादेखील वाहतुकीच्या मुळावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात वाहतूक कोंडीची समस्या बिकट बनली असताना रिक्षांची वाढती संख्यादेखील वाहतुकीच्या मुळावर आली आहे. यात रेल्वेस्थानक परिसर असो अथवा गल्लीबोळ याठिकाणी अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड सर्रासपणे उभे राहिले असून रिक्षाच रिक्षा चोहीकडे असे दृश्य शहरांमध्ये आहे. रिक्षांच्या वाढत्या संख्येचा व्यवसायावरदेखील परिणाम झाल्याने भाडे घेण्यासाठी रिक्षाचालकांची सुरू असलेली चढाओढ आणि मद्यपी चालकांचा अडेलतट्टूपणा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

कल्याण डोंबिवलीत रिक्षांचा आकडा सुमारे २० हजाराहून अधिक आहे. कल्याण रेल्वेस्थानक परिक्षेत्रात वाहतूककोंडी नागरिकांच्या पाचवीलाच पुजली गेली असताना वाहनांची वाढती संख्या याला प्रमुख कारणीभूत ठरत आहे. यात रिक्षांचा झालेला ओव्हरफ्लोदेखील तितकाच जबाबदार आहे. डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातील राममंदिर वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने तेथून हटविले. परंतु, ती जागा रिक्षा स्टॅण्डने बळकाविल्याने मंदिर हटवून आणि रस्ता रुंद करून केडीएमसीने काय साध्य केले? असा सवाल आहे. त्यातच सकाळ-दुपार-संध्याकाळी दोन्ही बाजूला रिक्षांचा पसारा पाहता महापालिकेच्या परिवहन बस उभ्या करण्यासाठीही जागा उरत नाही.

-----------------------------------------

इंदिरा गांधी चौक, डोंबिवली

या ठिकाणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहनचा थांबा आणि कार्यालय आहे. परंतु, या परिसराला रिक्षांचा विळखा पडल्याने परिवहनच्या बस प्रवासी घेण्यासाठी उभ्या करताना कोंडीचा फटका बसतो. या बसच्या मागे-पुढे रिक्षा उभ्या करून बसचे प्रवासीदेखील घेण्यासाठी रिक्षाचालकांकडून प्रयत्न केले जातात. खोणी, कल्याण-डोंबिवली, निवासी याठिकाणी जाणाऱ्या बसला परिणामी कमी प्रवासी उपलब्ध होतात.

-------------------------------

पनवेल बसथांबा, मानपाडा रोड डोंबिवली

इंदिरा चौकातील मानपाडा रोडवर पनवेल बसचा थांबा आहे. त्या ठिकाणीदेखील ज्यावेळेला बस येते अथवा तत्पूर्वी रिक्षाचालक आणि काळी-पिवळी जीप कारचा विळखा पडलेला दिसून येतो. याचा फटका तेथून मार्गस्थ होणाऱ्या वाहतुकीला बसून कोंडीची समस्या निर्माण होते.

--------------------------------

कल्याण बस आगार; रेल्वेस्थानक रोड

रेल्वेस्थानकाला लागूनच असलेल्या पश्चिमेकडील भागात राज्य परिवहनचे आगार आहे. त्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात बाहेरगांवाहून बस येतात. त्यांच्या मागेपुढे तसेच त्या मार्गावर येणाऱ्या केडीएमटी उपक्रमाच्या बसच्या आजूबाजूलादेखील रिक्षांचा विळखा पडलेला दिसून येतो. प्रवासी भाडे घेण्याच्या प्रयत्नात किरकोळ अपघात होऊन बसचालक आणि रिक्षाचालक यांच्यात वारंवार वाद उद्भवतात.

----------------------------------

मनमानी भाडे

रिक्षाचालकांना मीटर सक्ती असतानाही त्या नियमांचे पालन करण्याकडे संबंधितांचा कानाडोळा होत आहे. शेअर पद्धतीला विशेष प्राधान्य दिले जात असून कल्याणात एक स्टॅण्ड मीटरचा आहे. पण डोंबिवलीत याचा अभाव आहे. कोरोनाकाळात दोन प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा दिली आहे. परंतु, जादा प्रवासी घेऊन नियमांचे उल्लंघन होत असताना दोन प्रवासी नेताना तिसऱ्या प्रवाशाचे भाडे दोघा प्रवाशांकडून वसूल केले जात आहे.

------------------------------------

..त्यावेळी रिक्षा मिळत नाही

सकाळ, दुपार, संध्याकाळी रिक्षाचालकांकडून प्रवासी मिळण्यासाठी चढाओढ लागलेली दिसून येते. परंतुख रात्रीच्या वेळेस मात्र रिक्षा उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रवाशांची परवड होते. याचाही रिक्षा संघटनांनी विचार करणे गरजेचे आहे -

मानसी खोत प्रवाशी

----------------------

जादा भाडे आकारणे बंद करा

शेअर भाडे नेताना जादा प्रवासी भरले जातात. आधीच रस्ते खड्ड्यात गेले असता ओव्हरलोड होऊन रिक्षाला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर वाहतूक पोलीस आणि आरटीओचे नियंत्रण हवे, मनमानीपणे जादा भाडे आकारले जात आहे त्यावरही अंकुश हवा

- चैत्राली कदम, प्रवासी

--------------------------------------------------------------------------