शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

रिक्षाचालकांच्या आर्थिक मदतीची वेबसाईट होते हँग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST

कल्याण : लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांच्या बँक खात्यात १,५०० रुपये जमा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले. मात्र, त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया एक ...

कल्याण : लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांच्या बँक खात्यात १,५०० रुपये जमा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले. मात्र, त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया एक महिन्यानंतर सुरू झाली आहे. त्यासाठी सरकारच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. मात्र, ही वेबसाईट सारखी हँग होत असल्याने रिक्षाचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोजी बंद असली तरी रोटी बंद होणार नाही, असे सांगून हातावर पोट असलेल्यांना जवळपास चार हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. रिक्षाचालकांच्या खात्यात प्रत्येकी १,५०० रुपये जमा करण्यात येतील, असे सांगितले. परंतु, ही मदत तुटपुंजी आहे. पहिल्या लॉकडाऊनचा कालावधी हा १५ ते ३० एप्रिल होता. प्रत्येक दिवसाला १०० रुपये याप्रमाणे १,५०० रुपये, अशा स्वरूपात ही मदत होती. मात्र, नंतर हा लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने ३० मे पर्यंत वाढविण्यात आला.

सरकारने १५ एप्रिलच्या आधी केलेल्या घोषणेनुसार पैसे रिक्षाचालकांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरूच झाली नाही. वेबसाईट बनविण्यात एक महिना गेला. आता वेबसाईट तयार झाल्यावर रविवारपासून रिक्षाचालकांनी मदतीसाठी कागदपत्रासह नोंदणी सुरू केली आहे. मात्र, वारंवार ही वेबसाईट हँग होत आहे. सोमवारी सकाळी तांत्रिक कारणांमुळे वेबसाईट दोन तास हँग होती. राज्यभरातून रिक्षाचालक एकाच वेळी ऑनलाईन कागदपत्रे सादर करीत असल्याने ही वेबसाइट हँग होते. ही समस्या येऊ नये, यासाठी सरकारने काळजी घेतली पाहिजे, अशी मागणी रिक्षाचालक-मालक संघटनेचे कल्याणचे पदाधिकारी संतोष नवले यांनी केली आहे.

आतापर्यंत ७० जणांचीच नोंदणी

- राज्यभरातील १,५०० रुपये मदतीच्या लाभार्थी रिक्षाचालकांची संख्या आठ लाख १२ हजार आहे. त्यापैकी कल्याण आरटीओ हद्दीत ६० हजार रिक्षाचालक आहेत. परंतु, आतापर्यंत ७० रिक्षाचालकांची नोंदणी झाली आहे. वेबसाईट सारखी हँग होत असल्याने प्रसंगी ऑफलाईन प्रक्रिया राबवावी, जेणेकरून रिक्षाचालकांना लवकर मदत मिळेल.

- लॉकडाऊनमुळे सायबर कॅफे उघडत नाहीत. अनेक रिक्षाचालकांना ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती नाही. कल्याण रिक्षाचालक-मालक संघटनेच्या कार्यालयातून रिक्षाचालकांची माहिती वेबसाईटवर अपलोड केली जात आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येतील रिक्षाचालकांचे ऑनलाईन काम एकाच संगणकावरून करणे शक्य होणार नाही. या अडचणी सरकारने लक्षात घेतल्या पाहिजेत, याकडे रिक्षाचालकांनी लक्ष वेधले आहे.

-----------------------