शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांच्या आर्थिक मदतीची वेबसाईट होते हँग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST

कल्याण : लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांच्या बँक खात्यात १,५०० रुपये जमा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले. मात्र, त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया एक ...

कल्याण : लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांच्या बँक खात्यात १,५०० रुपये जमा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले. मात्र, त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया एक महिन्यानंतर सुरू झाली आहे. त्यासाठी सरकारच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. मात्र, ही वेबसाईट सारखी हँग होत असल्याने रिक्षाचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोजी बंद असली तरी रोटी बंद होणार नाही, असे सांगून हातावर पोट असलेल्यांना जवळपास चार हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. रिक्षाचालकांच्या खात्यात प्रत्येकी १,५०० रुपये जमा करण्यात येतील, असे सांगितले. परंतु, ही मदत तुटपुंजी आहे. पहिल्या लॉकडाऊनचा कालावधी हा १५ ते ३० एप्रिल होता. प्रत्येक दिवसाला १०० रुपये याप्रमाणे १,५०० रुपये, अशा स्वरूपात ही मदत होती. मात्र, नंतर हा लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने ३० मे पर्यंत वाढविण्यात आला.

सरकारने १५ एप्रिलच्या आधी केलेल्या घोषणेनुसार पैसे रिक्षाचालकांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरूच झाली नाही. वेबसाईट बनविण्यात एक महिना गेला. आता वेबसाईट तयार झाल्यावर रविवारपासून रिक्षाचालकांनी मदतीसाठी कागदपत्रासह नोंदणी सुरू केली आहे. मात्र, वारंवार ही वेबसाईट हँग होत आहे. सोमवारी सकाळी तांत्रिक कारणांमुळे वेबसाईट दोन तास हँग होती. राज्यभरातून रिक्षाचालक एकाच वेळी ऑनलाईन कागदपत्रे सादर करीत असल्याने ही वेबसाइट हँग होते. ही समस्या येऊ नये, यासाठी सरकारने काळजी घेतली पाहिजे, अशी मागणी रिक्षाचालक-मालक संघटनेचे कल्याणचे पदाधिकारी संतोष नवले यांनी केली आहे.

आतापर्यंत ७० जणांचीच नोंदणी

- राज्यभरातील १,५०० रुपये मदतीच्या लाभार्थी रिक्षाचालकांची संख्या आठ लाख १२ हजार आहे. त्यापैकी कल्याण आरटीओ हद्दीत ६० हजार रिक्षाचालक आहेत. परंतु, आतापर्यंत ७० रिक्षाचालकांची नोंदणी झाली आहे. वेबसाईट सारखी हँग होत असल्याने प्रसंगी ऑफलाईन प्रक्रिया राबवावी, जेणेकरून रिक्षाचालकांना लवकर मदत मिळेल.

- लॉकडाऊनमुळे सायबर कॅफे उघडत नाहीत. अनेक रिक्षाचालकांना ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती नाही. कल्याण रिक्षाचालक-मालक संघटनेच्या कार्यालयातून रिक्षाचालकांची माहिती वेबसाईटवर अपलोड केली जात आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येतील रिक्षाचालकांचे ऑनलाईन काम एकाच संगणकावरून करणे शक्य होणार नाही. या अडचणी सरकारने लक्षात घेतल्या पाहिजेत, याकडे रिक्षाचालकांनी लक्ष वेधले आहे.

-----------------------