शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

रिक्षा संघटनेमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:20 IST

अध्यक्ष पाटील की यादव? : दोघेही शिवसेनेचेच पदाधिकारी

उल्हासनगर : शहरातील शहीद मारोती जाधव रिक्षाचालक-मालक संघटनेचा वाद चव्हाट्यावर आला आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी राजा पाटील की शेखर यादव, असा वाद रंगला असून लोकशाही मार्गाने निवडणूक घेऊन अध्यक्षपदी निवडून आल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.रिक्षाचालक-मालक संघटनेचा शहरात दबदबा असून शेकडो रिक्षाचालक संघटनेचे सदस्य आहेत. अनेक वर्षांपासून संघटनेतील दोन गट आमने-सामने उभे ठाकले आहेत. पाटील शाखाप्रमुख तर यादव नगरसेवक आहेत. दोन्ही पदाधिकारी शिवसेनेचे असून दोघांत दिलजमाई करण्यास स्थानिक नेत्यांसह वरिष्ठ नेते अपयशी ठरले आहेत. पाटील यांनी १ एप्रिलला स्वामी शांतिप्रकाश सभागृहात रिक्षाचालक-मालकांची सर्वसाधारण सभा बोलावून अध्यक्षपदासह इतर कार्यकारिणीची चर्चा केली. तर, २० एप्रिलला अध्यक्षांसह कार्यकारिणीची निवडणूक होऊन लोकशाही पद्धतीने पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली.पाटील यांनी संघटनेची कार्यकारिणी जाहीर करून कामगार आयुक्तांसह पोलीस उपायुक्त, संबंधित पोलीस ठाणे यांना तशी प्रत दिली. तसेच ३५० पेक्षा जास्त रिक्षाचालक-मालकांची सदस्ययादी व त्यांची सदस्यपावती दिली. या प्रकाराने संघटनेचे प्रमुख व नगरसेवक यादव यांनी घाईगडबडीत रविवारी दुपारी १ वाजता लालचक्की चौकातील वाघमारे हॉलमध्ये रिक्षाचालक-मालकांची सर्वसाधारण बैठक बोलावली. बैठकीला चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी बैठकीनंतर यादव यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. एकाच संघटनेचे दोन अध्यक्ष झाल्याने संघटनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.लोकशाही पद्धतीने निवड करावीशेखर यादव हे माझे चांगले मित्र असून आम्ही दोघेही एकाच पक्षात काम करतो. बहुतांश रिक्षाचालक-मालक संघटनेचा पाठिंबा मला असून ३५० पेक्षा जास्त रिक्षाचालक-मालकांनी संघटनेच्या अधिकृत सदस्यपदाच्या पावत्या फाडल्या आहेत, असा दावा त्यांनी केला. शहीद मारोती जाधव रिक्षा संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व असून अध्यक्षपदाची निवड लोकशाही पद्धतीने होते. कोणत्याही संघटनेचा पदाधिकारी येथे येऊन थेट अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देत नाही, अशी माहिती पाटील यांनी दिली. संघटना व रिक्षाचालकांच्या हितासाठी सदैव लढणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे