शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
2
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
4
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
5
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
6
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
7
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
8
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
9
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
10
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
11
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
12
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
13
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
14
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
15
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
16
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
17
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
18
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
19
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
20
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना

हंगामी भातशेतीसाठी भातसाचे पाणी

By admin | Updated: November 16, 2015 02:04 IST

भातसा कालव्याचे पाणी २०१५-१६ च्या सिंचन हंगामात शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

वासिंद : भातसा कालव्याचे पाणी २०१५-१६ च्या सिंचन हंगामात शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.भातसा धरणातून वसईकडे गेलेल्या भातसा उजव्या कालव्याद्वारे किमी २ ते ५४ दरम्यानच्या शेतकऱ्यांना हंगामी स्वरूपात भातशेती व भाजीपाला करण्याकरिता दरवर्षी पाणी सोडले जाते. या वर्षी पाऊस कमी पडल्याने ते सोडले जाणार नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली होती. त्यामुळे हंगाम लागवडीसह वीटभट्टी व्यावसायिक, या पाण्यावर अवलंबित छोटे धंदेवाईक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, या वर्षी कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार नाही, अशा प्रकारच्या कुठल्याही नोटिसा बजावल्या नसून ते शेतीसाठी उपलब्ध केले जाणार आहे.दरम्यान, या उजव्या कालव्यांतर्गत ५५ गावपाडे ओलिताखाली असून १४९० हेक्टर लागवड क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. तसेच गेल्या तीन-चार वर्षांपासून कालव्याची दुरुस्ती व साफसफाईची कामे झालेली नाहीत. त्यामुळे पाण्याची वहनक्षमता कमी झाली असून ठिकठिकाणी कालव्याला गळतीचे प्रमाण अधिक आहे. याबाबत, शेतकऱ्यांची नाराजी असून पाणीगळती रोखणे व कालव्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने याकडे लक्ष वेधावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. त्याबाबत पाटबंधारे खाते काय करते, याकडे लक्ष लागले आहे.