शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

हंगामी भातशेतीसाठी भातसाचे पाणी

By admin | Updated: November 16, 2015 02:04 IST

भातसा कालव्याचे पाणी २०१५-१६ च्या सिंचन हंगामात शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

वासिंद : भातसा कालव्याचे पाणी २०१५-१६ च्या सिंचन हंगामात शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.भातसा धरणातून वसईकडे गेलेल्या भातसा उजव्या कालव्याद्वारे किमी २ ते ५४ दरम्यानच्या शेतकऱ्यांना हंगामी स्वरूपात भातशेती व भाजीपाला करण्याकरिता दरवर्षी पाणी सोडले जाते. या वर्षी पाऊस कमी पडल्याने ते सोडले जाणार नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली होती. त्यामुळे हंगाम लागवडीसह वीटभट्टी व्यावसायिक, या पाण्यावर अवलंबित छोटे धंदेवाईक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, या वर्षी कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार नाही, अशा प्रकारच्या कुठल्याही नोटिसा बजावल्या नसून ते शेतीसाठी उपलब्ध केले जाणार आहे.दरम्यान, या उजव्या कालव्यांतर्गत ५५ गावपाडे ओलिताखाली असून १४९० हेक्टर लागवड क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. तसेच गेल्या तीन-चार वर्षांपासून कालव्याची दुरुस्ती व साफसफाईची कामे झालेली नाहीत. त्यामुळे पाण्याची वहनक्षमता कमी झाली असून ठिकठिकाणी कालव्याला गळतीचे प्रमाण अधिक आहे. याबाबत, शेतकऱ्यांची नाराजी असून पाणीगळती रोखणे व कालव्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने याकडे लक्ष वेधावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. त्याबाबत पाटबंधारे खाते काय करते, याकडे लक्ष लागले आहे.