शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

विकास आराखडा पुन्हा तपासणार

By admin | Updated: June 25, 2016 01:28 IST

पालघर प्रारूप विकास आराखडा नियोजन समितीने पालघर शहराच्या विकास आराखड्याविरोधात घेतलेल्या भूमिकेमध्ये तथ्य असल्याचे दिसत असून समितीने सुचवलेल्या सूचना मान्य करता

पालघर : पालघर प्रारूप विकास आराखडा नियोजन समितीने पालघर शहराच्या विकास आराखड्याविरोधात घेतलेल्या भूमिकेमध्ये तथ्य असल्याचे दिसत असून समितीने सुचवलेल्या सूचना मान्य करता येतील का, हे नगर विकास विभागाकडून तपासण्यात येईल, याउपरही काही मार्ग निघाला नाही तर विकास आराखडा रद्द करता येऊ शकतो का, याचाही विचार केला जाईल, असे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत जाहीर केले. पालघर शहराचा जाहीर करण्यात आलेला प्रारूप विकास आराखडा हा गैरमार्गाने, बिल्डरधार्जिण्या व शेतकरी तसेच स्थानिकांवर अन्याय करणारा असल्याने मागील तीन वर्षापासून या अन्यायकारक विकास आराखड्याविरोधात स्थानिकांनी समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलने, उपोषणे उभारली होती. तर माजी दिवंगत आमदार कृष्णा घोडा आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चेचे आश्वासन दिले होते. शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी खासदार चिंतामण वनगा, आदिवासी विकास आणि पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार हितेंद्र ठाकूर, आ. विलास तरे, आ. पास्कल धनारे, आ. अमित घोडा, आ.निरंजन डावखरे, पालघरच्या नगराध्यक्षा प्रियांका पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे, संघर्ष समिती अध्यक्ष रमाकांत पाटील, सदस्य व नगरविकास सचिव नितीन करीर उपस्थित होते.प्रारूप विकास आराखडा तयार करताना बिल्डर, वास्तुविशारद, नगररचना कार्यालय पालघर यांनी संगनमताने बिल्डरांच्या जागावर आरक्षण न टाकता गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी, त्यांची घरे, मंदिरे यावर आरक्षणे टाकली होती. पालघर नगरपरिषदेच्या २९ एप्रिल २०१३ च्या सर्वसाधारण सभेतही विकास आराखडा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा ठराव घेण्यात आला होता. तरीही हा अन्यायकारक विकास आराखडा शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न नगररचना विभाग करीत असल्याच्या निषेधार्थ प्रारूप विकास आराखडा संघर्ष समितीचे अध्यक्ष रमाकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो स्थानिकांनी तीन वर्षांपासून लढा उभारला होता. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांबाबत शासन नेहमीच सकारात्मक असून पालघर विकास आराखडा तयार करताना शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. विकास आराखड्याबाबत शेतकऱ्यांच्या ज्या काही सूचना, हरकती असतील त्या त्यांनी संबंधित विभागाकडे १५ दिवसांत पुन्हा नोंदवाव्यात त्यावर शासन पातळीवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.आज झालेल्या बैठकीदरम्यान, प्रारूप विकास आराखड्याचा जमीन वापर नकाशा हा चुकीचा आणि टाकण्यात आलेले आरक्षण हे बेकायदेशीरपणे असल्याचे मुख्यमंत्र्यांना पटवून देण्यात संघर्ष समिती यशस्वी ठरली. येत्या पंधरा दिवसांत संघर्ष समितीने सुचवलेल्या बदलासंदर्भात नगर विकास विभाग गांभीर्यपूर्वक विचार करताना त्यात दुरु स्त्या करता येतील का, याबाबत निर्णय घेईल. त्याउपरही काही मध्यस्थीपूर्वक निर्णय निघाला नाही तर हा पालघरचा प्रारूप विकास आराखडा रद्द करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. सरकार हे शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या सोबत राहील, असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.