शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

समीक्षा लोप पावत चालली आहे

By admin | Updated: January 3, 2015 01:03 IST

कुठल्याही प्रकारची समीक्षा आजच्या काळात सर्व वृत्तपत्रांमधून लोप पावत चालली आहे. बौद्धिक दहशतवाद गेली ५० वर्षे महाराष्ट्रात राज्य करीत आहे.

मुंबई : कुठल्याही प्रकारची समीक्षा आजच्या काळात सर्व वृत्तपत्रांमधून लोप पावत चालली आहे. बौद्धिक दहशतवाद गेली ५० वर्षे महाराष्ट्रात राज्य करीत आहे. समीक्षेला छाट देणे लोकशाहीला बाधक असून, त्या ठिकाणी फक्त ठोकशाहीचे अस्तित्व असते, असे प्रतिपादन चित्रपट अभ्यासक आणि दिग्दर्शक अरुण खोपकर यांनी केलेमॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस आणि सुभाष भेंडे कुटुंबीय यांच्या सहयोगाने देण्यात येणारा ‘सुभाष भेंडे नवोदित लेखक’ पुरस्कार या वर्षी गणेश मतकरी यांच्या ‘सिनेमॅटिक’ या समीक्षा ग्रंथाला देण्यात आला. ११ हजार १११ रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लोकशाही समाजाबद्दलची अतिशय तळमळ, भान तसेच सिनेमाध्यमाचे सर्व बाजूने अवधान असणे गरजेचे असते. हे अवधान गणेश मतकरी यांच्या लेखणीत आहे. अशा प्रकारची समीक्षा करण्याचे समग्र भान गणेश मतकरी यांच्या ठायी आहे, अशा शब्दांत लेखकाबद्दलचे विचार अरुण खोपकर यांनी व्यक्त केले.समीक्षेच्या पुस्तकाला पुरस्कार मिळणे हे सकारात्मक आहे. वृत्तपत्रीय समीक्षा मजबूत झाली तर इतर प्रकारची समीक्षाही चांगली होईल. चित्रपट कसा पाहावा, याबाबत दिशा नसल्याने तो वरवर पाहिला जातो़ त्यासाठी दिशादर्शक लेखन होणे आवश्यक आहे. केवळ करमणूक म्हणून न पाहता त्याचा अन्वयार्थ लावणे आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणेही तेवढेच आवश्यक असल्याचे मत गणेश मतकरी यांनी या वेळी व्यक्त केले. (प्रतिनिधी)