शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

राज्य नाट्यस्पर्धेचा निकाल गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 03:26 IST

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कलासंचालनालयाच्या नाट्य विभागातर्फे पार पडलेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धच्या प्राथमिक फेरीचा कल्याण केंद्राचा निकाल अद्यापही लागलेला नाही.

प्रशांत माने कल्याण : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कलासंचालनालयाच्या नाट्य विभागातर्फे पार पडलेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धच्या प्राथमिक फेरीचा कल्याण केंद्राचा निकाल अद्यापही लागलेला नाही. स्पर्धा होऊन आठ दिवसांचा कालावधी लोटल्यावरही निकाल जाहीर न होण्यामागे गौडबंगाल काय? असा प्रश्न स्पर्धेतील सहभागी हौशी नाट्यसंस्थांना पडला आहे. स्पर्धा संपली, की लागलीच दुसºया दिवशी निकाल दिला जातो. परंतु निकाल इतक्या विलंबाने लागणे आजवरच्या इतिहासात कधीच घडलेले नाही, अशी मते जाणकारांकडून व्यक्त होत आहेत.महाराष्ट्र राज्य नाट्य विभागातर्फे संपूर्ण राज्यभरात २५ ते २६ ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण केंद्रावरील स्पर्धा ६ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत २४ हौशी नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला होता. नेहमी या स्पर्धा कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पार पडतात. परंतु डागडुजीच्या कामासाठी ते रंगमंदिर बंद असल्याने या स्पर्धा डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले कलामंदिरात घेण्यात आल्या. स्पर्धा संपली की त्या रात्रीच निकालाचे काम परीक्षकांकडून पूर्ण केले जाते आणि तो निकाल सीलबंद पध्दतीने केंद्र समन्वयाकडे दिला जातो. समन्वयकाकडून तो सांस्कृतिक संचालनालयाकडे पाठवला जातो. मग संबंधित कला संचालनालय कार्यालयाकडून निकाल जाहीर केला जातो. ही प्रक्रिया साधारण दोन दिवस चालते. परंतु आजमितीला आठ दिवसांचा कालावधी उलटूनही निकाल जाहीर झालेला नाही. राज्यातील इतर केंद्रावरील निकाल जाहीर झाला असताना कल्याण केंद्रावरील निकालाला विलंब का? असा सवाल उपस्थित होत आहे. कल्याण केंद्राच्या समन्वयकांकडूनही योग्य प्रकारे उत्तरे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.>अंतिम स्पर्धेसाठीतयारी कशी करायची?राज्य नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडल्यानंतर यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक म्हणून तीन नाटके निवडली जातात. याचबरोबर उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रकाशन, अभिनय म्हणूनही गौरविण्यात येते. प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावलेली दोन नाटके अंतिम फेरीसाठी पाठविली जातात. ही स्पर्धा साधारण जानेवारी महिन्यात होते. परंतु कल्याण केंद्राचा निकाल जाहीर न झाल्याने नेमका प्रथम आणि द्वितीय क्रमांक कोणाला मिळाला आहे, याची माहिती मिळालेली नाही. अंतिम स्पर्धेची तारीखही जवळ आल्याने त्या स्पर्धेसाठी तयारी करायची की नाही व ती कशी, असा यक्षप्रश्नही सहभागी स्पर्धकांना पडला आहे.>‘असे कधीच घडले नाही’ : आजवरचा इतिहास पाहता स्पर्धा संपताच दुसºया किंवा तिसºया दिवशी निकाल दिला जातो. परंतु कल्याण केंद्राचा निकाल तब्बल आठ दिवस उलटूनही लागत नाही हे चुकीचे आहे. सहभागी नाट्यसंस्था आतुरतेने निकालाची वाट पाहात आहेत. विलंब का होतोय याबाबत संबंधित सांस्कृतिक कलासंचालनालयाने तातडीने माहिती द्यावी, असे मत नाट्य परिषद कल्याण शाखेचे उपाध्यक्ष सुरेश पवार यांनी व्यक्त केले.>‘निकाल त्या दिवशीच पाठविला’ : यासंदर्भात केंद्र समन्वयक सुधीर रोकडे यांच्याशी संपर्क साधला असता, माझी जबाबदारी ही केंद्र समन्वयक म्हणून होती. ज्या दिवशी स्पर्धा पार पडली त्यादिवशीच परीक्षकांकडून निकाल घेऊन तो सीलबंद अवस्थेत सांस्कृतिक कलासंचालनालयाकडे पाठविला आहे. निकाल जाहीर करायला विलंब का लागला, याबाबत मी काहीही सांगू शकत नाही असे ते म्हणाले.

टॅग्स :kalyanकल्याण