शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कमी पावसामुळे भात उत्पादनावर परिणाम

By admin | Updated: November 2, 2015 01:37 IST

डहाणू तालुक्यात सध्या भातकापणी तसेच भात झोडणीचा हंगाम सुरु आहे. मात्र पावसाचे कमी प्रमाण व अनियमितता यामुळे भाताच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे

शशिकांत ठाकूर, कासा डहाणू तालुक्यात सध्या भातकापणी तसेच भात झोडणीचा हंगाम सुरु आहे. मात्र पावसाचे कमी प्रमाण व अनियमितता यामुळे भाताच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यात मोठी घट झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सरासरी ४०.६३ मीमी पाऊस कमी झाला आहे.तालुक्यात यंदा सरासरी केवळ ६७.१ मि.मि. पावसाची नोंद झाली. तालुक्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते. यामध्ये गरवी भातशेती ९,५०० हेक्टर तर हळवी भातशेती ५५०० हेक्टर क्षेत्रावर केली जाते. सूर्या कालव्याच्या पाण्यावर उन्हाळ्यात सुमारे ७५०० हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते. तालुक्यात यंदा पाऊस वेळेवर सुरू झाला नाही आणि पाऊस सुरु झाल्यानंतरही त्यात नियमीतता नाही. त्यामुळेही भाता लागवडीवर परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भातपेरणी झाल्यानंतर २१ दिवसाच्या कालावधीत रोप तयार होऊन लागवड होणे गरजेचे आहे. मात्र लागवडीसाठी पाऊसच वेळेवर सुरु न झाल्याने शेतकऱ्यांना महिनाभर भात रोपणासाठी वाट पहावी लागली. लागवडीनंतरही पाऊस खूप कमी तसेच वेळेवर न झाल्याने पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे काही ठिकाणी उष्णतेमुळे पिके होरपळून गेली. तसेच कणीस बाहेर येण्याच्या कालावधीत तसेच रोपाला फुटवा येणाच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी पाऊसच झाला नाही. तर काही शेतकऱ्यांनी बाजारातून संकरीत जातीच्या वाणाची खरेदी केली असता ते बियाणे बनावट असल्याने दाणे उगवलेच नसल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारी मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. तसेच पावसा अभावी व रोगांच्या प्रादुर्भावामुळे भात उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतकरी जयेंद्र ठाकूर यांनी सांगितले.