शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

मॉलमुळे पुस्तकविक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:50 IST

यंदा जेमतेम ३०-४० टक्के व्यवसाय

- जान्हवी मोर्ये डोंबिवली : जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर शालेय उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाते. परंतु, मॉलमध्ये या वस्तूंची खरेदी करण्याकडे अनेक ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर पाणी फिरले आहे. यंदा ३० ते ४० टक्केच व्यवसाय झाला आहे, अशी माहिती बुक सेलर असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रेय माळी यांनी दिली आहे.माळी म्हणाले, शाळांमधून शालेय उपयोगी साहित्य देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीनचार वर्षांपासून त्याचा फटका आमच्या व्यवसायाला बसतच होता. तसेच मॉलमध्ये वस्तूंच्या खरेदीवर २५ टक्क्यांची सूट देण्यात येत होती. त्यामुळे ग्राहकांचा कल हा मॉलमध्ये खरेदी करण्याकडे यंदा जास्त होता. छोट्या व्यावसायिकांचा यामुळे ३० ते ४० टक्के व्यवसाय कमी झाला.बुक सेलर असोसिएशनमध्ये डोंबिवलीत २१६, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर येथील १४०, भिवंडीतील १० आणि दिव्यातील १५ विके्रते आहेत. या सर्व विक्रेत्यांना यंदा व्यवसाय कमी झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी शालेय वस्तूंची उलाढाल ही पाच कोटींची झाली होती. यंदाच्या वर्षी ती कमी होऊन पावणेतीन कोटींवर गेली आहे. आम्ही छोटे विक्रेते असलो, तरीही ग्राहकांना १० टक्के सूट देतो. पहिली ते नववीपर्यंतच्या शालेय वस्तूंच्या खरेदीला फटका बसल्याचे दिसून येत आहे. आता अकरावीची पुस्तके बाजारात येणे बाकी आहे. या पुस्तकांमुळे व्यवसायात थोडीफार भर पडेल, अशी आशा व्यावसायिकांना आहे. आमचा वर्कबुकचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे. वर्कबुकही शाळेतून दिली जातात. त्यामुळे त्यांचाही ९० टक्के व्यवसाय कमी झाला आहे. शाळांमधून शालेय साहित्य दिले जाते, पण त्यावर कोणतीही सूट दिली जात नाही. पण, पालकांना शाळेतून खरेदी करावे लागते. या सर्वांमुळे छोट्या व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे, असे ते पुढे म्हणाले.शाळाही पुरवतात शालेय वस्तूएका पुस्तकविक्रेत्याने सांगितले, यंदाच्या वर्षी आमचा व्यवसाय कमी झाला. सुरुवातीला ही समस्या एका पुस्तकविक्रेत्यापुरती मर्यादित असल्याचे वाटत होते. परंतु, संघटनेतील इतर विक्रेत्यांशी चर्चा केल्यानंतर व्यवसाय कमी होण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मॉलमधून वाढती खरेदी याबरोबरच शाळाही दरवर्षी विद्यार्थ्यांना पुस्तके पुरवत असल्याचे आढळून आले. त्यामुळे व्यवसायास फटका बसत आहे. परिणामी, यंदाच्या वर्षी शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी नेहमीसारखी गर्दी दुकानांमध्ये झाली नाही.