शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
2
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
3
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
4
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
6
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
7
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
8
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
9
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
10
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
11
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
12
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
13
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
14
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
15
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
16
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
17
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
18
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
19
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
20
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

येऊरमध्ये पर्यटकांना प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धबधबे आणि पर्यटन स्थळांवर बंदी असतानादेखील अनेक पर्यटक लपूनछपून शहराला लागून असलेल्या येऊर येथील धबधबे ...

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धबधबे आणि पर्यटन स्थळांवर बंदी असतानादेखील अनेक पर्यटक लपूनछपून शहराला लागून असलेल्या येऊर येथील धबधबे आणि तलावामध्ये जाऊन पोहण्याचा व पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यास जात आहे. अशा अतिउत्साहीपणामुळे येथील तलावात बुडून पाचजणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. या घटनांनंतर वन विभाग आणि पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे आता येऊर पर्यटनस्थळी प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वन विभागाने दिला असून, तसेच फलकदेखील जागोजागी लावले आहेत.

ठाणे शहरात निसर्गाने नटलेल्या संजय गांधी येऊर या पर्यटन स्थळी पावसाळ्याच्या काळात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसह अतिउत्साही पर्यटकांचादेखील वावर वाढत असल्याचे दिसून येते. अशाच अतिउत्साही पर्यटकांच्या वावराला आवर घालण्यासाठी वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. येऊरच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये तीन वर्षांची शिक्षा आणि २५ हजारांच्या दंडाची तरतूद आहे, अशा आशयाचे फलक वनविभागाने येऊरच्या प्रतिबंधित क्षेत्रात लावून, तसेच पहारा देऊन पर्यटकांना प्रवेशबंदी केली. पावसाळ्याच्या काळात अनेक हौशी पर्यटक रविवार सुट्टीचा दिवस निसर्गाच्या व धबधब्यांच्या सान्निध्यात घालविण्यासाठी व पार्ट्यांचे फड रंगविण्यासाठी येऊरचा रस्ता धरत असतात. यामुळे एक तर जंगल परिसरातील शांतत भंग होत असते, तर दुसरीकडे पर्यटकांकडून फेकण्यात येणाऱ्या जेवणाच्या डिश, पाण्याच्या बाटल्या फेकण्यात येत असल्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होत असते. त्यात जंगलातील तलावात पोहण्याचा आनंददेखील लुटण्यासाठी जात असतात. असेच मागील दहा ते १५ दिवसांपूर्वी पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या पाच मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर वन विभाग आणि पोलीस यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. याची गांभीर्याने दाखल घेऊन जंगलातील निषिद्ध क्षेत्रात वनविभागाने फलक लावले असून, खडा पहाराही देण्यात येत आहे. त्यामुळे येऊरच्या जंगलात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटकांचा वावर

वन्यजिवांचा वावर असलेल्या अरण्यात पर्यटकांना प्रतिबंध असतानाही सुरक्षेच्या अभाव असल्याने सध्या रोज हजारो पर्यटक जंगलात फिरत आहेत. याकडे वनविभाग, पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. या भागात वनविभागाने, तसेच पोलिसांनी गस्त घालावी आणि प्रतिबंधित क्षेत्रात जागोजागी फलक लावण्याची मागणी येऊर येथील एकलव्य क्रीडा मंडळ येऊर संवर्धन व विकास समिती, तसेच संडे ट्रेकर्स संस्थेच्या वतीने ॲड. संतोष आग्रे यांनी केली आहे.