शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

येऊरमध्ये पर्यटकांना प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धबधबे आणि पर्यटन स्थळांवर बंदी असतानादेखील अनेक पर्यटक लपूनछपून शहराला लागून असलेल्या येऊर येथील धबधबे ...

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धबधबे आणि पर्यटन स्थळांवर बंदी असतानादेखील अनेक पर्यटक लपूनछपून शहराला लागून असलेल्या येऊर येथील धबधबे आणि तलावामध्ये जाऊन पोहण्याचा व पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यास जात आहे. अशा अतिउत्साहीपणामुळे येथील तलावात बुडून पाचजणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. या घटनांनंतर वन विभाग आणि पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे आता येऊर पर्यटनस्थळी प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वन विभागाने दिला असून, तसेच फलकदेखील जागोजागी लावले आहेत.

ठाणे शहरात निसर्गाने नटलेल्या संजय गांधी येऊर या पर्यटन स्थळी पावसाळ्याच्या काळात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसह अतिउत्साही पर्यटकांचादेखील वावर वाढत असल्याचे दिसून येते. अशाच अतिउत्साही पर्यटकांच्या वावराला आवर घालण्यासाठी वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. येऊरच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये तीन वर्षांची शिक्षा आणि २५ हजारांच्या दंडाची तरतूद आहे, अशा आशयाचे फलक वनविभागाने येऊरच्या प्रतिबंधित क्षेत्रात लावून, तसेच पहारा देऊन पर्यटकांना प्रवेशबंदी केली. पावसाळ्याच्या काळात अनेक हौशी पर्यटक रविवार सुट्टीचा दिवस निसर्गाच्या व धबधब्यांच्या सान्निध्यात घालविण्यासाठी व पार्ट्यांचे फड रंगविण्यासाठी येऊरचा रस्ता धरत असतात. यामुळे एक तर जंगल परिसरातील शांतत भंग होत असते, तर दुसरीकडे पर्यटकांकडून फेकण्यात येणाऱ्या जेवणाच्या डिश, पाण्याच्या बाटल्या फेकण्यात येत असल्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होत असते. त्यात जंगलातील तलावात पोहण्याचा आनंददेखील लुटण्यासाठी जात असतात. असेच मागील दहा ते १५ दिवसांपूर्वी पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या पाच मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर वन विभाग आणि पोलीस यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. याची गांभीर्याने दाखल घेऊन जंगलातील निषिद्ध क्षेत्रात वनविभागाने फलक लावले असून, खडा पहाराही देण्यात येत आहे. त्यामुळे येऊरच्या जंगलात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटकांचा वावर

वन्यजिवांचा वावर असलेल्या अरण्यात पर्यटकांना प्रतिबंध असतानाही सुरक्षेच्या अभाव असल्याने सध्या रोज हजारो पर्यटक जंगलात फिरत आहेत. याकडे वनविभाग, पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. या भागात वनविभागाने, तसेच पोलिसांनी गस्त घालावी आणि प्रतिबंधित क्षेत्रात जागोजागी फलक लावण्याची मागणी येऊर येथील एकलव्य क्रीडा मंडळ येऊर संवर्धन व विकास समिती, तसेच संडे ट्रेकर्स संस्थेच्या वतीने ॲड. संतोष आग्रे यांनी केली आहे.