शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

ठाण्यात पुन्हा निर्बंधांची वेसण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:40 IST

ठाणे : राज्य शासनाने कोरोनाबाबत पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत. यानुसार ठाण्यातील हॉटेल, बार, मल्टिप्लेक्स व इतर आस्थापना ...

ठाणे : राज्य शासनाने कोरोनाबाबत पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत. यानुसार ठाण्यातील हॉटेल, बार, मल्टिप्लेक्स व इतर आस्थापना या रात्री ११.३० पर्यंत सुरू राहणार आहेत, तर दुकाने ९.३० पर्यंत खुली ठेवण्याच्या सुचना आहेत. तसेच या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले तर त्या आस्थापना सील करून जोपर्यंत कोरोना थांबत नाही तोपर्यंत ते काढण्यात येणार नसल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बुधवारी स्पष्ट केले. या मार्गदर्शक सूचनांचे पालन ३१ मार्च २०२१ पर्यंत बंधनकारक आहे

महापालिका मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापूर्वी जे नियम आखले होते, तेच आताही लागू असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांनी बुधवारी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात हॉटेल, बार, मल्टिप्लेक्स, दुकाने, बाजारपेठांमधील प्रतिनिधी आदींसह इतर आस्थापनांची बैठक घेतली. या बैठकीत शासनाने दिलेल्या आदेशाची माहिती या आस्थापनांच्या प्रतिनिधींना दिली असून, त्यांनीदेखील नियमांचे पालन केले जाईल, असे स्पष्ट केल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

मल्टिप्लेक्स, मॉल, हॉटेल, बार आदी ठिकाणी ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त गर्दी नसावी, मास्कशिवाय परवानगी नाही, प्रत्येकाचे तापमान तपासून प्रवेश देणे, लक्षणे असणाऱ्यांना प्रवेश नाही, हॅन्ड सॅनिटाझर प्रत्येक ठिकाणी प्रवेशद्वारावर असावे, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, शॉपिंग मॉलमध्ये असलेल्या सिनेमागृह, रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देताना घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन होणार नाही, याची योग्य ती खबरदारी व्यवस्थापनाने घ्यावी,

कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांकृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्या मालकावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

लग्न समारंभासाठी ५० व्यक्ती व अंत्यविधीसाठी २० व्यक्तीच

यापूर्वी लग्न समारंभासाठी १०० माणसांना परवानगी दिली जात होती. परंतु, आता ती ५० माणसांनाच असणार आहे. तसेच अंत्यविधीसाठीही २० माणसांचीच परवानगी असणार आहे.

गृह विलगीकरणासाठी निर्बंधांसह परवानगी

स्थानिक प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली गृहविलगीकरण करण्यात येईल. १४ दिवसांसाठी ते असल्याचे फलक संबंधित घरांवर व इमारतींच्या प्रवेशद्वारावर लावले जाणार आहे. कोराेना पॉझिटिव्ह रुग्णाच्या हातावर क्वॉरंटाईनचा शिक्का मारला जाणार असून, त्याच्या घरातील इतर सदस्यांनी बाहेर जाणे टाळावे व मास्कचा वापर करावा, या आदेशाचे उल्लंघन केल्यास गृहविलगीकरण केलेल्या व्यक्तिला तत्काळ कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.

अत्यावश्यक सेवावगळता इतर आस्थापनात ५० टक्के उपस्थिती

आरोग्य सेवा व इतर अत्यावश्यक सेवावगळता इतर खासगी किंवा शासकीय कार्यालयांमध्येही पूर्वीप्रमाणे ५० टक्के उपस्थिती ठेवावी लागणार आहे. त्यातही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची जबाबदारी संबंधीत आस्थापनाने घ्यावी. तसेच धार्मिक स्थळांच्या ठिकाणीदेखील ऑनलाईन बुकिंग करून दर्शन घ्यावे.