शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

सध्या लागू केलेले निर्बंधही अयोग्य, बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत, तर याचेही उल्लंघन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत, तर याचेही उल्लंघन केल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा लॉकडाऊन हा उपाय नाही, असे म्हणत राज्यातील ११० संघटनांच्या जनआंदोलनाच्या संघर्ष समितीने लॉकडाऊनला एक प्रकारे विरोधच केला आहे, तसेच सध्या लागू केलेले निर्बंध अयोग्य असून, त्यात बदल करावेत, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात प्रदीर्घ लॉकडाऊन जाहीर केला होता. या लॉकडाऊनने अर्थचक्र थांबल्याने जनतेचे जे हाल झाले, त्यातून अनेक जण अद्याप उभे राहिलेले नाहीत. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, लॉकडाऊनविषयी चर्चा होत आहेत. परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे शासनाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिलेत, तर सध्या काही निर्बंध घातले आहेत. मात्र, ते निर्बंधही सामान्यांसाठी त्रासदायक आहेत. त्यात तातडीने सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मत संघर्ष समितीने व्यक्त केले आहे. नाइट कर्फ्यूमुळे दुकाने रात्री ८ वाजताच बंद होत असल्याने सायंकाळी दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडते. दुकानांना आणखी थोडी मुभा द्यावी. चाकरमान्यांची रखडपट्टी होऊ नये यासाठी रिक्षा रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवाव्यात. सर्व वयोगटांतील लोकांना सरसकट लस उपलब्ध करून द्यावी. कष्टकरी जनतेचा रोजगार बुडेल, असे कोणतेही निर्बंध घालू नयेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्व रुग्णांवर इलाज करावेत आदी मागण्या संघर्ष समितीचे निमंत्रक संजीव साने, विश्वास उटगी, एम.ए. पाटील, उल्का महाजन, डॉ. एस.के. रेगे आदींनी मुख्यमंत्र्याकडे केल्या आहेत.