शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन दलाचा कारभार कंत्राटी कामगारांच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:39 IST

उल्हासनगर : अत्यावश्यक सेवेपैकी असलेल्या अग्निशमन विभागात ८३ पैकी ७४ पदे रिक्त असून तब्बल ५४ कामगार कंत्राटी पद्धतीवर आहेत. ...

उल्हासनगर : अत्यावश्यक सेवेपैकी असलेल्या अग्निशमन विभागात ८३ पैकी ७४ पदे रिक्त असून तब्बल ५४ कामगार कंत्राटी पद्धतीवर आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या हाती किती पैसे पडतात, असा प्रश्न निर्माण झाला असून त्यांना सरकारच्या किमान वेतनाप्रमाणे वेतन देण्याची मागणी होत आहे. कंत्राटीऐवजी राज्य सुरक्षा मंडळाकडून सुरक्षा कर्मचारी घेण्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे.

उल्हासनगर महापालिकेत ९० टक्के अधिकाऱ्यांची पदे प्रभारी असून कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे वर्ग-१ व २ च्या पदांचा पदभार दिल्याने सावळागोंधळ सुरू आहे. हे कमी म्हणून की काय, अत्यावश्यक सेवेपैकी एक असलेल्या अग्निशमन विभागातील मंजूर ८३ पैकी ७४ पदे रिक्त असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली. विभागात कंत्राटी पद्धतीने फायरमनची ३० तर १५ वाहनचालकांची पदे घेण्यात आली. तर, चार सफाई कामगारांना फायरमनचे काम देण्यात आल्याचे उघड झाले आहे. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कंत्राटी पद्धतीवरील फायरमन व वाहनचालकांच्या हाती किमान वेतनांतर्गत पैसे हाती पडतात का, हा संशोधनाचा विषय आहे. कंत्राटी कामगारांपैकी अनेक कामगार आग विझवताना जखमी झाले आहेत, त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न विचारला जात आहे.

महापालिका अग्निशमन विभागात कंत्राटीऐवजी किमान वेतन अधिनियमांचे पालन करणाऱ्या सरकारच्या राज्य सुरक्षा मंडळाकडून कर्मचारी घेण्याची मागणी होत आहे. तसेच स्वतःचा जीव धाेक्यात घालून २००५ पासून अग्निशमन विभागात कंत्राटी पद्धतीने का असेना, काम करणाऱ्या कामगारांना नियमानुसार महापालिका सेवेत सामावून घेण्याची मागणी होत आहे. एखाद्याचे हित जपण्यासाठीच कंत्राटी पद्धत सुरू ठेवल्याचा आरोप होत आहे. किमान वेतन अधिनियमांचे पालन होण्यासाठी राज्य सुरक्षा मंडळाकडून कर्मचारी घेण्यासाठी आयुक्तांसोबत चर्चा झाल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे व नेटके यांनी दिली.

चौकट

महापालिकेची सुरक्षाही वाऱ्यावर

महापालिकेच्या सुरक्षेसाठी प्रत्यक्षात मंजूर १२३ पैकी महापालिकेचे फक्त ४२ सुरक्षारक्षक असून ८१ कंत्राटी राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक तैनात आहेत. एकूणच महापालिकेची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा आरोप होत आहे.