शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

‘सावरकरांवरील आक्षेपांचे निराकरण करावे लागणे दुर्दैवी’

By admin | Updated: April 24, 2017 02:12 IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महान व्यक्तीवर चिखलफेक करण्यात काही जणांना धन्यता वाटते. त्यांची देशभक्ती, निर्भयता, हेतू यावर शिंतोडे उडणे हे आपले दुर्भाग्य आहे.

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महान व्यक्तीवर चिखलफेक करण्यात काही जणांना धन्यता वाटते. त्यांची देशभक्ती, निर्भयता, हेतू यावर शिंतोडे उडणे हे आपले दुर्भाग्य आहे. इतर कोणत्याही देशात स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या थोर व्यक्तिंवर आक्षेप आणि निराकरण असे कार्यक्रम झालेले ऐकले आहेत का? मात्र आपण स्वा.सावरकरांवरील आक्षेप आणि निराकरण या विषयावर परिसंवाद घेण्यात शक्ती दवडतोय, हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल, असे स्पष्ट मत डॉ. श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्त केले.गडकरी रंगायतन येथे सुरू असलेल्या २९ व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनात रविवारी ‘सावरकरांवरील आक्षेप आणि निराकरण’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. १९११ ते १९४८ या कालावधीत सावरकरांनी मांडलेले विचार, भूमिका, कृती यावर आक्षेप घेतले जातात. यातील काही आक्षेप ते जिवंत असतानाच घेतले होते आणि विशेष म्हणजे त्याचे निराकरण स्वत: सावरकरांनी केले. स्वातंत्र्य, हिंदुत्व , विज्ञाननिष्ठा आणि मानवतावाद या सावरकरांच्या जीवननिष्ठा तर भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श लक्षात घेतल्यास त्यांच्यावर आक्षेप घेणे किती निराधार, कपोलकल्पित आणि हास्यास्पद आहे, हे लक्षात येते. मुख्य म्हणजे स्वा.सावरकरांवर आक्षेप घेणारी मंडळी स्वत: प्रामाणिक आहेत का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे गोडबोले म्हणाले. सावरकर झाले नसते तर पाकिस्तानचा आकार आहे त्यापेक्षा मोठा झाला असता आणि अखंड पाकिस्तानच्या प्रक्रियेला खूप वेग आला असता. ब्रिटीश येथून गेल्यावर ती जागा मुस्लिम घेतील ही भीती लक्षात घेऊन सावरकरांनी हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हे शब्द वापरून भलमोठं तत्वज्ञान उभ केलं, असे प्रतिपादन अरविंद कुलकर्णी यांनी केले. बंदीवासात असलेल्या सावरकरांवर झालेल्या अनेक आक्षेपांचे प्रा. गजानन नेरकर यांनी निराकरण केले. (प्रतिनिधी)