शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून नायगावकरांना तूर्तास टॅँकरद्वारे दिलासा

By admin | Updated: April 19, 2017 00:05 IST

नायगावकरांना दोन महिन्यात नळाचे पाणी पुरवले जाणार असून तोपर्यंत टँकरव्दारे मोफत पाणी पुरवठा करील असे आश्वासन पाणी पुरवठा मंत्री गिरीष महाजन यांनी दिले आहे

वसई : नायगावकरांना दोन महिन्यात नळाचे पाणी पुरवले जाणार असून तोपर्यंत टँकरव्दारे मोफत पाणी पुरवठा करील असे आश्वासन पाणी पुरवठा मंत्री गिरीष महाजन यांनी दिले आहे. त्यामुळे मी नायगावकरांनी तूर्तास आमरण उपोषण स्थगित केले आहे. दीड लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या नायगावला अद्याप नळाचे पाणी नाही. गेल्या दहा वर्षांपासून टँकरवर अवलंबून असलेल्या नायगावकरांनी प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी आमरण उपोषण सुुरु केले होते. त्यासंंबंधीचे सविस्तर वृत्त मंगळवारच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी दुपारी माजी आमदार विवेक पंडित, काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील, प्रवीण गावडे, अमर गोगटे आणि संदीप म्हात्रे यांनी मंत्रालयात पाणी पुरवठा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली. यावेळी पंडीत यांनी नायगावकरांचा पाण्याचा प्रश्न मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर मंत्री महाजन यांनी महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांच्याशी संपर्क साधून मार्ग काढला. यावेळी लोखंडे यांनी दोन महिन्यात नायगावकरांसाठी नळ पाणी पुरवठा योजना सुरु केली जाईल. तसेच पाणी टंचाईच्या काळात महापालिका टँकरने पाणी पुरवठा करील असे आश्वासन दिले. याप्रकरणी आढावा घेण्यासाठी येत्या २५ एप्रिलला मंत्रालयात पुन्हा बैठक बोलावण्यात आली असून यावेळी मंत्री महाजन माहिती घेणार आहेत, अशी माहिती विजय पाटील यांनी दिली. मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर प्रवीण गवस आणि त्यांच्या सहकार्यांनी तूर्तास उपोषण स्थगित केले आहे. (प्रतिनिधी)