शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या देवचंद नगर परिसरातील रहिवाश्यांचा मतदान आणि नेत्यांवर बहिष्काराचा इशारा

By धीरज परब | Updated: May 25, 2025 23:41 IST

भाईंदरच्या देवचंद नगर भागातील सुमारे २७ जुन्या इमारतींच्या रहिवाश्यांनी मिळून रविवारी जाहीर बैठक घेतली. बहुतांश इमारती ग्रामपंचायत काळा पासूनचा असून काही इमारतींना अतिधोकादायक ठरवण्यात आले आहे.

धीरज परब

मीरारोड- भाईंदर पश्चिमेच्या सती राणी मार्ग - देवचंद नगर भागातील जुन्या इमारतीतील रहिवाश्यांनी इमारतींच्या पुनर्विकाससाठी क्लस्टर हटवून आम्हाला आमच्या इमारती विकसित करू द्या. अन्यथा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदानावर तसेच राजकीय नेत्यांवर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे. 

भाईंदरच्या देवचंद नगर भागातील सुमारे २७ जुन्या इमारतींच्या रहिवाश्यांनी मिळून रविवारी जाहीर बैठक घेतली. बहुतांश इमारती ग्रामपंचायत काळा पासूनचा असून काही इमारतींना अतिधोकादायक ठरवण्यात आले आहे. सदर परिसर क्लस्टर योजने खाली असून गेल्या २ वर्षात काहीच झाले नाही. लोकांना स्वतःच्या इमारती विकसित करता येत नाहीत. क्लस्टर खाली आमची मालकी जमीन ९९ वर्षांच्या लीज खाली जाणार, क्षेत्र मर्यादित मिळणार, घर १५ वर्ष विकत येणार नाही आदी कारणे सांगत लोकांनी क्लस्टर योजनेला विरोध केला. 

सुमारे १५०० ते २ हजार कुटुंब आहेत. पालिका आता इमारती धोकादायक ठरवत आहेत. कोणाचे घर तुटले तर भाजपा किंवा शिवसेनेचे नेते आम्हाला घर देणार नाहीत . शहरातील नेते हे बिल्डर आहेत . नेते इमारती पडून लोकांचे जीव जाण्याची वाट बघत आहेत. येथील नेत्यांवर आमचा भरोसा नाही असा संताप काहींनी व्यक्त केला. 

तत्कालीन आमदार गीता जैन आणि विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांना भेटून देखील त्यांनी ठोस आश्वासन दिले नाही. मेहतांची थेट मुख्यमंत्री यांच्याशी जवळची ओळख आहे. मग आमच्या साठी निर्णय घ्या. मेहतांनी विधिमंडळात आवाज उठवावा अशी मागणी लोकांनी केली.  तुम्हाला मतं लोकांच्या हितासाठी दिली. माजी नगरसेवकांनी पण विरोध केला पाहिजे. अन्यथा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू. नेत्यांना आमच्या परिसरात घुसू देणार नाही असा इशारा लोकांनी दिला. 

२०२२ मध्ये ५ इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव पालिकेत दिला होता. आता मात्र सदर क्षेत्र क्लस्टर खाली असल्याने बांधकाम परवानगी देता येणार नाही असे प्रशासन सांगते. दुसरीकडे आमच्या इमारती धोकादायक ठरवून त्या रिकामी करा सांगत आहेत. इमारती तोडून आम्हाला रस्त्यावर आणायचे आहे असा आरोप लोकांनी केला.