शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

उल्हासनगर महापालिकेवर अधिवासी यांचा मोर्चा; जलकुंभ उभारण्याच्या जागेवर केला दावा 

By सदानंद नाईक | Updated: November 1, 2023 19:01 IST

महापालिका उभारत असलेल्या उंच जलकुंभाच्या जागेवर स्थानिक अधिवासी नागरिकांनी दावा सांगून मंगळवारी महापालिकेवर शेकडोच्या संख्येत मोर्चा काढला.

उल्हासनगर : महापालिका उभारत असलेल्या उंच जलकुंभाच्या जागेवर स्थानिक अधिवासी नागरिकांनी दावा सांगून मंगळवारी महापालिकेवर शेकडोच्या संख्येत मोर्चा काढला. वर्षानुवर्षे राहत असलेली जागा सरकारची झाली कशी? त्याच सर्वेतील इतर अवैध बांधकामाचे काय? असा प्रश्न उपस्थित करून महापालिका कारभारावर टीका केली.

 उल्हासनगर कॅम्प नं-५, येथील दुर्गापाडा भागात ३० ते ४० घरे आदिवासी समाजाची असून वर्षानुवर्ष याच जागेवर राहतात. आदिवासी वस्तीच्या बाजूच्या खुल्या जागेवर महापालिकेने जलकुंभ उभारण्याला मंजुरी देऊन काम सुरू केले. मात्र स्थानिक आदिवासी समाजाने जागेवर हक्क सांगितल्याने, जलकुंभाचे काम वादात सापडले आहे. याच सर्वेतील जागेवर स्थानिक राजकीय नेते व महापालिका अधिकारी यांनी संगनमत करून अवैध बांधकामे करीत आहेत. असा आरोप केला. मात्र आम्ही उदरनिर्वाहसाठी कर्ज काढून दुकानासाठी एखादी रूम बांधलीतर, त्यावर महापालिका अधिकारी स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरून पाडकाम कारवाई करतात. आमच्या बांधकामावर पाडकाम कारवाई मग खुल्या जागेवर बांधण्यात आलेल्या शेकडो अवैध बांधकामाला महापालिकेचे अभय का? असा थेट प्रश्न अधिवासी महिला करीत आहेत.

 महापालिकेच्या ७० टक्के पेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण झाले असून जागेला सोन्याचे दिवस आल्याने, आदिवासी समाजाची जागा हडप करण्याचे कटकारस्थान स्थानिक राजकीय नेते हे महापालिका अधिकारी याना हाताशी धरून करीत आहेत. असा टाहो महापालिका प्रवेशद्वारावर महिलांनी फोडला आहे. 

 जागा शासनाची आदिवासी समाजाने मोर्चा काढून महापालिकेला निवेदन दिले. मात्र जागेचा सातबारा नसून जागा शासनाची दाखवीत आहेत. अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर यांनी दिली. याबाबत अधिक तपास करून कारवाई करणार असल्याचे म्हणाले. 

खुली जागा कोणाची महापालिकेत दुर्गापाडा, जुने अंबरनाथ गावठाण भाग व गायकवाड पाडा परिसर महापालिका क्षेत्रात समाविष्ट झाल्यावर, शासनाची जागा असलेल्या खुल्या जागेला सोन्याचा भाव आला. यातूनच महापालिका अधीकारी, भूमाफिया व स्थानिक नेत्यांनी अवैध बांधकामे केली. मात्र आदिवासी समाजाची आर्थिक क्षमता नसल्याने खुल्या जागेवर बांधकाम केले नाही. त्या जागेवर जलकुंभ उभारण्याचा हट्टाहास महापालिका करीत असल्याचे आदिवासी बांधवाची म्हणणे आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर