शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेवर अधिवासी यांचा मोर्चा; जलकुंभ उभारण्याच्या जागेवर केला दावा 

By सदानंद नाईक | Updated: November 1, 2023 19:01 IST

महापालिका उभारत असलेल्या उंच जलकुंभाच्या जागेवर स्थानिक अधिवासी नागरिकांनी दावा सांगून मंगळवारी महापालिकेवर शेकडोच्या संख्येत मोर्चा काढला.

उल्हासनगर : महापालिका उभारत असलेल्या उंच जलकुंभाच्या जागेवर स्थानिक अधिवासी नागरिकांनी दावा सांगून मंगळवारी महापालिकेवर शेकडोच्या संख्येत मोर्चा काढला. वर्षानुवर्षे राहत असलेली जागा सरकारची झाली कशी? त्याच सर्वेतील इतर अवैध बांधकामाचे काय? असा प्रश्न उपस्थित करून महापालिका कारभारावर टीका केली.

 उल्हासनगर कॅम्प नं-५, येथील दुर्गापाडा भागात ३० ते ४० घरे आदिवासी समाजाची असून वर्षानुवर्ष याच जागेवर राहतात. आदिवासी वस्तीच्या बाजूच्या खुल्या जागेवर महापालिकेने जलकुंभ उभारण्याला मंजुरी देऊन काम सुरू केले. मात्र स्थानिक आदिवासी समाजाने जागेवर हक्क सांगितल्याने, जलकुंभाचे काम वादात सापडले आहे. याच सर्वेतील जागेवर स्थानिक राजकीय नेते व महापालिका अधिकारी यांनी संगनमत करून अवैध बांधकामे करीत आहेत. असा आरोप केला. मात्र आम्ही उदरनिर्वाहसाठी कर्ज काढून दुकानासाठी एखादी रूम बांधलीतर, त्यावर महापालिका अधिकारी स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरून पाडकाम कारवाई करतात. आमच्या बांधकामावर पाडकाम कारवाई मग खुल्या जागेवर बांधण्यात आलेल्या शेकडो अवैध बांधकामाला महापालिकेचे अभय का? असा थेट प्रश्न अधिवासी महिला करीत आहेत.

 महापालिकेच्या ७० टक्के पेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण झाले असून जागेला सोन्याचे दिवस आल्याने, आदिवासी समाजाची जागा हडप करण्याचे कटकारस्थान स्थानिक राजकीय नेते हे महापालिका अधिकारी याना हाताशी धरून करीत आहेत. असा टाहो महापालिका प्रवेशद्वारावर महिलांनी फोडला आहे. 

 जागा शासनाची आदिवासी समाजाने मोर्चा काढून महापालिकेला निवेदन दिले. मात्र जागेचा सातबारा नसून जागा शासनाची दाखवीत आहेत. अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर यांनी दिली. याबाबत अधिक तपास करून कारवाई करणार असल्याचे म्हणाले. 

खुली जागा कोणाची महापालिकेत दुर्गापाडा, जुने अंबरनाथ गावठाण भाग व गायकवाड पाडा परिसर महापालिका क्षेत्रात समाविष्ट झाल्यावर, शासनाची जागा असलेल्या खुल्या जागेला सोन्याचा भाव आला. यातूनच महापालिका अधीकारी, भूमाफिया व स्थानिक नेत्यांनी अवैध बांधकामे केली. मात्र आदिवासी समाजाची आर्थिक क्षमता नसल्याने खुल्या जागेवर बांधकाम केले नाही. त्या जागेवर जलकुंभ उभारण्याचा हट्टाहास महापालिका करीत असल्याचे आदिवासी बांधवाची म्हणणे आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर