शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

२३ वर्षांपासून रहिवासी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 3, 2016 01:53 IST

ठाण्यात धोकादायक इमारती खाली करण्याच्या कामाला सुरु वात झाली असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसनही तत्काळ केले जात आहे.

ठाणे : ठाण्यात धोकादायक इमारती खाली करण्याच्या कामाला सुरु वात झाली असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसनही तत्काळ केले जात आहे. परंतु, दादोजी कोंडदेव स्टेडिअमजवळील धोकादायक म्हणून पाडलेल्या दोन इमारतींमधील रहिवासी मागील २३ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेची नसल्याने अनेक वर्षे पाठपुरावा करूनही त्यांचे पुनर्वसन होण्याची शक्यता फार कमी आहे. विशेष म्हणजे पुनर्वसनाचे तोंडी आश्वासन देऊन पालिकेने या दोन्ही इमारतींवर २३ वर्षांपूर्वी हातोडा चालवला होता. त्यामुळे कायमस्वरूपी घरे गमावलेल्या या रहिवाशांवर ठाण्यातील वेगवेगळ्या झोपडपट्टीमध्ये राहण्याची वेळ ओढवली आहे.ठाणे महापालिकेने शहरातील ३ हजार ६०० इमारती धोकादायक महणून जाहीर केल्या असून यामध्ये ८९ अतिधोकादायक इमारतींवर लवकरच हातोडा पडणार आहे. शहरात काही ठिकाणी नजरचुकीने तर काही ठिकाणी विकासकांच्या फायद्यासाठी त्या धोकादायक ठरवल्या जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. दरवर्षी धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यात येत असल्याने हजारोंच्या संख्येने रहिवासी बेघर होत असतात. अशाच दादोजी कोंडदेव स्टेडिअमजवळील सेवाराम आणि रु चिराम या इमारतींवर धोकादायक म्हणून १९९५ साली तत्कालीन पालिका आयुक्त जे.पी. डांगे यांनी कारवाई केली होती. या कारवाईत इमारतींमधील ७६ भाडेकरू बेघर झाले. त्या वेळी पुनर्वसन करण्याचे तोंडी आश्वासन देऊन त्यांना ही घरे खाली करायला लावली, अशी माहिती शिवसेनेचे उपशहरप्रमुख विलास ढमाले यांनी दिली. मागील अनेक वर्षे पाठपुरावा करूनही या ७६ भाडेकरूंचे पुनर्वसन झालेले नाही.