शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

२३ वर्षांपासून रहिवासी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 3, 2016 01:53 IST

ठाण्यात धोकादायक इमारती खाली करण्याच्या कामाला सुरु वात झाली असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसनही तत्काळ केले जात आहे.

ठाणे : ठाण्यात धोकादायक इमारती खाली करण्याच्या कामाला सुरु वात झाली असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसनही तत्काळ केले जात आहे. परंतु, दादोजी कोंडदेव स्टेडिअमजवळील धोकादायक म्हणून पाडलेल्या दोन इमारतींमधील रहिवासी मागील २३ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेची नसल्याने अनेक वर्षे पाठपुरावा करूनही त्यांचे पुनर्वसन होण्याची शक्यता फार कमी आहे. विशेष म्हणजे पुनर्वसनाचे तोंडी आश्वासन देऊन पालिकेने या दोन्ही इमारतींवर २३ वर्षांपूर्वी हातोडा चालवला होता. त्यामुळे कायमस्वरूपी घरे गमावलेल्या या रहिवाशांवर ठाण्यातील वेगवेगळ्या झोपडपट्टीमध्ये राहण्याची वेळ ओढवली आहे.ठाणे महापालिकेने शहरातील ३ हजार ६०० इमारती धोकादायक महणून जाहीर केल्या असून यामध्ये ८९ अतिधोकादायक इमारतींवर लवकरच हातोडा पडणार आहे. शहरात काही ठिकाणी नजरचुकीने तर काही ठिकाणी विकासकांच्या फायद्यासाठी त्या धोकादायक ठरवल्या जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. दरवर्षी धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यात येत असल्याने हजारोंच्या संख्येने रहिवासी बेघर होत असतात. अशाच दादोजी कोंडदेव स्टेडिअमजवळील सेवाराम आणि रु चिराम या इमारतींवर धोकादायक म्हणून १९९५ साली तत्कालीन पालिका आयुक्त जे.पी. डांगे यांनी कारवाई केली होती. या कारवाईत इमारतींमधील ७६ भाडेकरू बेघर झाले. त्या वेळी पुनर्वसन करण्याचे तोंडी आश्वासन देऊन त्यांना ही घरे खाली करायला लावली, अशी माहिती शिवसेनेचे उपशहरप्रमुख विलास ढमाले यांनी दिली. मागील अनेक वर्षे पाठपुरावा करूनही या ७६ भाडेकरूंचे पुनर्वसन झालेले नाही.