शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

२३ वर्षांपासून रहिवासी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 3, 2016 01:53 IST

ठाण्यात धोकादायक इमारती खाली करण्याच्या कामाला सुरु वात झाली असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसनही तत्काळ केले जात आहे.

ठाणे : ठाण्यात धोकादायक इमारती खाली करण्याच्या कामाला सुरु वात झाली असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसनही तत्काळ केले जात आहे. परंतु, दादोजी कोंडदेव स्टेडिअमजवळील धोकादायक म्हणून पाडलेल्या दोन इमारतींमधील रहिवासी मागील २३ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेची नसल्याने अनेक वर्षे पाठपुरावा करूनही त्यांचे पुनर्वसन होण्याची शक्यता फार कमी आहे. विशेष म्हणजे पुनर्वसनाचे तोंडी आश्वासन देऊन पालिकेने या दोन्ही इमारतींवर २३ वर्षांपूर्वी हातोडा चालवला होता. त्यामुळे कायमस्वरूपी घरे गमावलेल्या या रहिवाशांवर ठाण्यातील वेगवेगळ्या झोपडपट्टीमध्ये राहण्याची वेळ ओढवली आहे.ठाणे महापालिकेने शहरातील ३ हजार ६०० इमारती धोकादायक महणून जाहीर केल्या असून यामध्ये ८९ अतिधोकादायक इमारतींवर लवकरच हातोडा पडणार आहे. शहरात काही ठिकाणी नजरचुकीने तर काही ठिकाणी विकासकांच्या फायद्यासाठी त्या धोकादायक ठरवल्या जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. दरवर्षी धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यात येत असल्याने हजारोंच्या संख्येने रहिवासी बेघर होत असतात. अशाच दादोजी कोंडदेव स्टेडिअमजवळील सेवाराम आणि रु चिराम या इमारतींवर धोकादायक म्हणून १९९५ साली तत्कालीन पालिका आयुक्त जे.पी. डांगे यांनी कारवाई केली होती. या कारवाईत इमारतींमधील ७६ भाडेकरू बेघर झाले. त्या वेळी पुनर्वसन करण्याचे तोंडी आश्वासन देऊन त्यांना ही घरे खाली करायला लावली, अशी माहिती शिवसेनेचे उपशहरप्रमुख विलास ढमाले यांनी दिली. मागील अनेक वर्षे पाठपुरावा करूनही या ७६ भाडेकरूंचे पुनर्वसन झालेले नाही.