शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

आरक्षणबदलाचा घाट; महासभेत ५० कोटी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:36 IST

ठाणे महापालिका प्रशासनाचे पितळ उघडे

ठाणे : सध्या जे डम्पिंग ग्राउंड दिव्यात सुरू आहे ते बंद करण्यासाठी पालिकेने ५० कोटींचा प्रस्ताव पुढे आणला, असे सर्वांना वाटत होते. परंतु, ते बंद न करता काही वर्षांपूर्वी बंद केलेले डम्पिंग शास्त्रोक्तपद्धतीने बंद करण्यासाठी हा ५० कोटींचा खर्च करण्याचा घाट प्रशासनाने रचल्याचा प्रताप शुक्रवारी समोर आला. केवळ या जागेचे आरक्षण बदलून जमीन मालकाच्या घशात टीडीआर घालण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप यावेळी सभागृहात करण्यात आला. यामुळे प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव सर्वसाधारण सभेने केवळ फेटाळलाच नाही तर तो दप्तरी दाखल करून त्यांचे पितळ उघडे पाडले.

शुक्रवारच्या महासभेत दिव्यातील डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्तपद्धतीने बंद करण्यासाठी ५० कोटी खर्च करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला,असे सर्वांना वाटत होती. मात्र, विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील, नजीब मुल्ला आणि बाबाजी पाटील या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी यापूर्वी या भागातील खाजगी जागेत जी तीन डम्पिंग ग्राउंड उभारली होती. ती काही वर्षांपूर्वी बंद केली आहेत. परंतु, आता त्यावरच खर्च करण्याचा हा प्रस्ताव असल्याचा आरोप यावेळी सदस्यांनी केला. तसेच, या जमिनीवर सामाजिकवनीकरणाचे आरक्षण टाकण्याचाही उल्लेख केला होता. ते टाकल्यानंतर त्याच्या मोबदल्यात जमीनमालकाला टीडीआर बहाल केला जाणार होता. परंतु, विरोधी पक्षातील नगरसेवकांनी या सर्वच प्रकरणाचा यावेळी भंडाफोड केल्याने सभागृह आवाक झाले.

राष्ट्रवादीच्या माजी आणि सध्या शिवसेनेत असलेल्या एका राजकीय नेत्याने पालिकेला दिवा येथील या भागात कचरा टाकण्याची विनंती केली होती. त्यानुसार, पालिकेने या जागेचा डम्पिंग म्हणून उपयोग केला. परंतु, आता नागरिकांच्या विरोधानंतर ते बंद केले असून त्याठिकाणी कोणत्याही स्वरूपाची दुर्गंधी येत नसल्याचे यावेळी राष्टÑवादीच्या नगरसेवकांनी स्पष्ट केले. तसेच या डम्पिंगविरोधात स्थानिकांची किंवा लोकप्रतिनिधींची कोणतीही तक्रार नाही. असे असतानाही प्रशासनाने ठाणेकरांचे तब्बल ५० कोटी रु पये डम्पिंग बंद करण्यासाठी खर्च करण्यास कंबर कशासाठी कसली, असा सवाल मिलिंद पाटील यांनी केला. त्यामुळे हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याच्या त्यांच्या मागणीला सभागृहनेते नरेश म्हस्के यांना अनुमोदन देणे भाग पडले.

डम्पिंग सुरूच असल्याने नागरिकांना त्राससध्या दिव्यात ज्या डम्पिंगवर कचरा टाकला जात आहे ते २०१८ मध्ये बंद करण्याचे आश्वासन ठाणे महापालिका प्रशासनाने दिले होते. मात्र, आजतागायत तेथे कचरा टाकला जात असून आणखी किमान सहा ते सात महिने ते बंद होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे ज्या डम्पिंगमुळे नागरिकांना त्रास होत आहे, ते बंद करण्याऐवजी नको त्या डम्पिंगसाठी खर्च करण्याची तयारी प्रशासनाने केल्याने सर्वांनाच धक्का बसला.