शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

 राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला यश

By अजित मांडके | Updated: September 26, 2023 12:18 IST

राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील शर्विन कार्व्हालो याला मिळाली संशोधनासाठी पाठ्यवृत्ती, देशभरातील १० सर्वोच्च शोध निबंधामध्ये झाली निवड  

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयात तृतीय वर्ष एमबीबीएसमध्ये शिकणारा शर्विन कार्व्हालो याला संशोधनासाठी पाठ्यवृत्ती मिळाली असून देशभरातील १० सर्वोच्च शोधनिबंधामध्ये निवड झाली आहे.                                                       

इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि इंडियन कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स या राष्ट्रीय पातळीवरील बालरोग शास्त्राच्या सर्वोच्च संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयएपी - आयसीपी संशोधन पाठ्यवृत्ती २०२२ साठी देशभर स्पर्धा घेण्यात आली. एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढीस लागावी यासाठी दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते. यंदा सुमारे ७०० हून अधिक शोधनिबंध एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी सादर केले होते. त्यातून अतिशय उच्च आणि अवघड अशा काठिण्य पातळी असलेल्या निवड चाचणीतून अंतिम १० शोधनिबंध संशोधन पाठ्यवृत्तीसाठी निवडले जातात. त्यात, राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयात तृतीय वर्ष एमबीबीएसमध्ये शिकणारा शर्विन कार्व्हालो याच्या शोधनिबंधाची निवड करण्यात आली आहे.

'नवजात अर्भकांच्या नाळेतील रक्ताच्या घटकांचा अर्भकांना होणाऱ्या संसर्गाच्या पूर्वलक्षी निदानासाठी होणारा उपयोग,' असे शर्विनच्या शोधनिबंधाचे शीर्षक आहे. या शोधनिबंधासाठी राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मोहीत रोजेकर यांनी शर्विनला मार्गदर्शन केले. तसेच, विद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, डॉ. स्वाती घांघुर्डे, डॉ. सुनील जुनागडे, डॉ. जयेश पानोत, डॉ. जयनारायण सेनापती यांचेही त्यात योगदान होते. 

'आविष्कार'मध्येही झळकले विद्यार्थीमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या 'आविष्कार' या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेतही राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील वत्सल जैन आणि शिवानी निरगुडकर या विद्यार्थ्यांना मेडीसीन आणि फार्मसी या गटात अनुक्रमे पहिले आणि दुसरे पारितोषिक मिळाले आहे. या विद्यार्थ्यांनी डॉ. मोहीत रोजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रकल्प पूर्ण केले. त्यांना डॉ. तुषार बागले, डॉ. रोहनकुमार हिरे, डॉ. राजेश्वर पाटे, डॉ. प्राची घोलप आणि डॉ. स्वाती घांघुर्डे या प्राध्यापकांचेही मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतर विद्यापीठ स्तरावरील संशोधन महोत्सवातही सहभाग घेतला होता