शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

रिपब्लिकन पक्षाला एका जातीपुरता सिमीत ठेवणार नाही; रामदास आठवले यांची प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 22:46 IST

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यापक संकल्पनेतून उभा राहिलेला रिपब्लिकन पक्ष कमी-अधिक प्रमाणात यशस्वी झाला. मात्र पक्षातील गटतटाच्या राजकारणामुळे पक्ष प्रभावहीन झाला असून एका जातीपुरता सीमित झाला.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : डॉ बाबासाहेबांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला रिपब्लिकन पक्ष एका जातीपुरता व गटातटात विभागल्याने प्रभावहीन झाला. पक्षाला उभारी देण्यासाठी पक्षाला एका जातीपुरता सिमीत न करण्याची प्रतिज्ञा रिजेन्सी अंटेलिया हॉल मध्ये आयोजित केलेल्या पक्षाच्या ६४ व्या वर्धापनदिनी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केली. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यापक संकल्पनेतून उभा राहिलेला रिपब्लिकन पक्ष कमी-अधिक प्रमाणात यशस्वी झाला. मात्र पक्षातील गटतटाच्या राजकारणामुळे पक्ष प्रभावहीन झाला असून एका जातीपुरता सीमित झाला. पक्षाला उभारी देण्यासाठी पक्ष एका जाती पुरता सीमित ठेवला जाणार नसल्याची प्रतिज्ञा केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाच्या ६४ व्या वर्धापनदिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात रिजेन्सी अंटेलिया हॉल मध्ये केली. रिपब्लिकन पक्षाची येणाऱ्या महापालिकेसह अन्य निवडणुकीत भाजप सोबत युती राहणार असल्याचे यावेळी आठवले यांनी स्पष्ट केले. सबका साथ, सबका विकास या तत्वावर देश प्रगतीच्या शिखरावर नेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे खरे कैवारी बनल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, त्यामुळे तीन पक्षाचे तीन तिगाडी सरकार केंव्हाही जाण्याचे संकेत दिले. 

राज्यात भाजप-शिवसेना-रिपाइं यांची भविष्यात युती झालेली दिसेल. तसेच राज्यातील रस्ते खड्डयात गेले नसून राज्य सरकार खड्डयात गेल्याचे ते म्हणाले. महिला व दलितांवर अत्याचार वाढल्याची टीकाही त्यांनी केली. डोंबिवलीतील पीडित मुलीसह कुटुंबाची भेट घेऊन पक्षाच्या वतीने कुटुंबाला १ लाखाची मदत देऊन, मुख्यमंत्री यांनीं २० लाखाची मदत द्या. अशी मागणी करणार असल्याचे आठवले म्हणाले. शेतकऱ्याच्या फायद्याचे कायदे मोदी सरकारने केले असून त्यामध्ये विरोधक राजकारण आणत असल्याची टीका यावेळी केली. यावेळी केंद्रीयमंत्री कपिल पाटील, आमदार कुमार आयलानी, पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव, अण्णा रोखडे, राजेश वाधारीया, महेश सुखरामानी यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

पक्षाच्या वर्धापनदिना निमित्त कार्यकर्त्यांना साकडे 

शहरातील रिजेन्सी अंटेलिया येथील खुल्या सभागृहात पार पडलेल्या पक्षाच्या वर्धापनदिन कार्यकर्त्यानी एकच गर्दी केली होती. पक्षाला उभारी देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केंद्रीयमंत्री व पक्ष प्रमुख रामदास आठवले यांनी केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले