शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

केडीएमटीच्या ६९ बस भंगारात काढण्याचा अहवाल थातूरमातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:16 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ६९ बस भंगारविक्रीत काढण्याचा अहवाल राज्य सरकारच्या आदेशानुसार परिवहन प्रशासनाने दिलेला असला, तरी ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ६९ बस भंगारविक्रीत काढण्याचा अहवाल राज्य सरकारच्या आदेशानुसार परिवहन प्रशासनाने दिलेला असला, तरी हा अहवाल थातूरमातूर असल्याने याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी दिला आहे.

परिवहन उपक्रमाने ६९ बस भंगारात काढण्याचा ठराव केला होता. या ठरावाला महासभेने मंजुरी दिली होती. या बस भंगारात काढण्यास माहिती अधिकार कार्यकर्ते घाणेकर यांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी त्यांनी नगरविकास खात्याकडे तक्रार करून हा ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली होती. नगरविकास खात्याने घाणेकर यांच्या तक्रारीची दखल घेत परिवहन प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने तयार केलेल्या अहवालाची प्रत घाणेकर यांना देण्यात आली. राज्य सरकारच्या ज्या अधिसूचनेचा आधार घेत या बस भंगारात काढण्यात आल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे, ती अधिसूचना या विषयासाठी लागू होत नसताना ती लागू होत असल्याचे म्हटले आहे. हे विसंगत असल्याचे घाणेकर यांनी म्हटले आहे. घाणेकर यांचे सर्व आक्षेप हे चुकीचे आहेत, तसेच ते प्रशासनाकडून अमान्य करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

---------------------------

निकषांना छेद देउन ठराव

घाणेकर यांच्या मते, ६९ बस या केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान प्रकल्पांतर्गत घेण्यात आल्या होत्या. या बस भंगारात काढण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागेल. ती महापालिकेने घेतलेली नाही. तसेच २०१५ मध्ये घेतलेल्या बस किमान आठ वर्षे एक लाख किलोमीटर चालल्या पाहिजेत. या दोन्ही निकषांना छेद देत या बस भंगारात काढण्याचा ठराव महापालिकेने केलेला आहे.