शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

केडीएमटीच्या ६९ बस भंगारात काढण्याचा अहवाल थातूरमातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:16 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ६९ बस भंगारविक्रीत काढण्याचा अहवाल राज्य सरकारच्या आदेशानुसार परिवहन प्रशासनाने दिलेला असला, तरी ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ६९ बस भंगारविक्रीत काढण्याचा अहवाल राज्य सरकारच्या आदेशानुसार परिवहन प्रशासनाने दिलेला असला, तरी हा अहवाल थातूरमातूर असल्याने याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी दिला आहे.

परिवहन उपक्रमाने ६९ बस भंगारात काढण्याचा ठराव केला होता. या ठरावाला महासभेने मंजुरी दिली होती. या बस भंगारात काढण्यास माहिती अधिकार कार्यकर्ते घाणेकर यांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी त्यांनी नगरविकास खात्याकडे तक्रार करून हा ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली होती. नगरविकास खात्याने घाणेकर यांच्या तक्रारीची दखल घेत परिवहन प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने तयार केलेल्या अहवालाची प्रत घाणेकर यांना देण्यात आली. राज्य सरकारच्या ज्या अधिसूचनेचा आधार घेत या बस भंगारात काढण्यात आल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे, ती अधिसूचना या विषयासाठी लागू होत नसताना ती लागू होत असल्याचे म्हटले आहे. हे विसंगत असल्याचे घाणेकर यांनी म्हटले आहे. घाणेकर यांचे सर्व आक्षेप हे चुकीचे आहेत, तसेच ते प्रशासनाकडून अमान्य करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

---------------------------

निकषांना छेद देउन ठराव

घाणेकर यांच्या मते, ६९ बस या केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान प्रकल्पांतर्गत घेण्यात आल्या होत्या. या बस भंगारात काढण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागेल. ती महापालिकेने घेतलेली नाही. तसेच २०१५ मध्ये घेतलेल्या बस किमान आठ वर्षे एक लाख किलोमीटर चालल्या पाहिजेत. या दोन्ही निकषांना छेद देत या बस भंगारात काढण्याचा ठराव महापालिकेने केलेला आहे.