शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

केडीएमटीच्या ६९ बस भंगारात काढण्याचा अहवाल थातूरमातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:16 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ६९ बस भंगारविक्रीत काढण्याचा अहवाल राज्य सरकारच्या आदेशानुसार परिवहन प्रशासनाने दिलेला असला, तरी ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ६९ बस भंगारविक्रीत काढण्याचा अहवाल राज्य सरकारच्या आदेशानुसार परिवहन प्रशासनाने दिलेला असला, तरी हा अहवाल थातूरमातूर असल्याने याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी दिला आहे.

परिवहन उपक्रमाने ६९ बस भंगारात काढण्याचा ठराव केला होता. या ठरावाला महासभेने मंजुरी दिली होती. या बस भंगारात काढण्यास माहिती अधिकार कार्यकर्ते घाणेकर यांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी त्यांनी नगरविकास खात्याकडे तक्रार करून हा ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली होती. नगरविकास खात्याने घाणेकर यांच्या तक्रारीची दखल घेत परिवहन प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने तयार केलेल्या अहवालाची प्रत घाणेकर यांना देण्यात आली. राज्य सरकारच्या ज्या अधिसूचनेचा आधार घेत या बस भंगारात काढण्यात आल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे, ती अधिसूचना या विषयासाठी लागू होत नसताना ती लागू होत असल्याचे म्हटले आहे. हे विसंगत असल्याचे घाणेकर यांनी म्हटले आहे. घाणेकर यांचे सर्व आक्षेप हे चुकीचे आहेत, तसेच ते प्रशासनाकडून अमान्य करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

---------------------------

निकषांना छेद देउन ठराव

घाणेकर यांच्या मते, ६९ बस या केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान प्रकल्पांतर्गत घेण्यात आल्या होत्या. या बस भंगारात काढण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागेल. ती महापालिकेने घेतलेली नाही. तसेच २०१५ मध्ये घेतलेल्या बस किमान आठ वर्षे एक लाख किलोमीटर चालल्या पाहिजेत. या दोन्ही निकषांना छेद देत या बस भंगारात काढण्याचा ठराव महापालिकेने केलेला आहे.