शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीच्या ६९ बस भंगारात काढण्याचा अहवाल थातूरमातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:16 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ६९ बस भंगारविक्रीत काढण्याचा अहवाल राज्य सरकारच्या आदेशानुसार परिवहन प्रशासनाने दिलेला असला, तरी ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ६९ बस भंगारविक्रीत काढण्याचा अहवाल राज्य सरकारच्या आदेशानुसार परिवहन प्रशासनाने दिलेला असला, तरी हा अहवाल थातूरमातूर असल्याने याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी दिला आहे.

परिवहन उपक्रमाने ६९ बस भंगारात काढण्याचा ठराव केला होता. या ठरावाला महासभेने मंजुरी दिली होती. या बस भंगारात काढण्यास माहिती अधिकार कार्यकर्ते घाणेकर यांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी त्यांनी नगरविकास खात्याकडे तक्रार करून हा ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली होती. नगरविकास खात्याने घाणेकर यांच्या तक्रारीची दखल घेत परिवहन प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने तयार केलेल्या अहवालाची प्रत घाणेकर यांना देण्यात आली. राज्य सरकारच्या ज्या अधिसूचनेचा आधार घेत या बस भंगारात काढण्यात आल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे, ती अधिसूचना या विषयासाठी लागू होत नसताना ती लागू होत असल्याचे म्हटले आहे. हे विसंगत असल्याचे घाणेकर यांनी म्हटले आहे. घाणेकर यांचे सर्व आक्षेप हे चुकीचे आहेत, तसेच ते प्रशासनाकडून अमान्य करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

---------------------------

निकषांना छेद देउन ठराव

घाणेकर यांच्या मते, ६९ बस या केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान प्रकल्पांतर्गत घेण्यात आल्या होत्या. या बस भंगारात काढण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागेल. ती महापालिकेने घेतलेली नाही. तसेच २०१५ मध्ये घेतलेल्या बस किमान आठ वर्षे एक लाख किलोमीटर चालल्या पाहिजेत. या दोन्ही निकषांना छेद देत या बस भंगारात काढण्याचा ठराव महापालिकेने केलेला आहे.