ठाणे : शटडाऊन घेण्यात येणार असल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने जांभूळपाडा व शहाड जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा प्रत्येक शुक्रवारी सकाळी ९ ते शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.या कालावधीत कोलशेत, बाळकुम, वागळे इस्टेट, कळवा, विटावा, बेलापूर रोड व खारेगाव, मुंबई-पुणे रोड, मुंब्रा-कौसा या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)
प्रत्येक शुक्रवारी कळवा, मुंब्य्राचा पाणीपुरवठा बंद राहणार!
By admin | Updated: January 29, 2015 23:31 IST