शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीचोरांविरोधात गुन्हे नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 01:49 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत बेकायदा नळजोडण्यांद्वारे सर्रास पाणीचोरी केली जाते.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत बेकायदा नळजोडण्यांद्वारे सर्रास पाणीचोरी केली जाते. त्यामुळे करदात्या नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या बेकायदा नळजोडण्या तोडा. तसेच संबंधित पाणीचोरांविरोधात गुन्हे दाखल करा. या कारवाईचा अहवाल सात दिवसांत सादर करा, असे आदेश महापौर विनीता राणे यांनी महापालिका प्रशासनास दिले आहेत.सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी ९ जुलैला पश्चिमेतील खाडी व रेतीबंदरकिनारी बड्या जलवाहिनीतून पाणी चोरणाऱ्यांचे स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यामुळे जलवाहिनीतून पाणीचोरी होत असल्याचे उघडकीस आले. त्याविरोधात त्यांनी प्रशासनाकडे कारवाईसाठी पाठपुरावा केला होता. मात्र, या घटनेला चार महिने उलटूनही अद्याप बेकायदा नळजोडण्या तोडलेल्या नाहीत. हे पाणी कोनगावातील पाणीमाफिया विकत आहेत. एका बेकायदा नळजोडणीपोटी दीड लाख रुपये लाटले जात आहेत. महापालिकेचे अधिकारी त्यांच्याविरोधात कारवाई करीत नाहीत. त्याचे कारण अधिकाºयांचे हात ओले केले जात आहेत, असा गंभीर आरोप करीत समेळ यांनी याप्रकरणी गुरुवारी झालेल्या महासभेत सभा तहकुबीची सूचना मांडली होती.यावेळी प्रशासनाला कारवाई करायची नसल्यास मी स्वत: पाणीचोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी पुढाकार घेईन, असे समेळ यांनी सांगितले.शिवसेना नगरसेवक मोहन उगले म्हणाले, पाणीचोरीमुळे ठाणकरपाडा, बेतूरकरपाडा येथील नागरिकांना पाणी मिळत नाही. तर, शिवसेनेचे नगरसेवक विश्वनाथ राणे म्हणाले, ‘महापालिका हद्दीत २५ टक्के पाणीचोरी होते. महापालिकेने मालमत्तांच्या सर्वेक्षणाचे काम कोलब्रो कंपनीला दिले होते. या कंपनीने काही बेकायदा नळजोडण्या शोधून त्याचा अहवाल महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिला आहे.मात्र त्या पाणीचोरांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. तसेच बेकायदा नळजोडण्या नियमित केल्या जात नाही. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत आहे. महापालिकेने एकदाच वॉटर आॅडिट केले होते. त्यानंतर पुन्हा ते केलेले नाही. त्यामुळे महापालिका हद्दीत नेमकी किती पाणीचोरी होते, याची माहिती कशी मिळणार? तसेच महापालिका हद्दीत सर्रासपणे बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. हे बेकायदा बांधकामधारक नागरिकांचे पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरत आहेत. ते आपल्या महापालिका हद्दीतून पाणीचोरी करतात की, अन्य शेजारच्या महापालिका हद्दीतून पाणी आणून बांधकामे करतात, याचाही शोध घेतला जाणे आवश्यक आहे.’यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक म्हणाले की, १५ बेकायदा नळजोडणीधारकांविरोधात पोलिसात तक्रार करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बेकायदा नळजोडण्या ज्या विभागात आढळल्या आहेत, तो विभाग संवेदनशील आहे. तेथे कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीमुळे वेळेवर बंदोबस्त मिळू शकला नव्हता. त्यामुळे कारवाईस विलंब झाला आहे. महापालिका हद्दीतील बेकायदा नळजोडण्या तोडण्यासाठी बारावे जलशुद्धीकरण केंद्राचा शटडाउन १९ नोव्हेंबरला घेतला आहे. यावेळी कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.>‘अन्यथा मी स्वत: कारवाई करणार’केडीएमसी प्रशासनाकडून कारवाईची हमी मिळाल्याने समेळ यांनी त्यांची सभा तहकुबीची सूचना मागे घेतली आहे. मात्र, १९ नोव्हेंबरनंतर कारवाई झाली नाही तर मी स्वत: जाऊन बेकायदा नळजोडण्या तोडेन, असे त्यांनी स्पष्ट केले.