शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

काटई रेल्वे उड्डाणपूलाच्या दुरुस्तीचे काम 10 दिवसात पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 15:50 IST

खासदारांनी केली कामाची पाहणी

कल्याण: कल्याण शीळ मार्गावरील काटई रेल्वे उड्डाणपूल हा 15 जूनपासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पूलाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या पूलाच्या दुरुस्तीचे काम येत्या दहा दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

रेल्वे अधिकारी व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमावेत खासदार शिंदे यांनी काटई पूलाच्या दुरुस्तीची आज सकाळी पाहणी केली. दुरुस्ती केल्यावर या पूलावर हलक्या वाहनांची वाहतूक सुरु ठेवणो शक्य होणा आहे. अवजड वाहनांची वाहतूक खोणी तळोजा मार्गे पनवेलकडे वळविण्यात येईल. काटई रेल्वे उड्डाण पूल हा कल्याण शीळ मार्गावर असून त्याच्या खालून दिवा पनवेल ही रेल्वे लाईन जाते. हा पूल वाहतूकीसाठी धोकादाययक असल्याने 15 जूनपासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता.

आयआयटीचीच्या अहवालानंतर पूलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. शीळ फाटामार्गे ठाणो, नवी मुंबई, पनवेल, पुणो परिसरात जाणाऱ्यांना पूल बंद असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्यांना या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळाने पूलावरील दहा टनाचा डेडलोड काढण्याचे काम केले आहे. उद्यापासून रेल्वेच्या अंतर्गत येणारे पूलाचे काम केले जाणार आहे. पूलाच्या चार गर्डरपैकी दोन गर्डरच्या बळकटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. दुरुस्तीनंतर पूल वाहतूकीसाठी किती ताण घेतो याची चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर पूलावरुन हलक्या वाहनांची वाहतूक सुरु केली जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण