शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
3
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
5
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
6
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
7
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
8
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
9
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
10
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
11
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
12
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
13
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
14
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
15
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
16
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
17
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
18
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
19
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
20
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

तलावातील गाळ काढल्याने पाणीसमस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:33 PM

माहुली परिसरातील टंचाई दूर होणार; पाणी साठवण्याची क्षमता वाढणार

वासिंद : माहुली परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी येथील दोन तलावांमधील २४,८६१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे काम नुकतेच करण्यात आले. यामुळे आता या तलावांची पाणी साठवण्याची क्षमता वाढणार आहे.माहुली किल्ल्याच्या कुशीतील माहुली, आवाळे, चांदरोटी, मामणोली, कराडे या पाच महसुली गावांमध्ये आणि त्यातील १८ पाड्यांमध्ये यंदा टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. टँकरचे पाणी ओतता यावे, यासाठी जेएसडब्ल्यू कंपनीद्वारे पाच हजार लीटर क्षमतेच्या दोन टाक्या दिल्या गेल्या. मात्र, मुळातच टँकरद्वारे पाणी द्यावे लागू नये, तसेच भूगर्भजल वाढावे, यासाठी या दोन तलावांतील गाळ काढण्याची मागणी माहुली ग्रामपंचायतीने जेएसडब्ल्यू कंपनीकडे केली होती. लोकांना तसेच जनावरांनाही पाणीटंचाई भेडसावते. प्राण्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू नयेत आणि त्यांना पिण्यास पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वनक्षेत्रपाल दर्शन ठाकूर यांनी हा प्रस्ताव कंपनीकडे मांडला. जेएसडब्ल्यू कंपनीचे पब्लिक रिलेशन आॅफिसर चिन्मय पालेकर यांनी हे काम कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) म्हणून हाती घेतल्याचे सांगितले.उपसरपंच प्रदीप आगिवले यांनी या तलावाच्या पाझरामुळे परिसरातील विहिरींमध्ये उन्हाळ्यात पाणी टिकेल आणि तलावाच्या आसपास असलेल्या शेतामध्ये भाजीपाल्याचे पीक घेता येईल, असा विश्वास व्यक्त केला. जेएसडब्ल्यू कंपनीने यापूर्वी कसारा येथील टोकरवाडी आणि वासिंदजवळील कातबाव तलावातील ३० हजार क्युबिक मीटर गाळ काढला होता. यावर्षी २४,८६१ क्युबिक मीटर गाळ काढून तलावांची धारणक्षमता ५४,८५१ क्युबिक मीटरने वाढवली आहे. शहापूर तालुक्यात पडणारा पाऊस अशा रीतीने अडवून जमिनीत जिरवल्यास तालुका टँकरमुक्त होण्यास निश्चितच मदत होईल.