शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

खाडीपुलाच्या मार्गातील अडथळे दूर

By admin | Updated: April 20, 2017 04:03 IST

ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या तिसऱ्या खाडीपुलाच्या मुख्य खांबउभारणीच्या आड येणाऱ्या शास्त्रीनगर

ठाणे : ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या तिसऱ्या खाडीपुलाच्या मुख्य खांबउभारणीच्या आड येणाऱ्या शास्त्रीनगर भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून येथील रहिवाशांनी स्वत:हून घरे खाली करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पालिकेचा कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. १४० रहिवाशांना बीएसयूपीमध्ये, तर ६० रहिवाशांना रेंटलच्या घरांत शिफ्ट केले आहे. या पुलाच्या उभारणीसाठी कळवानाका, विटावा आणि साकेत भागांत खांबउभारणीचे काम सुरू आहे. कळवा खाडीकिनारी असलेल्या शास्त्रीनगर भागातून हा पूल जाणार आहे. मात्र, त्या ठिकाणी असलेली बेकायदा बांधकामे त्या कामात अडसर ठरू लागली होती. त्यामुळे ती हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. तो महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घेतल्याने काही राजकीय पक्षांनी या भागातील मतांवर डोळा ठेवून कारवाईस विरोध केला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ही कारवाई रखडली होती. दरम्यान, या कामासाठी या भागातील २४० बांधकामे हटवण्याची कारवाई हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाने पुन्हा घेतला. परंतु, पुनर्वसनाचा तिढा निर्माण झाल्याने येथील कारवाईला ब्रेक लागला होता. आता तो जवळपास सुटला असल्याने बुधवारी शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांनी स्वत:हून आपली घरे खाली करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १४० लोकांचे पुनर्वसन बीएसयूपीच्या घरांमध्ये केले असून ६० लोकांना रेंटलच्या घरांमध्ये जागा दिली आहे. प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे येथील नागरिकांचा यापूर्वी कारवाईला असलेला विरोधदेखील आता मावळल्याने कारवाईविरोधात रान उठवणाऱ्या नेत्यांनीदेखील मवाळ भूमिका घेतली आहे. नागरिकांनीच सहकार्याची भूमिका घेतली असल्याने या उड्डाणपुलाच्या कामाला आता गती मिळणार आहे. महासभा झाल्यानंतर उद्यापासून या सर्व बांधकामांवर हातोडा पडणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)