शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

खाडीपुलाच्या मार्गातील अडथळे दूर

By admin | Updated: April 20, 2017 04:03 IST

ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या तिसऱ्या खाडीपुलाच्या मुख्य खांबउभारणीच्या आड येणाऱ्या शास्त्रीनगर

ठाणे : ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या तिसऱ्या खाडीपुलाच्या मुख्य खांबउभारणीच्या आड येणाऱ्या शास्त्रीनगर भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून येथील रहिवाशांनी स्वत:हून घरे खाली करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पालिकेचा कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. १४० रहिवाशांना बीएसयूपीमध्ये, तर ६० रहिवाशांना रेंटलच्या घरांत शिफ्ट केले आहे. या पुलाच्या उभारणीसाठी कळवानाका, विटावा आणि साकेत भागांत खांबउभारणीचे काम सुरू आहे. कळवा खाडीकिनारी असलेल्या शास्त्रीनगर भागातून हा पूल जाणार आहे. मात्र, त्या ठिकाणी असलेली बेकायदा बांधकामे त्या कामात अडसर ठरू लागली होती. त्यामुळे ती हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. तो महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घेतल्याने काही राजकीय पक्षांनी या भागातील मतांवर डोळा ठेवून कारवाईस विरोध केला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ही कारवाई रखडली होती. दरम्यान, या कामासाठी या भागातील २४० बांधकामे हटवण्याची कारवाई हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाने पुन्हा घेतला. परंतु, पुनर्वसनाचा तिढा निर्माण झाल्याने येथील कारवाईला ब्रेक लागला होता. आता तो जवळपास सुटला असल्याने बुधवारी शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांनी स्वत:हून आपली घरे खाली करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १४० लोकांचे पुनर्वसन बीएसयूपीच्या घरांमध्ये केले असून ६० लोकांना रेंटलच्या घरांमध्ये जागा दिली आहे. प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे येथील नागरिकांचा यापूर्वी कारवाईला असलेला विरोधदेखील आता मावळल्याने कारवाईविरोधात रान उठवणाऱ्या नेत्यांनीदेखील मवाळ भूमिका घेतली आहे. नागरिकांनीच सहकार्याची भूमिका घेतली असल्याने या उड्डाणपुलाच्या कामाला आता गती मिळणार आहे. महासभा झाल्यानंतर उद्यापासून या सर्व बांधकामांवर हातोडा पडणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)