शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खड्ड्यांतूनच काढा ‘वाट’

By admin | Updated: June 3, 2016 01:50 IST

रस्त्यातील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवण्यासाठी साडेतीन कोटींची तरतूद केली आहे. मात्र, निविदा न उघडल्याने खड्डे बुजवले नाही

उल्हासनगर : रस्त्यातील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवण्यासाठी साडेतीन कोटींची तरतूद केली आहे. मात्र, निविदा न उघडल्याने खड्डे बुजवले नाही. त्यामुळे नागरिकांवर ऐन पावसाळ्यात खड्ड्यांतून वाट काढावी लागणार आहे.उल्हासनगर महापालिकेने नालेसफाईसाठी १ कोटी ६७ लाख, तर रस्त्यांतील खड्डे व पुनर्बांधणीसाठी साडेतीन कोेटींची तरतूद अंदाजपत्रकात केली. दोन्ही कामांच्या निविदा उघडण्याच्या दिवशी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने काम खोळंबणार, असे बोलले जात होते. अत्यावश्यक कामे असल्याने त्या कामांना मंजुरी द्या, असे साकडे आयुक्त मनोहर हिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातले होते.न्यायालयाने ३१ मे पूर्वी नालेसफाईचे आदेश महापालिकांना दिले. त्यानुसार, जिल्हाधिकारी यांनी नालेसफाईच्या कामाला मंजुरी देताच पालिकेने निविदा उघडून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, पावसाळ्यापूर्वीच्या रस्ते-खड्डे दुरुस्तीचे काम रखडणार आहे. अद्यापही निविदा न उघडल्याची माहिती शहर अभियंता जितेंद्र जैस्वाल यांनी दिली आहे.गेल्या वर्षी तांत्रिक कारणामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्यांतील खड्डे बुजवले नव्हते. पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाल्यावर, अपघात वाढल्यावर रिक्षाचालक मालक संघटनेसह मनसेने आंदोलन केले. पालिकेला ऐन पावसाळ्यात नाइलाजाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घ्यावे लागले होते. ती वेळ येऊ नये, म्हणून रिपाइं नेते नाना बागुल व मनसेचे शहराध्यक्ष प्रदीप गोडसे, संजय घुगे यांनी आत्ताच खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे.