शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अतिक्रमणे १५ दिवसांत काढा; अंबरनाथ पालिकेला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:20 IST

रस्त्याच्या आड येणारे अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासन पुढाकार घेत नसल्याने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी पालिकेला चांगलेच धारेवर धरले.

अंबरनाथ : अंबरनाथमधील पाच प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एमएमआरडीएने निधी दिला आहे. मात्र निधी असतानाही या रस्त्यांचे काम सुरू करण्यात अडचणी येत आहेत. केवळ एकाच रस्त्याचे काम सुरू असून उर्वरित चारही रस्त्यांचे काम अजूनही कागदावरच आहे. रस्त्याच्या आड येणारे अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासन पुढाकार घेत नसल्याने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी पालिकेला चांगलेच धारेवर धरले. ही अतिक्रमणे काढण्यासाठी १५ दिवसांची मुदत पालिकेला दिली आहे.शहरातील पाच मुख्य रस्त्यांच्या कामासाठी एमएमआरडीएने ५५ कोटींचा निधी दिला आहे. त्यातील शिवाजी चौक ते लोकनगरी या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हा रस्ताही काही ठिकाणी अतिक्रमणांचा मुद्दा आल्याने तसाच रखडलेला आहे. तर उर्वरित चार रस्त्यांचे अजूनही काम सुरू झालेले नाही. त्यातील बेथल चर्च ते फुलेनगर रस्त्याचे काम अतिक्रमणांमुळे थांबले आहे. या रस्त्याचे अतिक्रमण काढण्याकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. तसेच खांबकर वाडी रस्ता, स्वामी समर्थ चौक रस्त्यांचीही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.शहरातील मुख्य रस्त्यांसाठी निधी आलेला असतानाही या रस्त्याचे काम होत नसल्याने एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी बैठक घेतली. या प्रकरणात पालिकेला रस्त्यांसदर्भात खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या बैठकीत शहरातील या पाच रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतलेला नाही ही बाब समोर आली.पालिका प्रशासनाची उदासीनता कारणीभूतरस्त्याचे प्रस्ताव मंजूर झाल्यावर पालिकेने अतिक्रमण काढण्याबाबत कार्यवाही करण्याची गरज होती. मात्र ते न केल्याने आज हे अतिक्रमण निघत नाही आणि त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्ता मोकळा न केल्याने कंत्राटदारानेही रस्त्याचे काम पूर्ण केलेले नाही. अखेर या प्रकरणी एमएमआरडीएचे अतिरीक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी पालिका अधिकाºयांना १५ दिवसात अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणambernathअंबरनाथ