शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ई-वेस्ट प्रकल्पाच्या कंत्राटदाराचा काढता पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:09 IST

आर्थिक स्थिती योग्य नसल्याचे कारण : नगरसेवकांनी केली कारवाईची मागणी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील ई-वेस्टवर प्रक्रिया करण्यासाठी रिस्पोज वेस्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च कंपनीने निविदा भरली होती. महापालिकेकडून या कंपनीला कामही दिले जाणार होते. मात्र, ऐनवेळी कंपनीने आर्थिक कारण देत प्रकल्प राबविण्यात स्वारस्य नाही, असे महापालिकेस कळविले आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने आयत्यावेळी शनिवारी महासभेत मंजुरीसाठी ठेवला असता सर्वपक्षांच्या नगरसेवकांनी कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे.

रिस्पोज वेस्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च कंपनीने ई-वेस्टवर प्रक्रिया करण्याची तयारी दर्शवली होती. कंपनीने ३०० चौरस फुटांची मोकळी जागा रिकव्हरी शेड व चार हजार चौरस मीटरची जागा प्रकल्पासाठी मागितली होती. महापालिकेने या कंपनीला हे काम देण्याचे ठरविले होते. मात्र, आर्थिक बळ नसल्याने कंपनीने आता कामात रस नसल्याचे कारण महापालिकेला दिले आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने शनिवारी महासभेत मांडला.

मात्र, कंपनीचे अन्य १५ ठिकाणी प्रकल्प सुरू असताना कंपनीने आर्थिक स्थिती योग्य नाही, असे ऐनवेळी सांगणे योग्य आहे का, असा प्रश्न स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी केला.

कंपनीला कामात स्वारस्य नसेल तर कंपनीने प्रशासनाचा वेळ वाया घालविला. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी प्रक्रिया राबविण्यात खर्च झाला आहे. महापालिका कचरा प्रकरणावरून आधीच अडचणीत आहे. त्यातच प्रशासनाने अशा प्रकारचा प्रस्ताव आयत्यावेळी सभेपुढे कसा व कशाच्या आधारे मांडला आहे. प्रशासन कंत्राटदार कंपनीला पाठीशी घालत आहे. कंपनीने महापालिकेचा वेळ वाया घालविला असल्याने कंपनीच्या विरोधात दंडात्मक रक्कम आकारावी. या कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी म्हात्रे यांनी महासभेत केली.

राज्यातील कोणत्याही महापालिका आपल्या हद्दीत ई वेस्ट प्रकल्प नाही. हा प्रकल्प सुरू झाला असता तर केडीएमसी ही राज्यातील ई वेस्ट प्रकल्प राबवणारी पहिली महापालिका ठरली असती. मात्र, कंत्राटदाराने पळ काढल्याने ई वेस्टसाठी नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

दरम्यान, ई वेस्ट प्रकल्प राबवण्यासाठी २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी पुढाकार घेतला होता. तेव्हापासून जुलै २०१९ पर्यंत केवळ कागदी घोडे नाचवण्यातच प्रशासनाने धन्यता मानली आहे. घनकचरा प्रकल्पही संथगतीने सुरू असल्याने महापालिकेस मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डेडलाइन दिली आहे.

घनकचरा प्रकल्पांप्रमाणे कोंडीई वेस्ट प्रकल्पासाठी ‘डोंबिवली व्हिजन २०२०’ मांडणारे डोंबिवलीतील डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी पुढाकार घेतला होता.त्यासाठी त्यांनी ई वेस्ट गोळा करण्यासाठी मोहीम राबवली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर त्यांनी तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊनही त्यातही महापालिकेने स्वारस्य दाखविले नाही. घनकचरा प्रकल्पांप्रमाणेच ई वेस्ट प्रकल्पाची ही कोंडीच झाली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका