शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

ई-वेस्ट प्रकल्पाच्या कंत्राटदाराचा काढता पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:09 IST

आर्थिक स्थिती योग्य नसल्याचे कारण : नगरसेवकांनी केली कारवाईची मागणी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील ई-वेस्टवर प्रक्रिया करण्यासाठी रिस्पोज वेस्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च कंपनीने निविदा भरली होती. महापालिकेकडून या कंपनीला कामही दिले जाणार होते. मात्र, ऐनवेळी कंपनीने आर्थिक कारण देत प्रकल्प राबविण्यात स्वारस्य नाही, असे महापालिकेस कळविले आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने आयत्यावेळी शनिवारी महासभेत मंजुरीसाठी ठेवला असता सर्वपक्षांच्या नगरसेवकांनी कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे.

रिस्पोज वेस्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च कंपनीने ई-वेस्टवर प्रक्रिया करण्याची तयारी दर्शवली होती. कंपनीने ३०० चौरस फुटांची मोकळी जागा रिकव्हरी शेड व चार हजार चौरस मीटरची जागा प्रकल्पासाठी मागितली होती. महापालिकेने या कंपनीला हे काम देण्याचे ठरविले होते. मात्र, आर्थिक बळ नसल्याने कंपनीने आता कामात रस नसल्याचे कारण महापालिकेला दिले आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने शनिवारी महासभेत मांडला.

मात्र, कंपनीचे अन्य १५ ठिकाणी प्रकल्प सुरू असताना कंपनीने आर्थिक स्थिती योग्य नाही, असे ऐनवेळी सांगणे योग्य आहे का, असा प्रश्न स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी केला.

कंपनीला कामात स्वारस्य नसेल तर कंपनीने प्रशासनाचा वेळ वाया घालविला. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी प्रक्रिया राबविण्यात खर्च झाला आहे. महापालिका कचरा प्रकरणावरून आधीच अडचणीत आहे. त्यातच प्रशासनाने अशा प्रकारचा प्रस्ताव आयत्यावेळी सभेपुढे कसा व कशाच्या आधारे मांडला आहे. प्रशासन कंत्राटदार कंपनीला पाठीशी घालत आहे. कंपनीने महापालिकेचा वेळ वाया घालविला असल्याने कंपनीच्या विरोधात दंडात्मक रक्कम आकारावी. या कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी म्हात्रे यांनी महासभेत केली.

राज्यातील कोणत्याही महापालिका आपल्या हद्दीत ई वेस्ट प्रकल्प नाही. हा प्रकल्प सुरू झाला असता तर केडीएमसी ही राज्यातील ई वेस्ट प्रकल्प राबवणारी पहिली महापालिका ठरली असती. मात्र, कंत्राटदाराने पळ काढल्याने ई वेस्टसाठी नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

दरम्यान, ई वेस्ट प्रकल्प राबवण्यासाठी २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी पुढाकार घेतला होता. तेव्हापासून जुलै २०१९ पर्यंत केवळ कागदी घोडे नाचवण्यातच प्रशासनाने धन्यता मानली आहे. घनकचरा प्रकल्पही संथगतीने सुरू असल्याने महापालिकेस मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डेडलाइन दिली आहे.

घनकचरा प्रकल्पांप्रमाणे कोंडीई वेस्ट प्रकल्पासाठी ‘डोंबिवली व्हिजन २०२०’ मांडणारे डोंबिवलीतील डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी पुढाकार घेतला होता.त्यासाठी त्यांनी ई वेस्ट गोळा करण्यासाठी मोहीम राबवली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर त्यांनी तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊनही त्यातही महापालिकेने स्वारस्य दाखविले नाही. घनकचरा प्रकल्पांप्रमाणेच ई वेस्ट प्रकल्पाची ही कोंडीच झाली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका