शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

अल्पभूधारक लढाईपासून दूरच

By admin | Updated: June 3, 2017 06:10 IST

ठाणे, पालघरमध्ये झपाट्याने सुरू असलेले नागरिकीकरण, उरलेल्या शेतकऱ्यांपैकी ८२ टक्के शेतकरी अल्पभूधारक असणे, त्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे, पालघरमध्ये झपाट्याने सुरू असलेले नागरिकीकरण, उरलेल्या शेतकऱ्यांपैकी ८२ टक्के शेतकरी अल्पभूधारक असणे, त्याच्या शेतीमालावर येथील रहिवासी अवलंबून न असणे आणि सक्षम नेतृत्वाचा अभाव या कारणांमुळे राज्याच्या अनेक भागांत सध्या सुरू असलेल्या शेतकरी संपाचा लवलेश या दोन जिल्ह्यांमध्ये जाणवत नाही. शहापूर व मुरबाडच्या टोकावडे परिसरात शेतीमाल घेऊन येणारे ट्रक अडवण्याचा प्रयत्न शुक्रवारी स्थानिक शेतकऱ्यांनी केला. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक महापालिका असून त्यासाठी येणारा भाजीपाला, दूधपुरवठा नाशिक, नगर, पुणे आदी जिल्ह्यांतून होत आहे. या पुरवठ्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शेतकरी सक्षम नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्या आहेत. जिल्ह्यातील ८२ टक्के म्हणजे एक लाख आठ हजार ८१२ शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. पावसाळ्यात ते केवळ भाताचे उत्पन्न घेतात. स्थानिक बाजारपेठेतही त्यांचा भाजीपाला जात नाही.स्थानिक शेतकऱ्यांचे भाजीपाल्याचे उत्पादन काही महिने आधीच संपले आहे. नागरिकीकरणाच्या रेट्यात शेतीखालची जमीन झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यात केवळ ७७ हजार ६४४ हेक्टर शेती असून त्यावर एक लाख ३२ हजार शेतकऱ्यांची मालकी आहे. यापैकी एक लाख आठ हजार ८१२ शेतकरी अल्पभूधारक आहेत. केवळ १८ टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. शेतीला लागणाऱ्या खर्चापेक्षा कमी उत्पादन होत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आले असून तो शेतीतून बाहेर पडत आहे. यापेक्षा मजुरी करणे त्याने स्वीकारले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खंबीर नेतृत्व नाही. शेतकऱ्यांच्या संपाला ठाणे, पालघरमधून प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. खंबीर नेतृत्वाचा अभाव असून दुर्दैवाने शेतकरी संघटित नाही. मात्र, त्यांना कर्जमाफी हवीच आहे. बहुतांश शेतकरी थकबाकीदार आहेत. संपाला पाठिंबा देण्यासाठी लवकरच ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत- राजेंद्र पाटील, अध्यक्ष, टीडीसीसी बँकएकूण १० एकरमध्ये १७ हजार केळींची बाग आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही केळी काढणे थांबवले आहे. सुमारे १०० शेतकऱ्यांचा एक गट ठाणे, पालघरमध्ये केळी उत्पादक आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार नाही, तोपर्यंत हा संप सुरूच ठेवणार आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. - निलेश भोईर, गांद्रे, वाडागुजरातमधून दूध आणणार असल्याचे ऐकायला मिळत आहे. मात्र, तसे झाल्यास ठाणे, पालघरमधील आइस्क्रीम पार्लर कुणबीसेना चालू देणार नाही. ७ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा नेते माधव भांडारी यांना नांगर, बी-बियाणे भेट देऊन निषेध करणार आहे. यापुढे आम्ही फक्त घराला पुरेल तेवढेच अन्नधान्य पिकवणार आहे. - प्रफुल्ल पाटील, कुणबीसेना, जिल्हाप्रमुखशहापूर तालुक्यात सध्या भाजीपाला व दुधाचे फारसे उत्पादन नाही. शहरात भाजीपाला जात नाही. काही शेतकरी दूध उत्पादक असले, तरी दोन ते पाच रुपयांचा नफा मिळवून विकतात. तालुक्यात कोठेही दूध उत्पादक सोसायट्या नाहीत. विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. शेतकरी गरीब आहे. या संपाला शेतकऱ्यांचा फारसा पाठिंबा दिसून येत नाही.- राकेश वारघडे, शाई शेतकरी संघर्ष समिती