शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

रेमडेसिविरच्या काळाबाजाराचे ठामपास देणेघेणे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:41 IST

ठाणे : एकीकडे ठाण्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असतांना दुसरीकडे ठाणे महापालिकेच्याच कोविड सेंटरमधून काही दिवसांपूर्वी त्याचा काळा बाजार ...

ठाणे : एकीकडे ठाण्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असतांना दुसरीकडे ठाणे महापालिकेच्याच कोविड सेंटरमधून काही दिवसांपूर्वी त्याचा काळा बाजार करणाऱ्यास अटक केली आहे. याचा तपास ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने सुरू केला तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र याची साधी चौकशीदेखील अद्याप केली नसल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी झालेल्या महासभेत उघड झाली. त्यामुळे या संदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनी आरोग्य अधिका:यांना चांगलेच सुनावून या प्रकरणाचा तपास हा आरोग्य विभागाने केलाच पाहिजे असे स्पष्ट केले.

ठाणे महापालिका हद्दीत सध्या रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. ते इंजेक्शन मिळावे यासाठी महापालिका जास्तीची किमंत मोजण्यासही तयार झाली आहे. परंतु, महापालिकेच्याच कोविड सेंटरमधून त्याचा काळा बाजार केला जात असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. ठाणे खंडणी विरोधी पथकाने रेमडेसिविरचा काळा बाजार करणा:या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. . यातील एक आरोपी हा महापालिकेच्याच ग्लोबल कोविड सेंटरमध्ये कामाला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आरोग्य विभागाकडून होणे अपेक्षित होते, अशी माहिती म्हस्के यांनी महासभेत दिली. त्याला रेमडेसिविर कोण देत होते, कोणाकडून त्याने ते उचलले होते, याची माहिती आरोग्य विभागाने घेणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी या प्रकरणाकडे काहीच लक्षच दिले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची चौकशी आरोग्य विभागाने केली का? असा सवालही त्यांनी केला. परंतु, खंडणी विरोधी पथक या प्रकरणाची चौकशी करीत असल्याने आम्ही त्याची चौकशी केली नसल्याची माहिती प्रभारी आरोग्य अधिकारी वैजयंती देवगीकर यांनी सभागृहात दिली. त्यांच्या या उत्तराने महापौर आणखीनच संतप्त झाले. महापालिकेच्या कोविड सेंटरमधून जर इंजेक्शन गायब होत असतील त्याची जबाबदारी ही आरोग्य विभागाची नाही का?, त्याचा तपास हा झालाच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकूणच या प्रकरणात आरोग्य विभागाची चुक असल्याचेही त्यांनी सांगितले.