शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वंचित महिलांचा उल्लेखनीय कलाविष्कार

By admin | Updated: April 1, 2017 05:22 IST

घटस्फोटित महिलांच्या समस्या, हुंडापद्धती, नवऱ्याचा जाच असे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या आणि आजही समाजात

ठाणे : घटस्फोटित महिलांच्या समस्या, हुंडापद्धती, नवऱ्याचा जाच असे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या आणि आजही समाजात दिसणाऱ्या गंभीर प्रश्नांना वंचित घटकांमधीलच महिलांनी आपल्या नाटकातून वाचा फोडण्याची केलेली हिंमत, दिग्गज कलावंतांपेक्षाही सरस होत केलेला साधा मात्र सहज अभिनय आणि त्याला प्रेक्षकांसह मान्यवर कलावंतांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिलेली कौतुकास्पद दाद अशा उत्साही वातावरणात शनिवारी वंचित महिलांचा नाट्यजल्लोष टाउन हॉलच्या खुला रंगमंचावर रंगला. या कौतुकाने काही महिला कलावंतांना आपले अश्रूही अनावर झाले. समता विचार प्रसारक संस्था आयोजित वंचित महिलांचा नाट्यजल्लोष रविवारी रंगला. विविध विभागांतील ७ महिला गटांनी नाटिका सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. माजिवडा विभागाने घटस्फोटित स्त्रीची समस्या ही सत्यघटनेवर आधारित घटना ‘स्वाभिमान.कॉम’ या नाटकातून दाखवली. सावरकरनगर गटाने ‘रि-युनियन’ या नाटिकेतून पतीमुळे झालेली घुसमट मैत्रिणींच्या पाठिंब्यामुळे उडवून देण्याचे ठरवते, हा विषय मांडला. आझादनगर येथील हिंदी भाषिक महिलांनी ‘दहेज-एक-अभिशाप’ ही हुंड्याच्या वाईट चालीवरील नाटिका सादर केली. मनोरमानगर गटाने महिलांच्या मासिकपाळीबद्दल समाजात रूढ असलेल्या गैरसमजावर आधारित ‘आता तुमची पाळी’ ही नाटिका उत्तमरीत्या सादर केली. नवशीबाई कम्पाउंड गटाने एका विकल्या गेलेल्या परप्रांतातील मुलीचे आयुष्य काही स्त्रियांच्या मदतीने कसे सावरते आणि सामाजिक बांधीलकी कशी जपली गेली, ती सत्यघटनेवर आधारित ‘एक अस्तित्व’ नाटिका सादर केली. किसननगरमधील महिलांनी सादर केलेल्या ‘वाट’ या नाटिकेत अमेरिकास्थित मुलगा परत येऊन आईची सर्व मालमत्ता हडप करून तिला कसे निराधार सोडतो, ती व्यथा मांडली. तर, मानपाडा येथील एकलव्यमधील मुलांनी स्त्री-पुरु ष समतेवर विनोदी नाटिका सादर केली.सहभागी कलावंतांना अनुबंध संस्था, कल्याण यांच्यातर्फे भेट देण्यात आली. सर्व गटांना महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि पारितोषिकही देण्यात आले. या कार्यक्रमाला महापालिका सभागृह नेते नरेश म्हस्के, या रंगमंचाचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक रवी जाधव, मेघना जाधव, प्रसिद्ध कलाकार सविता दळवी, विशाखा देशपांडे तसेच संस्थेचे अध्यक्ष संजय मंगला गोपाल, विश्वस्त जगदीश खैरालिया, रोटरियन अर्जुन मुड्डा, नाट्यजल्लोषच्या संयोजिका बोरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)गरीब वस्तीतील तरुण मुलांच्या वाढत्या शारीरिक ऊर्जेला वाममार्गाला जाण्यापासून थांबवण्यासाठी आणि योग्य वळण देण्यासाठी वस्त्यावस्त्यांमध्ये क्र ीडा केंद्र उभारावे, अशा आशयाचे निवेदन महापौरांना देण्यात आले. या बाबी अमलात आणण्यासाठी आवर्जून प्रयत्न करीन, असे आश्वासन महापौर शिंदे यांनी दिले.