शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली अग्निशमन केंद्राचे पलावा येथे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:26 IST

डोंबिवली : केडीएमसीचे एमआयडीसीतील डोंबिवली अग्निशमन केंद्र धोकादायक झाल्याने ते पलावा जंक्शन येथे हलविण्यात येणार आहे. परंतु, गरजेनुसार एमआयडीसीच्या ...

डोंबिवली : केडीएमसीचे एमआयडीसीतील डोंबिवली अग्निशमन केंद्र धोकादायक झाल्याने ते पलावा जंक्शन येथे हलविण्यात येणार आहे. परंतु, गरजेनुसार एमआयडीसीच्या परिसर अथवा नजीकच्या भागातील एखाद्या जागेत ते हलविणे अपेक्षित होते. डोंबिवलीपासून ते पाच ते सहा किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी नेले जात आहे. त्यात कल्याण-शीळ मार्गावरील वाहनांची कोंडी पाहता आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी पोहोचताना यंत्रणेला विलंब लागणार आहे.

एमआयडीसीतील हे अग्निशमन केंद्र केडीएमसीच्या स्थापनेपासूनच १९८३ला सुरू झाले. प्रारंभी एमआयडीसीची गरज म्हणून उभारलेल्या या केंद्रातून कालांतराने संपूर्ण शहरात सेवा दिली जात आहे. या केंद्राचे बांधकाम साधारण १९७९-८० मधील आहे. २००८-०९ मध्ये केंद्राची डागडुजी करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर मात्र देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने बहुतांश ठिकाणी भिंतीतून पावसाचे पाणी झिरपत असल्याने प्लास्टर कोसळण्याच्या स्थितीत आहे. अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील छताचे प्लास्टर ऑगस्ट २०१९ मध्ये कोसळले होते. आजही केंद्राची अवस्था पाहता जीव मुठीत धरूनच येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना वावरावे लागत होते.

दरम्यान, केंद्र धोकादायक असल्याचे आणि ते वापरण्यालायक राहिले नसल्याचे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये उघडकीस आल्याने तेथील कारभार येत्या दोन ते तीन दिवसात पलावा येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रप्रमुख दत्तात्रय शेळके यांनी दिली.

-------

केंद्र दूर नेण्याची नामुष्की

- महापालिकेने आपले अनेक भूखंड महसूल विभागाला उपलब्ध करून दिले आहेत. सुसज्ज अशा या जागा आहेत. पोलीस ठाण्यांसाठीही जागा दिल्या आहेत. परंतु, अग्निशमन केंद्रासाठी मात्र डोंबिवलीत जागा न मिळाल्याने दूरवर असलेल्या आणि वाहतूककोंडीचे जंक्शन असलेल्या पलावा येथे हलविण्याची नामुष्की मनपावर आली आहे.

- एमआयडीसीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक कंपन्या आहेत. दरवर्षी सात ते आठ कंपन्यांना मोठ्या आगी लागतात, तर इतरही आगींचे ३०० ते ३५० कॉल या केंद्रात येतात. त्यामुळे पलावा येथे केंद्र गेल्यावर आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी घटनास्थळी पोहोचताना अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

-----------------