शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

वृक्ष पडून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:50 IST

ठाणे : शहरात वारंवार वृक्ष पडण्याच्या घटना घडत असतात. त्यांत काहीजण जखमी होतात, तर काहींना आपले प्राणही गमवावे ...

ठाणे : शहरात वारंवार वृक्ष पडण्याच्या घटना घडत असतात. त्यांत काहीजण जखमी होतात, तर काहींना आपले प्राणही गमवावे लागत आहेत. त्यामुळे वृक्ष पडून तसेच गटारांच्या चेंबरमध्ये पडून मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या नातेवाइकांकडून महापालिकेकडे मदतीची मागणी होत होती. परंतु, अशा परिस्थितील कशा स्वरूपाची मदत द्यायची, असा पेच प्रशासनाला सतावत होता. त्यामुळे आता ही मदत कोणत्या स्वरूपाची असावी, याचा निर्णय प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या हाती सोपविला असून तसा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या महासभेसमोर ठेवला आहे.

वृक्ष दुर्घटनेत २०१७ मध्ये धर्मवीरनगर येथे किशोर पवार यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नीला पालिका सेवेत नोकरी देण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली होती. त्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु, शासनाने तो फेटाळून लावला होता. अखेर प्रशासनाने पवार यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. २०१६ मध्ये साकेत रस्त्यावरील गटाराचे चेंबर तुटून खाली पडले होते. त्यात जमिला अलिस खान यांचा मृत्यू झाला होता. याच वर्षी महापालिकेच्या कला, क्रीडा महोत्सवात सहभागी झालेल्या एका खेळाडूचा अपघाती मृत्यू झाला होता. या दोघांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत महापालिकेने देऊ केली होती.

दरम्यान, २१ एप्रिल २०२१ रोजी मासुंदा तलाव परिसरात झाड पडून रिक्षाचालक अरविंद राजभर आणि चंद्रकांत पाटील यांचा मृत्यू झाला होता. या दोघांच्या नातेवाइकांनी नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. परंतु, आर्थिक मदत देण्याची कोणतीही तरतूद नसल्यामुळे प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळेच आता या संदर्भातील निर्णय घेता यावा यासाठी प्रस्ताव तयार करून तो सोमवारच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.