शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रस्तेबाधितांच्या पुनर्वसनाचे आश्वासन विरले हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 03:24 IST

केडीएमसीने दीड वर्षापूर्वी हाती घेतलेले कल्याण-मलंग रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन बीएसयूपी घरकुल योजनेत करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते.

कल्याण : केडीएमसीने दीड वर्षापूर्वी हाती घेतलेले कल्याण-मलंग रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन बीएसयूपी घरकुल योजनेत करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते. मात्र, ते हवेत विरले आहे. त्यामुळे बाधित पुनर्वसनासाठी महापालिका कार्यालयात खेटे मारत आहेत. या बाधितांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय १५ दिवसांत न घेतल्यास महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रशासनास दिला आहे.पूर्वेतील चक्कीनाका ते मलंग रस्ता हा नेवाळीनाक्यापर्यंत जवळपास चार किलोमीटर अंतराचा आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे २०१६ पासून आतापर्यंत प्राजक्ता फुलोरे आणि तेजस शिंदे यांचा अपघातात जीव गेला. या रस्त्याचे काम हाती घेण्यासाठी पाटील यांनी रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर, महापालिकेने ४५ कोटी रुपये खर्चून हा रस्ता ४५ मीटर रुंद करण्यास मंजुरी दिली. २०१६ मध्ये रस्ते रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू झाले. मात्र, ४५ मीटर रस्ता रुंदीकरणात अनेक जण बाधित होत असल्याने हा रस्ता ३० मीटर करण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला. असे असतानाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही इमारती व हॉटेल वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही ठिकाणी रस्ता ३० मीटरपेक्षा कमी रुंद झाल्याची बाब पाटील यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, त्याची दखल महापालिकेने घेतलेली जात नाही. रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून महापालिकेच्या अधिकारांना धारेवर धरले होते. गॅरेज आणि दुकानदारांनी अतिक्रमण कल्याने रुंदीकरणाच्या कामात बाधा येत असल्याचा मुद्दा त्यावेळी उपस्थित केला गेला.रस्त्याचे काम दीड वर्षात पूर्ण न झाल्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली होती. या रस्ते विकासकामात चक्कीनाक्यापासून नेवाळीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जवळपास १५० नागरिकांची घरे बाधित झाली. या नागरिकांचे पुनर्वसन बीएसयूपी योजनेत केले जाईल, असे आश्वासन तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिले होते. या आश्वासनाची मात्र अंमलबजावणी झालेली नाही.हॉटेल्स व इमारतमालकांना वाचवले जात आहे. मात्र, ज्या गोरगरिबांनी रस्त्यासाठी घरे दिली, त्यांच्या पुनर्वसनाविषयी महापालिका उदासीन आहे, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. प्रशासनाने १५ दिवसांत निर्णय न घेतल्यास महापालिका मुख्यालयात ठिय्या धरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.>घरे का दिली जात नाहीत?बीएसयूपीतील तीन हजार घरे पंतप्रधान आवास योजनेत रूपांतरित करून त्यातून २२४ कोटींचा निधी उभारण्याचा निर्णय तत्कालीन महापालिका आयुक्तांनी घेतला. त्याला नगरसेवकांनी विरोध केला.महापालिकेकडे बीएसयूपीचे लाभार्थी कमी आणि घरे जास्त आहेत. मात्र, ही घरे रस्ते तसेच विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाºयांना का दिली जात नाहीत. घरे देण्याचे प्रकरण का रखडवून ठेवले आहे, असा सवाल केला जात आहे. महापालिकेची पुनर्वसनाविषयीची अनास्था यातून उघड होत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका