शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

रस्तेबाधितांच्या पुनर्वसनाचे आश्वासन विरले हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 03:24 IST

केडीएमसीने दीड वर्षापूर्वी हाती घेतलेले कल्याण-मलंग रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन बीएसयूपी घरकुल योजनेत करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते.

कल्याण : केडीएमसीने दीड वर्षापूर्वी हाती घेतलेले कल्याण-मलंग रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन बीएसयूपी घरकुल योजनेत करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते. मात्र, ते हवेत विरले आहे. त्यामुळे बाधित पुनर्वसनासाठी महापालिका कार्यालयात खेटे मारत आहेत. या बाधितांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय १५ दिवसांत न घेतल्यास महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रशासनास दिला आहे.पूर्वेतील चक्कीनाका ते मलंग रस्ता हा नेवाळीनाक्यापर्यंत जवळपास चार किलोमीटर अंतराचा आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे २०१६ पासून आतापर्यंत प्राजक्ता फुलोरे आणि तेजस शिंदे यांचा अपघातात जीव गेला. या रस्त्याचे काम हाती घेण्यासाठी पाटील यांनी रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर, महापालिकेने ४५ कोटी रुपये खर्चून हा रस्ता ४५ मीटर रुंद करण्यास मंजुरी दिली. २०१६ मध्ये रस्ते रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू झाले. मात्र, ४५ मीटर रस्ता रुंदीकरणात अनेक जण बाधित होत असल्याने हा रस्ता ३० मीटर करण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला. असे असतानाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही इमारती व हॉटेल वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही ठिकाणी रस्ता ३० मीटरपेक्षा कमी रुंद झाल्याची बाब पाटील यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, त्याची दखल महापालिकेने घेतलेली जात नाही. रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून महापालिकेच्या अधिकारांना धारेवर धरले होते. गॅरेज आणि दुकानदारांनी अतिक्रमण कल्याने रुंदीकरणाच्या कामात बाधा येत असल्याचा मुद्दा त्यावेळी उपस्थित केला गेला.रस्त्याचे काम दीड वर्षात पूर्ण न झाल्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली होती. या रस्ते विकासकामात चक्कीनाक्यापासून नेवाळीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जवळपास १५० नागरिकांची घरे बाधित झाली. या नागरिकांचे पुनर्वसन बीएसयूपी योजनेत केले जाईल, असे आश्वासन तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिले होते. या आश्वासनाची मात्र अंमलबजावणी झालेली नाही.हॉटेल्स व इमारतमालकांना वाचवले जात आहे. मात्र, ज्या गोरगरिबांनी रस्त्यासाठी घरे दिली, त्यांच्या पुनर्वसनाविषयी महापालिका उदासीन आहे, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. प्रशासनाने १५ दिवसांत निर्णय न घेतल्यास महापालिका मुख्यालयात ठिय्या धरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.>घरे का दिली जात नाहीत?बीएसयूपीतील तीन हजार घरे पंतप्रधान आवास योजनेत रूपांतरित करून त्यातून २२४ कोटींचा निधी उभारण्याचा निर्णय तत्कालीन महापालिका आयुक्तांनी घेतला. त्याला नगरसेवकांनी विरोध केला.महापालिकेकडे बीएसयूपीचे लाभार्थी कमी आणि घरे जास्त आहेत. मात्र, ही घरे रस्ते तसेच विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाºयांना का दिली जात नाहीत. घरे देण्याचे प्रकरण का रखडवून ठेवले आहे, असा सवाल केला जात आहे. महापालिकेची पुनर्वसनाविषयीची अनास्था यातून उघड होत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका