शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पुनर्वसित ग्रामस्थांनी दिला जुन्या घरी परतण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:25 IST

बारवी धरणग्रस्त संतप्त : जिल्हाधिकाऱ्यांपुढे वाचला समस्यांचा पाढा

सुरेश लोखंडे 

ठाणे : यंदाच्या पावसाळ्यात बारवी धरणाच्या पाण्याखाली सहा ते सात गावे जाणार आहेत. यापैकी मुरबाड तालुक्यातील तोंडली या संपूर्ण गावाचे पुनर्वसन झाले; मात्र अत्यंत कमी दर्जाच्या सुविधांमुळे या ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुनर्वसन केलेल्या ठिकाणी उत्तम दर्जाच्या सुविधा द्या, अन्यथा पुन्हा जुन्या घरात राहण्यास जाण्याचा इशारा ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी दिला आहे.

‘बारवीमध्ये ६३ टक्के पाणीसाठा’ मथळ्याखाली लोकमतने २३ जुलैला वृत्त प्रसिद्ध करून जलसमाधी मिळणाºया गावपाड्यांचे वास्तव उघड केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी २४ जुलैला तोंडलीच्या पुनर्वसित गावठाणाला भेट देऊन गावकºयांशी चर्चा केली. या भेटीदरम्यान गावकºयांनी सोयीसुविधांचा अभाव असून रस्त्यांसह गटारी व शौचालयांच्या कामांचीही तक्रार केली. कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन भूखंडावर या तोंडली गावकºयांंचे पुनर्वसन केले. यंदा बारवी धरणात चार मीटर वाढीव पाणीसाठा होणार आहे. त्याखाली या तोंडली गावाला जलसमाधी मिळणार आहे. तत्पूर्वी, या गावकºयांचे सासणे ग्रामपंचायत हद्दीत टेपाची वाडीजवळ व नदीकाठाला लागून असलेल्या गावठाणात पुनर्वसन केले आहे.

या पुनर्वसित गावाच्या गावठाणाला भेट देऊन जिल्हाधिकाºयांनी पाहणी केली. पावसामुळे त्यांना फारवेळ थांबता आले नाही. यादरम्यान नदीकाठाजवळील पुनर्वसित कातकरी समाजाच्या ग्रामस्थांनी गाडीला गराडा टाकत या सोयीसुविधांकडे जिल्हाधिकाºयांचे लक्ष वेधले. बारवी धरण विस्थापित शेतकरी संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ बांगर, सचिव किसन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ३१ शेतकºयांच्या स्वाक्षरीने लेखी तक्रार करून उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा द्या, अन्यथा आम्हाला परत आमच्या घरी जावे लागेल. त्यानंतरची सर्व जबाबदारी एमआयडीसीच्या अधिकाºयांची राहील, असा इशाराही त्यांनी लेखी स्वरूपात दिला आहे.