शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

पुनर्वसित ग्रामस्थांनी दिला जुन्या घरी परतण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:25 IST

बारवी धरणग्रस्त संतप्त : जिल्हाधिकाऱ्यांपुढे वाचला समस्यांचा पाढा

सुरेश लोखंडे 

ठाणे : यंदाच्या पावसाळ्यात बारवी धरणाच्या पाण्याखाली सहा ते सात गावे जाणार आहेत. यापैकी मुरबाड तालुक्यातील तोंडली या संपूर्ण गावाचे पुनर्वसन झाले; मात्र अत्यंत कमी दर्जाच्या सुविधांमुळे या ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुनर्वसन केलेल्या ठिकाणी उत्तम दर्जाच्या सुविधा द्या, अन्यथा पुन्हा जुन्या घरात राहण्यास जाण्याचा इशारा ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी दिला आहे.

‘बारवीमध्ये ६३ टक्के पाणीसाठा’ मथळ्याखाली लोकमतने २३ जुलैला वृत्त प्रसिद्ध करून जलसमाधी मिळणाºया गावपाड्यांचे वास्तव उघड केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी २४ जुलैला तोंडलीच्या पुनर्वसित गावठाणाला भेट देऊन गावकºयांशी चर्चा केली. या भेटीदरम्यान गावकºयांनी सोयीसुविधांचा अभाव असून रस्त्यांसह गटारी व शौचालयांच्या कामांचीही तक्रार केली. कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन भूखंडावर या तोंडली गावकºयांंचे पुनर्वसन केले. यंदा बारवी धरणात चार मीटर वाढीव पाणीसाठा होणार आहे. त्याखाली या तोंडली गावाला जलसमाधी मिळणार आहे. तत्पूर्वी, या गावकºयांचे सासणे ग्रामपंचायत हद्दीत टेपाची वाडीजवळ व नदीकाठाला लागून असलेल्या गावठाणात पुनर्वसन केले आहे.

या पुनर्वसित गावाच्या गावठाणाला भेट देऊन जिल्हाधिकाºयांनी पाहणी केली. पावसामुळे त्यांना फारवेळ थांबता आले नाही. यादरम्यान नदीकाठाजवळील पुनर्वसित कातकरी समाजाच्या ग्रामस्थांनी गाडीला गराडा टाकत या सोयीसुविधांकडे जिल्हाधिकाºयांचे लक्ष वेधले. बारवी धरण विस्थापित शेतकरी संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ बांगर, सचिव किसन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ३१ शेतकºयांच्या स्वाक्षरीने लेखी तक्रार करून उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा द्या, अन्यथा आम्हाला परत आमच्या घरी जावे लागेल. त्यानंतरची सर्व जबाबदारी एमआयडीसीच्या अधिकाºयांची राहील, असा इशाराही त्यांनी लेखी स्वरूपात दिला आहे.