शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

२० लाख १३ हजार वीजग्राहकांनी केली महावितरणकडे मोबाइल नंबरची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:51 IST

कल्याण परिमंडळ : चार लाख ६८ हजार ग्राहकांची नोंदणी बाकी

डोंबिवली : कल्याण परिमंडळातील २० लाख १३ हजार ग्राहकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकांची नोंदणी महावितरणकडे केली असून, या ग्राहकांना रीडिंग, वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती ह्यएसएमएसह्णद्वारे पाठविण्यात येत आहे. परिमंडळातील उर्वरित चार लाख ६८ हजार वीजग्राहकांनीही आपल्या मोबाइल क्रमांकांची नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी गुरुवारी केले.महावितरणच्या कल्याण परिमंडळात कृषीपंप ग्राहकवगळता घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर असे एकूण २४ लाख ८२ हजार वीजग्राहक आहेत. यातील जवळपास ८१ टक्के ग्राहक मोबाइलनोंदणीच्या माध्यमातून महावितरणशी जोडले आहेत. या ग्राहकांना मीटर रीडिंग घेतल्यानंतर काही तासांत रीडिंग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट व वापरलेले विजेचे युनिट याचा तपशील असणारा संदेश महावितरणकडून पाठविण्यात येतो. यात विसंगती आढळल्यास तक्रार करण्यासाठीचा टोल फ्री क्रमांक १९१२ हा शेवटी नमूद करण्यात आलेला असतो.या तपशिलाची पडताळणी करून चुकीच्या नोंदीबाबत वेळीच तक्रार करण्याची सुविधा याद्वारे ग्राहकांना मिळते. याशिवाय, नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा वीजपुरवठा व वीजपुरवठा खंडित राहण्याचा कालावधी, याबाबत आगाऊ माहिती देणारा संदेश ग्राहकांना पाठविण्यात येत असल्याचा दावा महावितरणने गुरुवारी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला.तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे वीजपुरवठा बंद झाल्याची व हा पुरवठा केव्हा पूर्ववत होऊ शकेल, याची माहितीही संदेशाद्वारे ग्राहकांना पाठविण्यात येते. त्यासाठी ग्राहकांनी नोंदणीकृत मोबाइल बंद असेल, चुकीचा असेल किंवा क्रमांक बदलला असल्यास नवीन क्रमांक प्राधान्याने अद्ययावत करावेत, असे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे. अनेकांना मोबाइल क्रमांक देऊनही संदेश जात नाहीत, अशा तक्रारी आल्या असून त्याचे निराकरण करण्यात येणार असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.असा नोंदवा मोबाइल क्रमांकनोंदणी करावयाच्या मोबाइल क्रमांकावरून एमआरईजीनंतर स्पेस द्यावा व त्यानंतर आपला १२ अंकी ग्राहक क्रमांक टाइप करून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा. या एका ‘एसएमएस वरून ग्राहकाच्या मोबाइलची नोंदणी होते. याशिवाय, महावितरणच्या संकेतस्थळ, मोबाइल अ‍ॅपवरूनही मोबाइलची नोंदणी करता येते.

टॅग्स :mahavitaranमहावितरण