शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करण्यावर पालिका देणार भर, विहिरींची पुन्हा केली जाणार सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 15:08 IST

शहरातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी ठाणे महापालिकेने यंदासुध्दा शहरातील ३३९ विहिरींचा सफाई केली जाणार असून या विहिरीतील पाणी इतर कामांसाठी वापरले जाणार आहे.

ठळक मुद्देवापरात नसलेल्या २१६ विहिरी शहरातविहिरीतील १.८ दशलक्ष लीटर पाणी पिण्यास अयोग्य

ठाणे - मे महिना सुरु होण्यापूर्वीच ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ठाण्यातही आता ३० तासांचे शटडाऊन सुरु झाले आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने उपलब्ध नैसर्गिक स्त्रौतांकडे लक्ष केंद्रीत करण्यास सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील विहिरींना पुनर्जिवन देण्याच्या हालचाली पालिकेने पुन्हा एकदा सुरु केल्या आहेत.                     ठाणे शहराला आजच्या घडीला रोज सुमारे ४८० दशक्षल लीटर पाणी पुरवठा केला जात आहे. शहराला हे पाणी मुबलक आहे. परंतु असे असतांनाही शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने आणि आता महापालिकेने पाणी कपात सुरु केल्याने शहरातील बहुसंख्य भागांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या शहरात दर बुधवारी तब्बल ३० तासांचे शटडाऊन घेतले जात आहे. परंतु उपलब्ध असलेल्या याच पाण्याचा वापर अनेक ठिकाणी गाड्या धुवणे, बगीचांना पाणी घालणे आणि इतर कामांसाठी केला जात आहे. दरम्यान मागील काही वर्षात शहरात पाण्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करु लागल्याने २०१० मध्ये पालिकेने शहरात असलेल्या नैसर्गिक स्त्रोतांकडे लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले. त्यानुसार शहरात असलेल्या परंतु दुषित झालेल्या विहीरींची शोध मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार आजच्या घडीला शहराच्या विविध भागात ५५५ सार्वजनिक विहिरी असल्याची माहिती समोर आली होती. परंतु यातील काही विहीरी पडीक, वापरात नसने, कचऱ्याने निर्माण झालेली दुर्गंधी, काही विहिरी कोरड्या पडल्या होत्या, काहींमध्ये गटरांचे पाणी गेल्याने ४० टक्के भुर्गभातील पाणी साठी हा अशा विविध कारणांमुळे दुषित झाल्याची माहितीही पालिकेच्या सर्व्हेत पुढे आली होती.दरम्यान आजच्या घडीला वापरात नसलेल्या विहीरींची संख्या ही २१६ वर गेली आहे. त्यामुळे सध्या वापरात असलेल्या विहिरींची संख्या ही ३३९ वर आली आहे. या विहिरीतील पाण्याचे साठयचे मोजमाप हे ८.७ दशलक्ष लीटर आहे. यातील १.८ दशलक्ष लीटर पाणी हे वापरास अयोग्य असल्याचे पालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणातून आढळून आले आहे. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचाही निर्ष्कश काढण्यात आलेला होता. त्यामुळे ज्या विहिरी उपलब्ध आहेत, त्या विहिरीतील पाणी साठी आता पालिकेला उपयोगात आणण्याचे प्रयोजन केले आहे. त्यानुसार पालिकेने यंदा पाणी टंचाई भासू नये म्हणून या विहिरीतील पाणी इतर कामांसाठी वापरात आणण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, या विहिरीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्या पाण्याचे शुद्धीकरण करणे विहिरींची दुरुस्थी करणे आदी कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त