शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

ओबीसींचे आरक्षण कमी करा

By admin | Updated: September 21, 2015 03:35 IST

देशामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या ओबीसी प्रवर्गामध्ये भटके-विमुक्त समाजाच्या ६६६ जातींचा समावेश करण्यात आला आहे

ठाणे : देशामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या ओबीसी प्रवर्गामध्ये भटके-विमुक्त समाजाच्या ६६६ जातींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भटक्या-विमुक्तांना आरक्षणाचा लाभच मिळत नसल्याने ओबीसींचे आरक्षण ७ टक्क्याने कमी करु न ते भटके-विमुक्तांना देण्यात यावे, अशी मागणी भटके-विमुक्त घुमंतु महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. दरम्यान, या स्वतंत्र आरक्षणासाठी भटके-विमुक्तांनीही रणशिंग फुंकले असून लवकरच या महासंघाच्या वतीने दिल्लीमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. त्यांची नुकतीच भटके-विमुक्त घुमंतु महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या पाशर््वभूमीवर ठाण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका मांडली. देशातील विमुक्त आणि भटक्या समाजाचा ओबीसींमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे. मात्र, या ओबीसी समाजातील इतर घटक हुशार आणि पुढारलेले असल्यामुळे त्यांनी या आरक्षणाचा पुरेपुर फायदा घेतला आहे. मात्र, ज्यांना गरज आहे. अशा भटके-विमुक्तांना या आरक्षणाचा काहीही लाभ झालेला नाही. त्यामुळे या समाजाची कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. म्हणूनच हे आरक्षण ७ टक्क्याने कमी करण्यात यावे आणि ते भटके विमुक्तांना देण्यात यावे; अशीच शिफारस मंडल आयोगानेही केली होती; या मागणीसाठी येत्या २८ फेब्रुवारी रोजी भटके-विमुक्त घुमंतु महासंघाच्या वतीने नवी दिल्लीतील रामलिला येथे एका महारॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. रेणेके आयोगाने आपल्या अभ्यास अहवालामध्ये केलेल्या चुकांचा आमच्या समाजाला फटका बसला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी महाराष्ट्राती भटके-विमुक्तांच्या आरक्षणाचे मॉडेल डोळ्यासमोर ठेवावे, अशीही मागणी त्यांनी केली. दरम्यान, हार्दीक पटेल यांच्या आंदोलनासंदर्भात विचारले असता, पटेल याला आरक्षणातील काहीही कळत नसून या देशातील मागास जात प्रवर्गाचे आरक्षण संपविण्याचा हा कट रचण्यात आला आहे. तो कट आम्ही उधळून लावू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.