शहरं
Join us  
Trending Stories
1
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
2
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
3
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
4
पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
6
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
7
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
8
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
9
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
10
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
11
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
12
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
13
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
14
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
15
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
16
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
17
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
18
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
19
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
20
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?

ओबीसींचे आरक्षण कमी करा

By admin | Updated: September 21, 2015 03:35 IST

देशामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या ओबीसी प्रवर्गामध्ये भटके-विमुक्त समाजाच्या ६६६ जातींचा समावेश करण्यात आला आहे

ठाणे : देशामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या ओबीसी प्रवर्गामध्ये भटके-विमुक्त समाजाच्या ६६६ जातींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भटक्या-विमुक्तांना आरक्षणाचा लाभच मिळत नसल्याने ओबीसींचे आरक्षण ७ टक्क्याने कमी करु न ते भटके-विमुक्तांना देण्यात यावे, अशी मागणी भटके-विमुक्त घुमंतु महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. दरम्यान, या स्वतंत्र आरक्षणासाठी भटके-विमुक्तांनीही रणशिंग फुंकले असून लवकरच या महासंघाच्या वतीने दिल्लीमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. त्यांची नुकतीच भटके-विमुक्त घुमंतु महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या पाशर््वभूमीवर ठाण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका मांडली. देशातील विमुक्त आणि भटक्या समाजाचा ओबीसींमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे. मात्र, या ओबीसी समाजातील इतर घटक हुशार आणि पुढारलेले असल्यामुळे त्यांनी या आरक्षणाचा पुरेपुर फायदा घेतला आहे. मात्र, ज्यांना गरज आहे. अशा भटके-विमुक्तांना या आरक्षणाचा काहीही लाभ झालेला नाही. त्यामुळे या समाजाची कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. म्हणूनच हे आरक्षण ७ टक्क्याने कमी करण्यात यावे आणि ते भटके विमुक्तांना देण्यात यावे; अशीच शिफारस मंडल आयोगानेही केली होती; या मागणीसाठी येत्या २८ फेब्रुवारी रोजी भटके-विमुक्त घुमंतु महासंघाच्या वतीने नवी दिल्लीतील रामलिला येथे एका महारॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. रेणेके आयोगाने आपल्या अभ्यास अहवालामध्ये केलेल्या चुकांचा आमच्या समाजाला फटका बसला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी महाराष्ट्राती भटके-विमुक्तांच्या आरक्षणाचे मॉडेल डोळ्यासमोर ठेवावे, अशीही मागणी त्यांनी केली. दरम्यान, हार्दीक पटेल यांच्या आंदोलनासंदर्भात विचारले असता, पटेल याला आरक्षणातील काहीही कळत नसून या देशातील मागास जात प्रवर्गाचे आरक्षण संपविण्याचा हा कट रचण्यात आला आहे. तो कट आम्ही उधळून लावू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.