शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

अरुंद रस्ते, टॉयटलचे वाद यात अडकला ७ हजार इमारतींचा पुनर्विकास

By अजित मांडके | Updated: February 7, 2024 17:40 IST

ठाण्यात क्लस्टर योजना ही ठाणेकरांसाठी चांगला पर्याय आहे.

अजित मांडके , ठाणे : ठाण्यात क्लस्टर योजना ही ठाणेकरांसाठी चांगला पर्याय आहे. मात्र असे असले तरी शहरातील सुमारे ७ हजार इमारतींचा पुनर्विकास आजही रखडला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही ठिकाणी अरुंद रस्ते, टायटलचे वाद तर काही ठिकाणी जागा मालकांमध्ये असलेल्या वादांमुळे पुनर्विकास रखडला आहे. त्यातही जुन्या ठाण्यातील भागांचा यात मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचेही दिसून आले आहे.

ठाण्यात एकीकडे घोडबंदर भागात नव्याने विकास होत आहे, या भागात मोठ मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. तिकडे किसन नगर भागात क्लस्टरच्या माध्यमातून अनाधिकृत, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास सुरु झाला आहे. परंतु असे असले तरी देखील आजही पुनर्विकासाचा मार्ग खडतरच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. जुन्या ठाण्यातील अनेक इमारतींचा पुनर्विकास मागील कित्येक वर्षापासून रखडला आहे. त्यातही छोट्या इमारती असतील किंवा सिंगल इमारत असेल अशा इमारतींचा विकास देखील रखडला आहे. जुन्या ठाण्यातील अनेक भागातील रस्ते ६ मीटर पेक्षाही कमी आहेत. त्यामुळे पुनर्विकास करतांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा अरुंद रस्त्यांमुळे विकासकाला अधिकचा एफएसआय देखील मिळत नसल्याने विकासक देखील काम करण्यास सहज तयार होत नसल्याचे चित्र आहे. तसेच काही ठिकाणी जागा मालकांमधील वाद, भावाभावांमधील वाद, टायटल क्लिअर नसणे यामुळे देखील पुनर्विकासाला बाधा येत असल्याचे दिसून आले आहे. परंतु या इमारतींचा पुनर्विकास कसा करता येऊ शकतो, त्यावर कशा पध्दतीने तोडगा काढता येऊ शकतो या उद्देशाने ठाणे एमसीएचआयने पाऊल उचलले असल्याची माहिती एमसीएचआय ठाणे क्रेडाईचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली.

घोडबंदरच्या कोंडीने रहिवासी दुसºया घरांच्या शोधात : घोडबंदरच्या वाहतुक कोंडीने येथील रहिवासी हैराण झाले आहेत. रोजच्या रोज या ना त्या कारणामुळे वाहतुक कोंडीत नव्याने भर पडत आहे. त्यामुळे येथील काही रहिवाशांनी आपली घरे विकून शहरात घरे घेतली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. परंतु विकास कामे सुरु असल्याने वाहतुक कोंडी होत असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. परंतु पुढील सहा महिन्यात कोंडी सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. काही प्रमाणात रहिवाशांना घरे विकून ठाण्यात आले असले तरी हे प्रमाण नगण्य असल्याचा दावाही त्यांनी केला.

पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार : घोडबंदर भागात सर्वाधिक प्रमाणात नवीन गृहसंकुलांची कामे सुरु आहेत. परंतु येथील पाण्याची समस्या आजही मार्गी लागू शकलेली नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी येथील रहिवाशांनी महापालिकेच्या जनसुनावणीत देखील हा मुद्दा अधोरेखीत केला होता. परंतु येत्या काही महिन्यात घोडबंदर भागातील पाण्याची समस्या सुटेल असा विश्वास एमसीएचआय ठाणेने व्यक्त केला आहे. परंतु सीसी न देणे अयोग्य असल्याचेही मतही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे घर बुकींग करणाºया नागरीकांसह विकासकांचेही नुकसान होणार असल्याचे मेहता यांनी सांगितले. परंतु पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेबरोबर विकासक देखील प्रयत्न करीत आहेत. या भागात संप, पंप आणि नवीन जलकुंभांची कामे सुरु आहेत. तसेच इतर वापरासाठी ट्रीटमेंट केलेल्या पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे निश्चितच पाण्याची समस्या येत्या काही महिन्यात मार्गी लागेल असेही सांगितले जात आहे.

टॅग्स :thaneठाणेMuncipal Corporationनगर पालिका