शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अरुंद रस्ते, टॉयटलचे वाद यात अडकला ७ हजार इमारतींचा पुनर्विकास

By अजित मांडके | Updated: February 7, 2024 17:40 IST

ठाण्यात क्लस्टर योजना ही ठाणेकरांसाठी चांगला पर्याय आहे.

अजित मांडके , ठाणे : ठाण्यात क्लस्टर योजना ही ठाणेकरांसाठी चांगला पर्याय आहे. मात्र असे असले तरी शहरातील सुमारे ७ हजार इमारतींचा पुनर्विकास आजही रखडला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही ठिकाणी अरुंद रस्ते, टायटलचे वाद तर काही ठिकाणी जागा मालकांमध्ये असलेल्या वादांमुळे पुनर्विकास रखडला आहे. त्यातही जुन्या ठाण्यातील भागांचा यात मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचेही दिसून आले आहे.

ठाण्यात एकीकडे घोडबंदर भागात नव्याने विकास होत आहे, या भागात मोठ मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. तिकडे किसन नगर भागात क्लस्टरच्या माध्यमातून अनाधिकृत, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास सुरु झाला आहे. परंतु असे असले तरी देखील आजही पुनर्विकासाचा मार्ग खडतरच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. जुन्या ठाण्यातील अनेक इमारतींचा पुनर्विकास मागील कित्येक वर्षापासून रखडला आहे. त्यातही छोट्या इमारती असतील किंवा सिंगल इमारत असेल अशा इमारतींचा विकास देखील रखडला आहे. जुन्या ठाण्यातील अनेक भागातील रस्ते ६ मीटर पेक्षाही कमी आहेत. त्यामुळे पुनर्विकास करतांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा अरुंद रस्त्यांमुळे विकासकाला अधिकचा एफएसआय देखील मिळत नसल्याने विकासक देखील काम करण्यास सहज तयार होत नसल्याचे चित्र आहे. तसेच काही ठिकाणी जागा मालकांमधील वाद, भावाभावांमधील वाद, टायटल क्लिअर नसणे यामुळे देखील पुनर्विकासाला बाधा येत असल्याचे दिसून आले आहे. परंतु या इमारतींचा पुनर्विकास कसा करता येऊ शकतो, त्यावर कशा पध्दतीने तोडगा काढता येऊ शकतो या उद्देशाने ठाणे एमसीएचआयने पाऊल उचलले असल्याची माहिती एमसीएचआय ठाणे क्रेडाईचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली.

घोडबंदरच्या कोंडीने रहिवासी दुसºया घरांच्या शोधात : घोडबंदरच्या वाहतुक कोंडीने येथील रहिवासी हैराण झाले आहेत. रोजच्या रोज या ना त्या कारणामुळे वाहतुक कोंडीत नव्याने भर पडत आहे. त्यामुळे येथील काही रहिवाशांनी आपली घरे विकून शहरात घरे घेतली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. परंतु विकास कामे सुरु असल्याने वाहतुक कोंडी होत असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. परंतु पुढील सहा महिन्यात कोंडी सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. काही प्रमाणात रहिवाशांना घरे विकून ठाण्यात आले असले तरी हे प्रमाण नगण्य असल्याचा दावाही त्यांनी केला.

पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार : घोडबंदर भागात सर्वाधिक प्रमाणात नवीन गृहसंकुलांची कामे सुरु आहेत. परंतु येथील पाण्याची समस्या आजही मार्गी लागू शकलेली नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी येथील रहिवाशांनी महापालिकेच्या जनसुनावणीत देखील हा मुद्दा अधोरेखीत केला होता. परंतु येत्या काही महिन्यात घोडबंदर भागातील पाण्याची समस्या सुटेल असा विश्वास एमसीएचआय ठाणेने व्यक्त केला आहे. परंतु सीसी न देणे अयोग्य असल्याचेही मतही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे घर बुकींग करणाºया नागरीकांसह विकासकांचेही नुकसान होणार असल्याचे मेहता यांनी सांगितले. परंतु पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेबरोबर विकासक देखील प्रयत्न करीत आहेत. या भागात संप, पंप आणि नवीन जलकुंभांची कामे सुरु आहेत. तसेच इतर वापरासाठी ट्रीटमेंट केलेल्या पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे निश्चितच पाण्याची समस्या येत्या काही महिन्यात मार्गी लागेल असेही सांगितले जात आहे.

टॅग्स :thaneठाणेMuncipal Corporationनगर पालिका