शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विहिरींचे पाणी पुन्हा वापरात

By admin | Updated: April 12, 2016 01:04 IST

ठाणे शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत असतांना महापालिकेकडून पुरवठाहोणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा यासाठी आता काही सामाजिक संस्थांनी पावले उचलली आहेत.

ठाणे : ठाणे शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत असतांना महापालिकेकडून पुरवठाहोणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा यासाठी आता काही सामाजिक संस्थांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार घोडबंदर भागातील आझादनगर येथे असलेल्या चार विहिरींचे पाणी आता इतर कामांसाठी वापरात आणण्यासाठी स्थानिक नगरसेवक, सामाजिक संस्था आणि खाजगी कंपनीने पाऊल उचलली आहेत. अशा प्रकारे विहिरींच्या पाण्याचा वापर करण्याचा पहिला प्रयोग या निमित्ताने हाती घेण्यात आला आहे.सध्या ठाणे शहराला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. तर गळतीचे प्रमाण हे ४५ टक्यांच्या आसपास आहे. परंतु, धरणांची पातळी खालावल्याने सध्या पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन पालिकेने केले आहे. शहरात आजघडीला ५५५ विहिरी असून त्यातील ३३९ विहिरी वापरात आहेत. तर २१६ विहिरी वापरात नाहीत. तर पालिकेने आता शहरातील विहिरींची सफाईची मोहीम हाती घेतली असली तरी ती अद्याप सुरु झालेली नाही. परंतु, घोडबंदर भागातील प्रभाग क्र. २ चे राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आपल्या प्रभागातील चार विहिरींचे पाणी इतर वापरासाठी कशाप्रकारे उपयोगात आणता येईल, यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी अर्पण फाऊडेंशनच्या अध्यक्षा भावना डुंबरे यांनी बायर इंडिया कंपनीच्या मदतीने आता या चारही विहिरी साफ करण्याचे काम हाती घेतले आहे. याचा शुभारंभ मंगळवारी होणार असून या चारही विहिरीत हात पोहचेल येथपर्यंत पाणी आहे. त्यानुसार आता त्यांची सफाई करुन त्यावर पाच हजार लिटरच्या आरसीसी स्वरुपाच्या टाक्या बसविल्या जाणार आहेत. या टाक्यांतून येथील चारही सार्वजनिक शौचालयांना २४ तास पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक टाकीच्या ठिकाणी चार नळ बसविण्यात येणार आहेत. नालेसफाईच्या कामात जेसीबीची जलवाहिनीला धक्काठाणे महानगरपालिकेने वर्तकनगर येथील नालेसफाईच्या कामाला सुरूवात केली आहे. परंतु, ते करीत असताना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे या परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आधीच टंचाईने त्रस असलेल्या या भागाला पाण्याच्या झळा सहन कराव्या लागल्या.पावसाळ्यापूर्वी म्हणजेच एप्रिलमध्ये नालेसफाईच्या कामांना सुरवात करावी, अशी मागणी मनसेचे संदीप पाचंगे यांनी पालिकेकडे केली होती. पालिकेने त्यांच्या मागणीची दखल घेऊन वर्तकनगर येथील नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली होती. परंतु, ते सुरू असताना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे येथील परिसराला पाणीपुरवठा करणारी ६ इंची जलवाहिनी फुटली आहे. यामुळे वर्तकनगर परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.