शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

विहिरींचे पाणी पुन्हा वापरात

By admin | Updated: April 12, 2016 01:04 IST

ठाणे शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत असतांना महापालिकेकडून पुरवठाहोणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा यासाठी आता काही सामाजिक संस्थांनी पावले उचलली आहेत.

ठाणे : ठाणे शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत असतांना महापालिकेकडून पुरवठाहोणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा यासाठी आता काही सामाजिक संस्थांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार घोडबंदर भागातील आझादनगर येथे असलेल्या चार विहिरींचे पाणी आता इतर कामांसाठी वापरात आणण्यासाठी स्थानिक नगरसेवक, सामाजिक संस्था आणि खाजगी कंपनीने पाऊल उचलली आहेत. अशा प्रकारे विहिरींच्या पाण्याचा वापर करण्याचा पहिला प्रयोग या निमित्ताने हाती घेण्यात आला आहे.सध्या ठाणे शहराला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. तर गळतीचे प्रमाण हे ४५ टक्यांच्या आसपास आहे. परंतु, धरणांची पातळी खालावल्याने सध्या पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन पालिकेने केले आहे. शहरात आजघडीला ५५५ विहिरी असून त्यातील ३३९ विहिरी वापरात आहेत. तर २१६ विहिरी वापरात नाहीत. तर पालिकेने आता शहरातील विहिरींची सफाईची मोहीम हाती घेतली असली तरी ती अद्याप सुरु झालेली नाही. परंतु, घोडबंदर भागातील प्रभाग क्र. २ चे राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आपल्या प्रभागातील चार विहिरींचे पाणी इतर वापरासाठी कशाप्रकारे उपयोगात आणता येईल, यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी अर्पण फाऊडेंशनच्या अध्यक्षा भावना डुंबरे यांनी बायर इंडिया कंपनीच्या मदतीने आता या चारही विहिरी साफ करण्याचे काम हाती घेतले आहे. याचा शुभारंभ मंगळवारी होणार असून या चारही विहिरीत हात पोहचेल येथपर्यंत पाणी आहे. त्यानुसार आता त्यांची सफाई करुन त्यावर पाच हजार लिटरच्या आरसीसी स्वरुपाच्या टाक्या बसविल्या जाणार आहेत. या टाक्यांतून येथील चारही सार्वजनिक शौचालयांना २४ तास पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक टाकीच्या ठिकाणी चार नळ बसविण्यात येणार आहेत. नालेसफाईच्या कामात जेसीबीची जलवाहिनीला धक्काठाणे महानगरपालिकेने वर्तकनगर येथील नालेसफाईच्या कामाला सुरूवात केली आहे. परंतु, ते करीत असताना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे या परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आधीच टंचाईने त्रस असलेल्या या भागाला पाण्याच्या झळा सहन कराव्या लागल्या.पावसाळ्यापूर्वी म्हणजेच एप्रिलमध्ये नालेसफाईच्या कामांना सुरवात करावी, अशी मागणी मनसेचे संदीप पाचंगे यांनी पालिकेकडे केली होती. पालिकेने त्यांच्या मागणीची दखल घेऊन वर्तकनगर येथील नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली होती. परंतु, ते सुरू असताना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे येथील परिसराला पाणीपुरवठा करणारी ६ इंची जलवाहिनी फुटली आहे. यामुळे वर्तकनगर परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.