शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींचे पाणी पुन्हा वापरात

By admin | Updated: April 12, 2016 01:04 IST

ठाणे शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत असतांना महापालिकेकडून पुरवठाहोणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा यासाठी आता काही सामाजिक संस्थांनी पावले उचलली आहेत.

ठाणे : ठाणे शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत असतांना महापालिकेकडून पुरवठाहोणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा यासाठी आता काही सामाजिक संस्थांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार घोडबंदर भागातील आझादनगर येथे असलेल्या चार विहिरींचे पाणी आता इतर कामांसाठी वापरात आणण्यासाठी स्थानिक नगरसेवक, सामाजिक संस्था आणि खाजगी कंपनीने पाऊल उचलली आहेत. अशा प्रकारे विहिरींच्या पाण्याचा वापर करण्याचा पहिला प्रयोग या निमित्ताने हाती घेण्यात आला आहे.सध्या ठाणे शहराला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. तर गळतीचे प्रमाण हे ४५ टक्यांच्या आसपास आहे. परंतु, धरणांची पातळी खालावल्याने सध्या पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन पालिकेने केले आहे. शहरात आजघडीला ५५५ विहिरी असून त्यातील ३३९ विहिरी वापरात आहेत. तर २१६ विहिरी वापरात नाहीत. तर पालिकेने आता शहरातील विहिरींची सफाईची मोहीम हाती घेतली असली तरी ती अद्याप सुरु झालेली नाही. परंतु, घोडबंदर भागातील प्रभाग क्र. २ चे राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आपल्या प्रभागातील चार विहिरींचे पाणी इतर वापरासाठी कशाप्रकारे उपयोगात आणता येईल, यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी अर्पण फाऊडेंशनच्या अध्यक्षा भावना डुंबरे यांनी बायर इंडिया कंपनीच्या मदतीने आता या चारही विहिरी साफ करण्याचे काम हाती घेतले आहे. याचा शुभारंभ मंगळवारी होणार असून या चारही विहिरीत हात पोहचेल येथपर्यंत पाणी आहे. त्यानुसार आता त्यांची सफाई करुन त्यावर पाच हजार लिटरच्या आरसीसी स्वरुपाच्या टाक्या बसविल्या जाणार आहेत. या टाक्यांतून येथील चारही सार्वजनिक शौचालयांना २४ तास पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक टाकीच्या ठिकाणी चार नळ बसविण्यात येणार आहेत. नालेसफाईच्या कामात जेसीबीची जलवाहिनीला धक्काठाणे महानगरपालिकेने वर्तकनगर येथील नालेसफाईच्या कामाला सुरूवात केली आहे. परंतु, ते करीत असताना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे या परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आधीच टंचाईने त्रस असलेल्या या भागाला पाण्याच्या झळा सहन कराव्या लागल्या.पावसाळ्यापूर्वी म्हणजेच एप्रिलमध्ये नालेसफाईच्या कामांना सुरवात करावी, अशी मागणी मनसेचे संदीप पाचंगे यांनी पालिकेकडे केली होती. पालिकेने त्यांच्या मागणीची दखल घेऊन वर्तकनगर येथील नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली होती. परंतु, ते सुरू असताना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे येथील परिसराला पाणीपुरवठा करणारी ६ इंची जलवाहिनी फुटली आहे. यामुळे वर्तकनगर परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.