शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
4
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
5
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
6
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
7
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
8
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
9
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
10
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
11
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
12
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
13
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
14
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
15
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
16
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
17
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
18
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
19
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
20
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू-तलासरीत भूकंपाचे पुन्हा हादरे; अनेक गावांतील ग्रामस्थांची रात्र घराबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:16 IST

पक्क्या घरांनाही जाणवली तीव्रता

कासा/तलासरी : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यांत पुन्हा भूकंपाचे हादरे बसले असून यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपात काही घरांची पडझड झाली असून अनेक गावांतील ग्रामस्थांना भीतीने रात्र घराबाहेर काढावी लागली. झोपड्यांपेक्षा पक्क्या घरांना तीव्रता अधिक जाणवली.

डहाणू तालुक्यात ४ आणि ५ सप्टेंबर रोजी एकूण चार भूकंपांचे धक्के बसले. त्यापैकी ४ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी ४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्याने ग्रामीण आणि किनारपट्टीतील गावांना मोठे हादरे बसले आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून काही ठिकाणी नागरिकांनी रात्र जागून काढली आहे.

४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून ३३ मिनिटांनी २.८ तीव्रतेचा धक्का बसला होता. त्यानंतर रात्री ११ वाजून ४१ मिनिटांनी ४ रिश्टर तीव्रतेचा, १२ वाजून ५ मिनिटांनी ३.६ तीव्रतेचा आणि पहाटे ६ वाजून ३६ मिनिटांनी २.७ तीव्रतेचा धक्का बसला. ४ रिश्टर स्केलचा हा सर्वात मोठा धक्का होता. या सर्व भूकंप हादऱ्याची तीव्रता धुंदलवाडी, चिंचले, सासवंद, आंबोली, धानिवारी, ओसारविरा, महालक्ष्मी, सोनाळे, कासा, चारोटी, पेठ, उर्से आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांना जाणवली.

धुंदलवाडी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. येथील स्थानिक संदीप भसरा, लक्ष्मण कुरकुटे, नरेश भोये यांनी सांगितले की, सकाळपर्र्यंंत ८ ते १० छोटे-मोठे धक्के बसले. त्यामुळे ग्रामस्थांनी मात्र भीतीने रात्र घराबाहेर काढली.दरम्यान, भूकंपाच्या हादºयाने तालुक्यातील सासवंद गावातील अंती धर्मा डोंबरे या आदिवासी शेतकºयाचे घर कोसळले, तर चिंचले गावातील दत्तू पडवळे यांच्या घराचा काही भाग कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दोन्हीही घटनेत कोणतीही जीवित हानी किंवा मोठी दुखापत कोणाला झाली नाही. तर काही गावातील घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत.

पंचनामे करण्याचे काम सुरू

1डहाणू प्रांताधिकारी आशिमा मित्तल, तहसीलदार राहुल सारंग आणि काही तालुका पंचायत समिती सदस्य यांनीविविध गावांमध्ये जाऊन पाहणी केली असून महसूल कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्याचे काम सुरू केल्याची माहिती तहसीलदार सारंग यांनी दिली.

2पालघर जिल्ह्यामध्ये३ नोव्हेंबर २०१८ पासून भूकंपाचे धक्के बसत असून आतापर्यंत हजारो घरांच्या भिंतींना तडे गेलेआहेत. एकीकडे कोरोना संकट तर दुसरीकडे भूकंपाची भीती या दुहेरी संकटात येथील नागरिक सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :Earthquakeभूकंपthaneठाणे