शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

भरती, बढती नियम लालफितीत

By admin | Updated: September 23, 2016 03:17 IST

ठाणे महापालिकेने २०१० मध्ये ठराव करून कर्मचारी, अधिकाऱ्यांची भरती, बढतीसंदर्भातील नियमावली २०११ मध्ये शासनाच्या मंजुरीसाठी पाठवली होती

ठाणे : ठाणे महापालिकेने २०१० मध्ये ठराव करून कर्मचारी, अधिकाऱ्यांची भरती, बढतीसंदर्भातील नियमावली २०११ मध्ये शासनाच्या मंजुरीसाठी पाठवली होती. परंतु, तिला अद्यापही मंजुरी मिळालेली नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे पालिकेत अद्यापही २०८५ पदे भरलेली नाहीत. यामुळे पालिकेतील अनेक सहायक आयुक्त, उपायुक्तांसह इतर अधिकाऱ्यांच्या खांद्यावर चार ते पाच विभागांचा अतिरिक्त कार्यभार पडला आहे. यामुळे नागरिकांच्या कामांनादेखील त्यांना पुरेसा वेळ देता येत नसल्याचेही दिसून येत आहे. याचसंदर्भात ठाण्यातील दक्ष नागरिकाने न्यायालयात धाव घेतली असून त्याच्या सुनावणीत महापालिकेला चार आठवड्यांत शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.ठाणे महापालिकेने २०१० मध्ये ठराव क्रमांक १७३ अन्वये मंजूर केलेली कर्मचारी, अधिकारी यांची भरती, बढती नियमावली २०११ मध्ये शासनाकडे मंजुरीसाठी पाठवली होती. परंतु, तिला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याची माहिती आता माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आली आहे. दरम्यान, पालिकेने स्थापित केलेल्या विभागीय बढती समितीने काही पदे थेट भरतीने, तर काही बढतीने भरली. ही पदे थेट भरताना अथवा बढतीने भरताना काही प्रशासकीय कर्मचारी व तांत्रिक विभागातील अधिकारी, अभियंत्यांना प्रारूप भरती, बढतीचे निकष शिथिल करून बदली देण्यात आली. त्यामुळे जे कर्मचारी, अधिकारी सहायक आयुक्त, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख बढतीपासून अनेक वर्षे वंचित राहिले आहेत. दरम्यान, काही अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक पदांचा पदभार सोपवण्यात आला आहे. शासनाच्या २७ डिसेंबर २०११ च्या निर्णयानुसार दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी अतिरिक्त पदाचा पदभार सुरू ठेवायचा असेल, तर अशा प्रकरणी दोन वर्षांचा कालावधी संपण्यापूर्वी शासनाची पूर्वानुमती घेणे आवश्यक आहे. तसेच पूर्वानुमती न घेता अतिरिक्त कार्यभाराची व्यवस्था दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी चालू ठेवण्यास कार्योत्तर मंजुरीचे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच वरील तरतुदींचे पालन न करता दोन वर्षांपेक्षा जास्त काळ अतिरिक्त पदाचा कार्यभार चालू ठेवणाऱ्या व त्यासाठी विशेष वेतन मंजूर करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांविरुद्ध जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे या शासन निर्णयात नमूद केले आहे.