शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

उल्हासनगरात अभय योजनेअंतर्गत १२ दिवसात २५ कोटींची वसुली, टार्गेट होणार पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 19:03 IST

विभागाच्या उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण क्षमतेने कामाला लागण्याच्या सूचना करून सुट्टीच्या दिवसासह रात्री १२ वाजे पर्यंत मालमत्ता कर भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश दिले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेने शेवटच्या १५ दिवसासाठी मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू केली असून अवघ्या १२ दिवसात २५ कोटी पेक्षा जास्त वसुली झाली. तर एकून मालमत्ता कर वसुली ८२ कोटींवर गेली असून दिलेले टार्गेट पूर्ण होण्याची शक्यता उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी व्यक्त केली.

 उल्हासनगर महापालिकेचे मुख्य उत्पन्न स्रोता पैकी मालमत्ता कर विभागाकडून १०० कोटीचे टार्गेट ठेवण्यात आले. एका महिन्यापूर्वी विभागाची वसुली ५० कोटी पेक्षा जास्त नसल्याने, विभागावर सर्वस्तरातून चौफेर टीका झाली. दरम्यान राज्य शासनाने महापालिकेने विखंडणासाठी पाठविलेला अभय योजनेचा प्रस्ताव फेटाळल्याने, अभय योजना लागू करणे महापालिकेला भाग पडले. अखेर १५ दिवसासाठी अभय योजना महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी १६ ते ३१ मार्च दरम्यान सुरू केली. अभय योजने अंतर्गत १०० टक्के विलंब शुल्क माफ करण्यात येत आहे. विभागाच्या उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण क्षमतेने कामाला लागण्याच्या सूचना करून सुट्टीच्या दिवसासह रात्री १२ वाजे पर्यंत मालमत्ता कर भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश दिले. परिणामी सुरवातीला धीम्या गतीने सुरू झालेली अभय योजनेने नंतर गती पकडली आहे.

 महापालिका मालमत्ता कर विभागाची २८ मार्च पर्यंत एकून वसुली ८२ कोटींवर गेली असून त्यापैकी अभय योजने अंतर्गत १२ दिवसात २५ कोटींची वसुली झाली. विभागाला १०० कोटीचे वसुली टार्गेट पूर्ण करायचे आहे. शेवटच्या तीन दिवसात ३१ मार्च पर्यंत वसुलीचे टार्गेट पूर्ण होणार असल्याचे संकेत उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी दिले. अभय योजना यानंतर लागू होणार नसल्याने, नागरिकांनी अभय योजनेचा लाभ उठविण्याचे आवाहन करण्यात अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले. तसेच आयुक्त डॉ राजा दयानिधी विशेष लक्ष ठेवून असून विभाग १०० कोटी पेक्षा जास्त वसुली करणार असल्याचे संकेत दिले. विविध पक्षाचे नगरसेवक, सामाजिक संघटना अभय योजनेचा लाभ उठविण्याचे आवाहन करीत आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर