शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात अभय योजनेअंतर्गत १२ दिवसात २५ कोटींची वसुली, टार्गेट होणार पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 19:03 IST

विभागाच्या उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण क्षमतेने कामाला लागण्याच्या सूचना करून सुट्टीच्या दिवसासह रात्री १२ वाजे पर्यंत मालमत्ता कर भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश दिले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेने शेवटच्या १५ दिवसासाठी मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू केली असून अवघ्या १२ दिवसात २५ कोटी पेक्षा जास्त वसुली झाली. तर एकून मालमत्ता कर वसुली ८२ कोटींवर गेली असून दिलेले टार्गेट पूर्ण होण्याची शक्यता उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी व्यक्त केली.

 उल्हासनगर महापालिकेचे मुख्य उत्पन्न स्रोता पैकी मालमत्ता कर विभागाकडून १०० कोटीचे टार्गेट ठेवण्यात आले. एका महिन्यापूर्वी विभागाची वसुली ५० कोटी पेक्षा जास्त नसल्याने, विभागावर सर्वस्तरातून चौफेर टीका झाली. दरम्यान राज्य शासनाने महापालिकेने विखंडणासाठी पाठविलेला अभय योजनेचा प्रस्ताव फेटाळल्याने, अभय योजना लागू करणे महापालिकेला भाग पडले. अखेर १५ दिवसासाठी अभय योजना महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी १६ ते ३१ मार्च दरम्यान सुरू केली. अभय योजने अंतर्गत १०० टक्के विलंब शुल्क माफ करण्यात येत आहे. विभागाच्या उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण क्षमतेने कामाला लागण्याच्या सूचना करून सुट्टीच्या दिवसासह रात्री १२ वाजे पर्यंत मालमत्ता कर भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश दिले. परिणामी सुरवातीला धीम्या गतीने सुरू झालेली अभय योजनेने नंतर गती पकडली आहे.

 महापालिका मालमत्ता कर विभागाची २८ मार्च पर्यंत एकून वसुली ८२ कोटींवर गेली असून त्यापैकी अभय योजने अंतर्गत १२ दिवसात २५ कोटींची वसुली झाली. विभागाला १०० कोटीचे वसुली टार्गेट पूर्ण करायचे आहे. शेवटच्या तीन दिवसात ३१ मार्च पर्यंत वसुलीचे टार्गेट पूर्ण होणार असल्याचे संकेत उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी दिले. अभय योजना यानंतर लागू होणार नसल्याने, नागरिकांनी अभय योजनेचा लाभ उठविण्याचे आवाहन करण्यात अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले. तसेच आयुक्त डॉ राजा दयानिधी विशेष लक्ष ठेवून असून विभाग १०० कोटी पेक्षा जास्त वसुली करणार असल्याचे संकेत दिले. विविध पक्षाचे नगरसेवक, सामाजिक संघटना अभय योजनेचा लाभ उठविण्याचे आवाहन करीत आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर