शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

रेडीरेकनरच्या दरानेच भाडे वसूल करा

By admin | Updated: May 24, 2017 01:13 IST

भाईंदरपाडा येथील मैदान खासगी विकासकाला देखभालीकरिता देण्याचा महासभेत चर्चेविना मंजूर केलेला प्रस्ताव प्रशासनाने मागे घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भाईंदरपाडा येथील मैदान खासगी विकासकाला देखभालीकरिता देण्याचा महासभेत चर्चेविना मंजूर केलेला प्रस्ताव प्रशासनाने मागे घ्यावा व रेडीरेकनरच्या दरानुसार भाडेआकारणी करण्याचा प्रस्ताव आणून तो चर्चेद्वारे मंजूर करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने मंगळवारी केली. महासभेत केवळ अर्ध्या तासात ३९२ प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्याच्या सत्ताधारी शिवसेना व प्रशासनाच्या मिलीभगतच्या निषेधार्थ भाजपाने लाक्षणिक उपोषण केले.मागील आठवड्यात शनिवारी झालेल्या महासभेत काही वादग्रस्त आणि तब्बल ४५० कोटींचे प्रस्ताव चर्चेशिवाय मंजूर करण्यात आले. ठाणेकरांच्या कररुपी पैशाची उधळपट्टी करणाऱ्या, सत्ताधारी आणि प्रशासनाच्या या मिलीभगतच्या विरोधात भाजपाने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून, मंगळवारी महापालिका मुख्यालयाच्या आवारात लाक्षणिक उपोषण केले. यावेळी, आमदार संजय केळकर हेही उपोषणात सहभागी झाले होते. केळकर म्हणाले की, झालेला प्रकार अतिशय चुकीचा असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. भाईंदरपाडा येथील भूखंडाचा प्रस्ताव दुरुस्त करुन तो पुन्हा चर्चेसाठी आणावा किंवा रेडी रेकनरच्या दराने भाडेवसुली करावी, अशी मागणी त्यांनी केली.‘त्या’ वादग्रस्त ठरावांना स्थगिती द्यासत्तेचा गैरवापर करीत ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने महासभेत मंजूर करवून घेतलेल्या ३९२ प्रस्तावांच्या अंमलबजावणीला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.शिष्टमंडळात पालिकेतील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांचा समावेश होता. आव्हाड म्हणाले की, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेने आयत्यावेळचे ८२ आणि ३९२ असे एकूण ४०० हून अधिक ठराव अवघ्या अर्धा तासात चर्चेविना मंजूर केले. महासभेत ठराव सर्वानुमते मंजूर होणे अपेक्षित असते. त्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांचेही मत घेणे गरजेचे असते. मात्र, शिवसेनेने कायद्याची सर्रास पायमल्ली केली. लोकशाहीला घातक ठरणाऱ्या या कृतीविरोधात राष्ट्रवादी, भाजपा आणि अपक्षांनी गदारोळ घालून विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्तेचा गैरवापर करत शिवसेनेने तब्बल ४०० ठराव मंजूर केले. त्याला सरकारने स्थगिती देण्याची मागणी आव्हाड यांनी केली.महापालिका महासभेत केवळ अर्ध्या तासात ३९२ प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्यावरून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली असून या सर्व विषयांना यापूर्वीच महासभेने मंजुरी दिली असल्याचा खुलासा शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी केला आहे. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करायचा होता तर यापूर्वीच करणे गरजेचे होते, असे म्हस्के म्हणाले. भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादीने महासभेनंतर सत्ताधारी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले असून बहुमताच्या बळावर हडेलप्पी कारभार सुुरु केल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यापासून आंदोलन करण्यापर्यंत पावले उचलून सेनेच्या कोंडीचे प्रयत्न चालवले आहेत. या पार्श्वभूमीवर म्हस्के म्हणाले की, महासभा सुरु होती तेव्हा त्यांना चर्चा करण्यापासून कुणी अडवले होते. केवळ गोंधळ घालायचा आणि सभात्याग करायचा ही पध्दत चुकीची असल्याचा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.खर्चाबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी जाणे अपेक्षित होते. परंतु स्थायी समिती गठीत न झाल्याने पुन्हा हे प्रस्ताव पुन्हा महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्याच प्रस्तावांच्या विरोधात आता भाजपा आणि राष्ट्रवादी बोलत आहे. तुमचा जर विरोध होता, तर यापूर्वीच तो करायला हवा, आधी कामांना मंजुरी द्यायची आणि आता आर्थिक तरतुदीच्या प्रस्तावांना विरोध करायचा हा दुटप्पीपणा योग्य नाही, असे म्हस्के म्हणाले.