शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

रेडीरेकनरच्या दरानेच भाडे वसूल करा

By admin | Updated: May 24, 2017 01:13 IST

भाईंदरपाडा येथील मैदान खासगी विकासकाला देखभालीकरिता देण्याचा महासभेत चर्चेविना मंजूर केलेला प्रस्ताव प्रशासनाने मागे घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भाईंदरपाडा येथील मैदान खासगी विकासकाला देखभालीकरिता देण्याचा महासभेत चर्चेविना मंजूर केलेला प्रस्ताव प्रशासनाने मागे घ्यावा व रेडीरेकनरच्या दरानुसार भाडेआकारणी करण्याचा प्रस्ताव आणून तो चर्चेद्वारे मंजूर करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने मंगळवारी केली. महासभेत केवळ अर्ध्या तासात ३९२ प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्याच्या सत्ताधारी शिवसेना व प्रशासनाच्या मिलीभगतच्या निषेधार्थ भाजपाने लाक्षणिक उपोषण केले.मागील आठवड्यात शनिवारी झालेल्या महासभेत काही वादग्रस्त आणि तब्बल ४५० कोटींचे प्रस्ताव चर्चेशिवाय मंजूर करण्यात आले. ठाणेकरांच्या कररुपी पैशाची उधळपट्टी करणाऱ्या, सत्ताधारी आणि प्रशासनाच्या या मिलीभगतच्या विरोधात भाजपाने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून, मंगळवारी महापालिका मुख्यालयाच्या आवारात लाक्षणिक उपोषण केले. यावेळी, आमदार संजय केळकर हेही उपोषणात सहभागी झाले होते. केळकर म्हणाले की, झालेला प्रकार अतिशय चुकीचा असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. भाईंदरपाडा येथील भूखंडाचा प्रस्ताव दुरुस्त करुन तो पुन्हा चर्चेसाठी आणावा किंवा रेडी रेकनरच्या दराने भाडेवसुली करावी, अशी मागणी त्यांनी केली.‘त्या’ वादग्रस्त ठरावांना स्थगिती द्यासत्तेचा गैरवापर करीत ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने महासभेत मंजूर करवून घेतलेल्या ३९२ प्रस्तावांच्या अंमलबजावणीला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.शिष्टमंडळात पालिकेतील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांचा समावेश होता. आव्हाड म्हणाले की, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेने आयत्यावेळचे ८२ आणि ३९२ असे एकूण ४०० हून अधिक ठराव अवघ्या अर्धा तासात चर्चेविना मंजूर केले. महासभेत ठराव सर्वानुमते मंजूर होणे अपेक्षित असते. त्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांचेही मत घेणे गरजेचे असते. मात्र, शिवसेनेने कायद्याची सर्रास पायमल्ली केली. लोकशाहीला घातक ठरणाऱ्या या कृतीविरोधात राष्ट्रवादी, भाजपा आणि अपक्षांनी गदारोळ घालून विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्तेचा गैरवापर करत शिवसेनेने तब्बल ४०० ठराव मंजूर केले. त्याला सरकारने स्थगिती देण्याची मागणी आव्हाड यांनी केली.महापालिका महासभेत केवळ अर्ध्या तासात ३९२ प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्यावरून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली असून या सर्व विषयांना यापूर्वीच महासभेने मंजुरी दिली असल्याचा खुलासा शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी केला आहे. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करायचा होता तर यापूर्वीच करणे गरजेचे होते, असे म्हस्के म्हणाले. भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादीने महासभेनंतर सत्ताधारी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले असून बहुमताच्या बळावर हडेलप्पी कारभार सुुरु केल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यापासून आंदोलन करण्यापर्यंत पावले उचलून सेनेच्या कोंडीचे प्रयत्न चालवले आहेत. या पार्श्वभूमीवर म्हस्के म्हणाले की, महासभा सुरु होती तेव्हा त्यांना चर्चा करण्यापासून कुणी अडवले होते. केवळ गोंधळ घालायचा आणि सभात्याग करायचा ही पध्दत चुकीची असल्याचा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.खर्चाबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी जाणे अपेक्षित होते. परंतु स्थायी समिती गठीत न झाल्याने पुन्हा हे प्रस्ताव पुन्हा महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्याच प्रस्तावांच्या विरोधात आता भाजपा आणि राष्ट्रवादी बोलत आहे. तुमचा जर विरोध होता, तर यापूर्वीच तो करायला हवा, आधी कामांना मंजुरी द्यायची आणि आता आर्थिक तरतुदीच्या प्रस्तावांना विरोध करायचा हा दुटप्पीपणा योग्य नाही, असे म्हस्के म्हणाले.