शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

रेडीरेकनरच्या दरानेच भाडे वसूल करा

By admin | Updated: May 24, 2017 01:13 IST

भाईंदरपाडा येथील मैदान खासगी विकासकाला देखभालीकरिता देण्याचा महासभेत चर्चेविना मंजूर केलेला प्रस्ताव प्रशासनाने मागे घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भाईंदरपाडा येथील मैदान खासगी विकासकाला देखभालीकरिता देण्याचा महासभेत चर्चेविना मंजूर केलेला प्रस्ताव प्रशासनाने मागे घ्यावा व रेडीरेकनरच्या दरानुसार भाडेआकारणी करण्याचा प्रस्ताव आणून तो चर्चेद्वारे मंजूर करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने मंगळवारी केली. महासभेत केवळ अर्ध्या तासात ३९२ प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्याच्या सत्ताधारी शिवसेना व प्रशासनाच्या मिलीभगतच्या निषेधार्थ भाजपाने लाक्षणिक उपोषण केले.मागील आठवड्यात शनिवारी झालेल्या महासभेत काही वादग्रस्त आणि तब्बल ४५० कोटींचे प्रस्ताव चर्चेशिवाय मंजूर करण्यात आले. ठाणेकरांच्या कररुपी पैशाची उधळपट्टी करणाऱ्या, सत्ताधारी आणि प्रशासनाच्या या मिलीभगतच्या विरोधात भाजपाने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून, मंगळवारी महापालिका मुख्यालयाच्या आवारात लाक्षणिक उपोषण केले. यावेळी, आमदार संजय केळकर हेही उपोषणात सहभागी झाले होते. केळकर म्हणाले की, झालेला प्रकार अतिशय चुकीचा असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. भाईंदरपाडा येथील भूखंडाचा प्रस्ताव दुरुस्त करुन तो पुन्हा चर्चेसाठी आणावा किंवा रेडी रेकनरच्या दराने भाडेवसुली करावी, अशी मागणी त्यांनी केली.‘त्या’ वादग्रस्त ठरावांना स्थगिती द्यासत्तेचा गैरवापर करीत ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने महासभेत मंजूर करवून घेतलेल्या ३९२ प्रस्तावांच्या अंमलबजावणीला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.शिष्टमंडळात पालिकेतील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांचा समावेश होता. आव्हाड म्हणाले की, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेने आयत्यावेळचे ८२ आणि ३९२ असे एकूण ४०० हून अधिक ठराव अवघ्या अर्धा तासात चर्चेविना मंजूर केले. महासभेत ठराव सर्वानुमते मंजूर होणे अपेक्षित असते. त्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांचेही मत घेणे गरजेचे असते. मात्र, शिवसेनेने कायद्याची सर्रास पायमल्ली केली. लोकशाहीला घातक ठरणाऱ्या या कृतीविरोधात राष्ट्रवादी, भाजपा आणि अपक्षांनी गदारोळ घालून विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्तेचा गैरवापर करत शिवसेनेने तब्बल ४०० ठराव मंजूर केले. त्याला सरकारने स्थगिती देण्याची मागणी आव्हाड यांनी केली.महापालिका महासभेत केवळ अर्ध्या तासात ३९२ प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्यावरून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली असून या सर्व विषयांना यापूर्वीच महासभेने मंजुरी दिली असल्याचा खुलासा शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी केला आहे. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करायचा होता तर यापूर्वीच करणे गरजेचे होते, असे म्हस्के म्हणाले. भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादीने महासभेनंतर सत्ताधारी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले असून बहुमताच्या बळावर हडेलप्पी कारभार सुुरु केल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यापासून आंदोलन करण्यापर्यंत पावले उचलून सेनेच्या कोंडीचे प्रयत्न चालवले आहेत. या पार्श्वभूमीवर म्हस्के म्हणाले की, महासभा सुरु होती तेव्हा त्यांना चर्चा करण्यापासून कुणी अडवले होते. केवळ गोंधळ घालायचा आणि सभात्याग करायचा ही पध्दत चुकीची असल्याचा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.खर्चाबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी जाणे अपेक्षित होते. परंतु स्थायी समिती गठीत न झाल्याने पुन्हा हे प्रस्ताव पुन्हा महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्याच प्रस्तावांच्या विरोधात आता भाजपा आणि राष्ट्रवादी बोलत आहे. तुमचा जर विरोध होता, तर यापूर्वीच तो करायला हवा, आधी कामांना मंजुरी द्यायची आणि आता आर्थिक तरतुदीच्या प्रस्तावांना विरोध करायचा हा दुटप्पीपणा योग्य नाही, असे म्हस्के म्हणाले.