शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

देवघरमध्ये टोमॅटोचे घेतले विक्रमी पीक

By admin | Updated: March 14, 2016 01:36 IST

पालघर जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र वाड्यातील देवघर येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेऊन त्याची शेती यशस्वी केली आहे.

वसंत भोईर,  वाडापालघर जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र वाड्यातील देवघर येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेऊन त्याची शेती यशस्वी केली आहे.वसई तालुक्यातील आडणे, भाताणे येथे टोमॅटोची लागवड केली जाते. ठाणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये याचे तुरळक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र वाडा तालुक्यात सन २०१२ साठी वाडा पंचायत समितीत कुणबी सेना सत्तेवर आली तेव्हा देवघर गावचे सुपुत्र प्रफुल्ल पाटील हे उपसभापती झाले आणि त्यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अर्थसहाय घेऊन शिवजलधारा योजनेअंतर्गत गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांना टोमॅटोचे उत्पादन घ्यायला प्रवृत्त केले. डोंगराच्या कुशीत असून देखील सिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने शिवजलधारा योजनेचा प्रयोग पाटील यांनी प्रथम स्वत:च्या गावात करून तो यशस्वी केला. वाडा तालुक्याच्या ठिकाणापासून २३ कि. मी. तर कुडूसपासून ६ कि.मी. अंतरावर असणाऱ्या या गावात शेतकरी अभिनव आणि अलंकार हे टोमॅटोचे बियाणे आणून स्वत:च रोप तयार करतात व स्वत: त्याची लागवड करून रोपांची विक्रीदेखील करतात.एक एकरमधून १५०० क्रेट टोमॅटो निघतात याचे वजन ४५ ते ५५ टन असते. त्यासाठी २५०० ते ३००० रुपयांचे ५ पॅकेट बियाणे लागते. फवारणी तसेच मजुरी हा खर्च एकरासाठी अंदाजे दीड लाख रुपये येतो. टोमॅटोला ७ ते १५ रुपये प्रती किलो भाव मिळत असल्याने एकरी ३ लाख १२ हजारापर्यंत उत्पन्न देणाऱ्या टोमॅटोची लागवड करणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांना कृषीउत्पन्न बाजार समिती वाड्यात नसल्याने तो दलालांमार्फत विकावा लागतो.देवघर गावातील शेतकऱ्यांनी भात पिकाला पर्याय म्हणून टोमॅटोची शेती यशस्वी केली आहे. मात्र, सरकारच्या कृषी विभागाकडून त्यांना कोणतेही सहकार्य मिळत नसल्याची खंत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मजुरांची कमतरता, खते, औषधांचा तुटवडा या गोष्टींमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादनात गेल्या अनेक वर्षांपासून आपला लौकिक कायम राखला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून वाडा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. परंतु ती आजवर पूर्ण झाली नसल्याने उत्पादन केलेल्या मालाला योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत देवघर येथील शेतकरी किशोर पाटील, प्रकाश पाटील, रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केली.