शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

आठवडी बाजार समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:02 IST

तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी फायदेशीर असलेला मुरबाड मधील आठवडी बाजार हा सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे.

मुरबाड : तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी फायदेशीर असलेला मुरबाड मधील आठवडी बाजार हा सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. त्यातच ग्राहकांनी या बाजाराकडे सपशेल पाठ फिरवल्याने व्यापारी वर्ग चिंतेत आहे. शिवाय, ग्राहक तसेच व्यापाºयांना मूलभूत सुविधा देण्यास बाजार समिती प्रशासन अपयशी ठरले आहे, त्याचाही फटका व्यापाºयांना बसतो आहे.तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना खरेदी - विक्र ीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून दर शुक्र वारी मुरबाडमध्ये आठवडी बाजार भरवला जातो. कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने तेथे नाशिक, जुन्नर, आळेफाटा, नगर येथून व्यापारी विक्र ीसाठी भाजीपाला घेऊन येतात.या बाजाराची उलाढाल मोठ्या प्रमाणात असल्याने मुंबई लगतच्या या बाजार समितीला राज्य पणन महामंडळाकडून विविध विकास कामांसाठी निधी दिला जातो. मात्र, तरीही येथे येणाºया ग्राहकांची मूलभूत सोयींअभावी गैरसोय होते. तर योग्य बाजारपेठ नसल्याने व्यापाºयांना अक्षरश: चिखलात दुकान मांडावे लागते. तो माल घेण्यासाठी ग्राहक फिरकत नसल्याने शेकडो कि.मी. वरुन आलेल्या व्यापाºयांना ग्राहकांची चातकासारखी वाट पहावी लागते. काही व्यापाºयांना मोक्याची जागा हवी असल्याने जिल्हा परिषदेने बांधलेल्या सामूहिक विक्री केंद्रावर अतिक्रमण केले आहे.आठवडी बाजारात प्रत्येक व्यावसायिकाकडून दहा रुपयांची पावती फाडली जात असून त्यांच्या सुविधांचा लवकरच विचार केला जाईल, असे बाजार समितीचे सचिव सुधीर मोरे यांनी सांगितले. व्यापारी आणि नागरिकांच्या समस्यांबाबत ते बोलत होते.